शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
3
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
4
दहा कोटीचे बक्षीस, चार तास चकमक ! दबा धरून बसलेल्या माओवाद्यांचा जवानांनी केला खात्मा
5
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
6
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
7
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
8
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
9
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
10
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
11
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
12
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
13
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
14
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
15
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
16
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
17
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
18
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
19
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
20
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

त्वचारोगावर संशोधनात्मक वनस्पती

By admin | Updated: September 15, 2015 18:47 IST

आयुर्वेदामध्ये एकाच रोगावर एकच वनस्पती लागू पडत नाही. प्रत्येक मनुष्यामध्ये प्रकृती वेगळी असल्याने औषधींची मात्रा लागू पडेल असे नाही. म्हणून व्यक्तीच्या प्रकृतीमानानुसार अनेक औषधी वनस्पती शास्त्रात वर्णन केल्या आहेत. याचे शरीरावर कोणतेही साईड इफेक्ट नसल्याने त्या एकत्र करून वापरल्यास त्यातील काही वनस्पती चांगल्याप्रकारे काम करून आजार पूर्णपणे कमी करतात याचा अनुभव आला म्हणून माहिती देत आहे.

आयुर्वेदामध्ये एकाच रोगावर एकच वनस्पती लागू पडत नाही. प्रत्येक मनुष्यामध्ये प्रकृती वेगळी असल्याने औषधींची मात्रा लागू पडेल असे नाही. म्हणून व्यक्तीच्या प्रकृतीमानानुसार अनेक औषधी वनस्पती शास्त्रात वर्णन केल्या आहेत. याचे शरीरावर कोणतेही साईड इफेक्ट नसल्याने त्या एकत्र करून वापरल्यास त्यातील काही वनस्पती चांगल्याप्रकारे काम करून आजार पूर्णपणे कमी करतात याचा अनुभव आला म्हणून माहिती देत आहे.
पांढरे कोड (कोड) - विरुद्ध पदार्थांचे सेवन, मद्य, मास, दही, आम्ल, उडीद, अति संताप, पावबटर, अनुवांशिकता, फास्ट फूड, वातादि दोष कुपीत होऊन रक्त, मास व उदक यांना दूषित करून कोडास उत्पन्न करतात. हल्लीच्या काळात गायीच्या दुधाच्या अभावाने कोडाचे प्रमाण वाढत आहे. अनुवांशिकतेने झालेले कोड कष्ट साध्य समजावे.
खैराची अंतरसाल, त्रिफळा, पडवळ, गुळवेल, बातची, शुद्ध गंधर्व, मनशिल, हरमाळ, हळद, टाकळ्यांचे बी, जिरे, अल्प कडुजिरे, पांढरी गोकर्णी, पिंपळी, जाई, हिराकस, वावडिंग, गोरोचन, सैंधव, कावळी, टाकळ्यांचे बी कोष्ट, मुळ्याचे बी, शुद्ध निवडुंग, चित्रक शुद्ध, नागरमोथा, समुद्रफेस, कुटकी, बाहता, करंज, काजळी, कपीला, चंडन, तरतडाचे बी, पांढरी गोकर्णी, रिंगणीची फळे, तेखंड, लोहभाग, पोरतमुळ, जटामासी, काळा माका, चिकणा इत्यादी गोमूत्रात किंवा दुधात घ्यावे. वैद्यांच्या सल्ल्याने प्रमाण व काही वनस्पतीची शुद्धी करणे आवश्यक आहे. पांढरे कोड या आजाराची काही कारणे अज्ञात आहेत. यापासून शरीरास अपाय नाही किंवा स्पर्शसंचारही नाही. लोक याला समजतात तेवढा हा भयंकर नाही. फक्त दिसायला त्वचा विरुप दिसते. यापेक्षा या विकारात त्रास नाही. हा विकार दोन प्रकारात दिसतो. एकात त्वचा पांढरी व दुसर्‍यात त्वचा लालसर असते. या विकाराचा आरंभ ओठ, कंबर, डोळ्यांच्या पापण्या, हात-पायाला एखादा वाटोळा डाग येतो. डाग असलेल्या जागेवरचे केस पांढरे होऊन गळू लागतात. तेव्हा हा कष्टसाध्य होतो. दहा-पाच ठिकाणी लहान-मोठे डाग लवकर बरे होतात. ओठावरील व तळहातावरील डाग लवकर जात नाहीत. समाजाने या रोगाविषयी भलताच गैरसमज करून घेऊ नये व रुग्णानेसुद्धा मनात न्यूनगंड बाळगू नये. कारण हा आजार नसून लक्षण आहे. त्याचे इतरांना व आपणास काही दुष्परिणाम होत नाही. तेलकट, तिखट, आंबट विरुद्ध अन्न (केळाचे शिकरण, मध, तूप, दही, लसूण एकत्र करणे.) तसेच मांस, अंडी इत्यादी पदार्थ न खाता वरील औषधाची मात्रा घेतल्याने हा विकार बरा जरी झाला नाही तरी वाढणार नाही असे मला वाटते.