शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

त्वचारोगावर संशोधनात्मक वनस्पती

By admin | Updated: September 15, 2015 18:47 IST

आयुर्वेदामध्ये एकाच रोगावर एकच वनस्पती लागू पडत नाही. प्रत्येक मनुष्यामध्ये प्रकृती वेगळी असल्याने औषधींची मात्रा लागू पडेल असे नाही. म्हणून व्यक्तीच्या प्रकृतीमानानुसार अनेक औषधी वनस्पती शास्त्रात वर्णन केल्या आहेत. याचे शरीरावर कोणतेही साईड इफेक्ट नसल्याने त्या एकत्र करून वापरल्यास त्यातील काही वनस्पती चांगल्याप्रकारे काम करून आजार पूर्णपणे कमी करतात याचा अनुभव आला म्हणून माहिती देत आहे.

आयुर्वेदामध्ये एकाच रोगावर एकच वनस्पती लागू पडत नाही. प्रत्येक मनुष्यामध्ये प्रकृती वेगळी असल्याने औषधींची मात्रा लागू पडेल असे नाही. म्हणून व्यक्तीच्या प्रकृतीमानानुसार अनेक औषधी वनस्पती शास्त्रात वर्णन केल्या आहेत. याचे शरीरावर कोणतेही साईड इफेक्ट नसल्याने त्या एकत्र करून वापरल्यास त्यातील काही वनस्पती चांगल्याप्रकारे काम करून आजार पूर्णपणे कमी करतात याचा अनुभव आला म्हणून माहिती देत आहे.
पांढरे कोड (कोड) - विरुद्ध पदार्थांचे सेवन, मद्य, मास, दही, आम्ल, उडीद, अति संताप, पावबटर, अनुवांशिकता, फास्ट फूड, वातादि दोष कुपीत होऊन रक्त, मास व उदक यांना दूषित करून कोडास उत्पन्न करतात. हल्लीच्या काळात गायीच्या दुधाच्या अभावाने कोडाचे प्रमाण वाढत आहे. अनुवांशिकतेने झालेले कोड कष्ट साध्य समजावे.
खैराची अंतरसाल, त्रिफळा, पडवळ, गुळवेल, बातची, शुद्ध गंधर्व, मनशिल, हरमाळ, हळद, टाकळ्यांचे बी, जिरे, अल्प कडुजिरे, पांढरी गोकर्णी, पिंपळी, जाई, हिराकस, वावडिंग, गोरोचन, सैंधव, कावळी, टाकळ्यांचे बी कोष्ट, मुळ्याचे बी, शुद्ध निवडुंग, चित्रक शुद्ध, नागरमोथा, समुद्रफेस, कुटकी, बाहता, करंज, काजळी, कपीला, चंडन, तरतडाचे बी, पांढरी गोकर्णी, रिंगणीची फळे, तेखंड, लोहभाग, पोरतमुळ, जटामासी, काळा माका, चिकणा इत्यादी गोमूत्रात किंवा दुधात घ्यावे. वैद्यांच्या सल्ल्याने प्रमाण व काही वनस्पतीची शुद्धी करणे आवश्यक आहे. पांढरे कोड या आजाराची काही कारणे अज्ञात आहेत. यापासून शरीरास अपाय नाही किंवा स्पर्शसंचारही नाही. लोक याला समजतात तेवढा हा भयंकर नाही. फक्त दिसायला त्वचा विरुप दिसते. यापेक्षा या विकारात त्रास नाही. हा विकार दोन प्रकारात दिसतो. एकात त्वचा पांढरी व दुसर्‍यात त्वचा लालसर असते. या विकाराचा आरंभ ओठ, कंबर, डोळ्यांच्या पापण्या, हात-पायाला एखादा वाटोळा डाग येतो. डाग असलेल्या जागेवरचे केस पांढरे होऊन गळू लागतात. तेव्हा हा कष्टसाध्य होतो. दहा-पाच ठिकाणी लहान-मोठे डाग लवकर बरे होतात. ओठावरील व तळहातावरील डाग लवकर जात नाहीत. समाजाने या रोगाविषयी भलताच गैरसमज करून घेऊ नये व रुग्णानेसुद्धा मनात न्यूनगंड बाळगू नये. कारण हा आजार नसून लक्षण आहे. त्याचे इतरांना व आपणास काही दुष्परिणाम होत नाही. तेलकट, तिखट, आंबट विरुद्ध अन्न (केळाचे शिकरण, मध, तूप, दही, लसूण एकत्र करणे.) तसेच मांस, अंडी इत्यादी पदार्थ न खाता वरील औषधाची मात्रा घेतल्याने हा विकार बरा जरी झाला नाही तरी वाढणार नाही असे मला वाटते.