शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

साधा खोकलाच तर आहे, म्हणून दुर्लक्ष केलंत तर पडू शकतं महागात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 13:38 IST

तरुणांमध्येही वाढतोय दम्याचा विकार. जागतिक आरोग्य संघटनेचा सावधानतेचा इशारा.

ठळक मुद्देसाधा खोकला आहे म्हणून दुर्लक्ष करू नका.खोकल्याचंच रुपांतर दम्यात होऊ शकतं.तरुणांमध्येही दम्याचं वाढतंय प्रमाण.

- मयूर पठाडेसाधा खोकला. त्यानं असा काय आणि कितीसा फरक पडतो, असं सगळ्यांना वाटतं, पण याच खोकल्याकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर त्याचं दम्यात रुपांतर होतं आणि मृत्यूलाही ते कारणीभूत ठरू शकतं. जागतिक आरोग्य संघटनेनंही त्याकडे साºयांचंच लक्ष वेधलं आहे. जगात दम्यानं दगावणाºया लोकांची संख्या भारतात सर्वाधिक असल्याचा अहवालही जागतिक आरोग्य संघटनेनं नुकताच दिला आहे. भारतात दम्यामुळे मृत्युमुखी पडणाºया लोकांचीच संख्या केवळ जास्त नाही, जगात दम्याचे सर्वाधिक रुग्णही भारतातच आहेत.याकडे सर्वसामान्य लोकांबरोबरच सरकारनंही अधिक लक्ष द्यावं असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे. मुळात यासंदर्भात आपल्यातच जागृती होणं अधिक गरजेचं आहे. आजार पहिल्या टप्प्यात असताना किंवा तो झाल्याबरोबर त्याकडे वेळीच लक्ष दिलं तर तो वाढत नाही आणि तो पूर्णपणे बराही होऊ शकतो.कोणता खोकला घातक ठरू शकतो हे अगोदर आपल्याला कळलं पाहिजे. ते कळलं तर त्यावर उपचार करणंही अगदी सोपं आणि सहज आहे.काय आहेत दम्याची लक्षणं?१- आपला खोकला जर तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ सुरू असेल तर तातडीनं डॉक्टरांना दाखवावं.२- खोकल्यातून हिरवा, पिवळा कफ पडत असेल किंवा कधी कधी रक्तही येत असेल तर ते धोक्याचं लक्षण समजावं.३- याशिवाय वजन झपाट्यानं कमी होतं.४- खूप थकवा जाणवतो.५- ताप येतो.६- रात्रीच्या वेळी घाम येतो.७- थंडी वाजून येते.८- छातीत दुखायला लागतं.९- श्वास घ्यायला त्रास होतो आणि श्वासोच्छवासही जलद होतो.१० भूक कमी होते.यासारखी लक्षणं जर आपल्यात दिसत असतील तर तातडीनं योग्य ते उपचार घ्यायला हवेत.जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार दम्याच्या रुग्णांमध्ये तरुणांचं प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. याकडे साºयांनीच गांभीर्यानं लक्ष द्यायला हवं.