शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

स्वाईन फ्लू- हॅलो लीड

By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST

लोकमत विशेष....

लोकमत विशेष....
स्वाईन फ्लू दारात, मनपा कोमात !
- नागरिकांचे हाल : मेयो, मेडिकलवर भार
नागपूर : स्वाईन फ्लू मुळे राज्यात आजवर ८३ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील ३१ रुग्णांचा मृत्यू नागपुरात झाला आहे. स्वाईन फ्लूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उपराजधानी हादरली आहे. स्वाईन फ्लूने शहरात थैमान घातले असताना महापालिकेची आरोग्य यंत्रणा उपाय योजण्याऐवजी कोमात गेल्याचे चित्र आहे. स्वाईन फ्लूवर उपाय योजण्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयात कुठलीही सुविधा उपलब्ध नाही. महापालिकेच्या रुग्णालयात आलेल्या रुग्णाला मेयो-मेडिकलमध्ये रेफर करणे, आकडेवारी गोळा करून पाठविणे, फार फार तर माहिती पत्रके वाटणे एवढे काम करून महापालिका आपली जबाबदारी झटकत असल्याचे चित्र आहे.
मनपाच्या आरोग्य विभागाचे तीन मोठे रुग्णालय व आवश्यक मनुष्यबळ असतानाही स्वाईन फ्लूच्या रुग्णांना भरती केले जात नाही. रुग्ण तपासणीची वेळही मर्यादित आहे. संशयित रुग्ण आढळून आल्यास थेट मेडिकलला रेफर आणि पॉझिटीव्ह रुग्णांच्या घरी जाऊन औषधांचे वितरण या पलिकडे विभागाला काम नाही. विशेष म्हणजे, संशयित रुग्णाचे नमुने घेण्याचे औचित्यही हा विभाग दाखवित नसल्याने आरोग्य विभागाची शहरातील नागरिकांच्या आरोग्याबाबतची अनास्था स्पष्टपणे दिसून येत आहे.

चौकट...
-तपासणी केंद्रात शोभेसाठी
स्वाईन फ्लूवर नियंत्रण मिळविण्यासाठी मनपाने दहा तपासणी केंद्र सुरू केले. हे केंद्र इंदिरा गांधी रुग्णालय, आयसोलेशन रुग्णालय, डीक दवाखाना, शांतिनगर, बगडगंज, इतवारी, पाचपावली, बेझनबाग, सदर आणि महाल येथे आहेत. प्रत्येक केंद्रात एमबीबीएस डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांची सोय आहे. केंद्राची वेळ सकाळी ८ ते दुपारी २ वाजताची आहे, परंतु दुपारी १ वाजता नंतर रुग्ण गेल्यास त्याला उपचाराविना परतावे लागते. विशेष म्हणजे, स्वाईन फ्लू संशयित रुग्ण आढळून आल्यास त्याच्या संदर्भातील एक अर्ज भरून थेट मेडिकलकडे रेफर केले जाते. यामुळे हे तपासणी केंद्र शोभेचे बाहुले ठरत आहे.

- व्हेंटिलेटरचा अभाव
मनपाचे स्वत:ची तीन मोठी इस्पितळे आहेत, मात्र एकाही रुग्णालयात व्हेंटिलेटर नाही. ऑक्सिजनची विशेष सोय नाही. गेल्या सहा वर्षांपासून स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून येत असताना, या सोयी आरोग्य विभागाने उपलब्ध करून घेणे अपेक्षित होते. परंतु मेयो, मेडिकलकडे रेफर करण्याची सवय जडल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाला स्वत:च्या जबाबदारीचाच विसर पडला आहे.