शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

आला उन्हाळा, आरोग्य संभाळा... सल्ला : जास्तीत जास्त पाणी प्या, उन्हात जाणे टाळा...

By admin | Updated: March 22, 2016 00:39 IST

जळगाव : उन्हाळा म्हणजे उष्माघातासह जुलाब व इतर गंभीर आजारांना निमंत्रणच असते. त्यामुळे आता उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या असून आरोग्य संभाळण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.

जळगाव : उन्हाळा म्हणजे उष्माघातासह जुलाब व इतर गंभीर आजारांना निमंत्रणच असते. त्यामुळे आता उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या असून आरोग्य संभाळण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.
खान्देशातील उन्हाळ्यातील तापमान म्हणजे नकोसे वाटते. इतर शहरांमधून आलेल्या नागरिकांना तर येथे आल्यावर हमखास आजार होतात. जळगावकरांना याची सवय झाली असली तरी झाडांची संख्या कमी होत असल्याने दिवसेंदिवस येथील तापमान वाढतच असल्याने आरोग्याची काळजी घेणे गरजेचे झाले आहे.

गंभीर आजारास निमंत्रण...
उन्हाळा म्हटला म्हणजे पाण्यापासून होणार्‍या अनेक आजारांना निमंत्रण असते. या दिवसात सर्वात गंभीर फटका बसतो तो म्हणजे उष्माघाताचा. भर उन्हात बाहेर फिरल्याने चांगली प्रकृती असलेल्या व्यक्तीलादेखील उन्हाचा फटका बसून उष्माघात होऊ शकतो. याशिवाय उन्हाळ्यात तहान वाढल्याने आपण बाहेरचे पाणी घेतो. मात्र ते कसे आहे, याची खात्री होत नाही व त्यातून जुलाब, उलट्या असा त्रास होऊन नंतर गॅस्ट्रो सारख्या गंभीर आजारापर्यंत परिस्थिती जाते. या शिवाय कावीळ, डायरिया हे अजारदेखील बळावतात.

अशी घ्या काळजी....
-जास्त पाणी पिऊन शरीरातील पाणी पातळी कायम ठेवावी.
-शक्यतो जी कामे आहे ती सकाळी १० ते ११ वाजे दरम्यान पूर्र्ण करावी.
-भर उन्हात जाऊ नये, महत्त्वाचे काम असेल तरच दुपारी बाहेर पडावे.
-बाहेर जाताना पांढरे सुती कपडे घालावे, डोक्याला पांढरा रुमाल बांधावा, डोळ्याला गॉगल वापरावा.
-घरी कुलरचा वापर करावा
-मीठाचे पाणी अथवा लिंबू सरबतचे जास्त सेवन करावे. याशिवाय फळांचा रसही घ्यावा, टरबूज सारखे पाणीदार फळे खावी.
-लहान मुलांना शक्यतो उन्हात नेऊ नये, त्यांना लगेच उन्हाचा फटका बसू शकतो. विशेषत: लग्न कार्यात जाताना मुलांना नेऊ नये.

कोट..

उन्हाळ्यामध्ये उष्माघात व इतर आजार होण्याची जास्त शक्यता असते. आरोग्यासाठी भरपूर पाणी प्यावे. उन्हापासून बचाव करावा.
-डॉ. नरेंद्र चौधरी.

या दिवसांमध्ये उन्हाचा सर्वांनाच त्रास होतो. उष्माघातासह गॅस्ट्रो, कावीळ, डायरिया सारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो कामे सकाळीच पूर्ण करुन घ्यावी. दुपारी उन्हात जाणे टाळावे.
-डॉ.डी.आर.जयकर.