शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

सुरेख गाण्यासाठी आवाजाला आराम द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2016 02:04 IST

 ‘लोकमत’ सखी मंच आयोजित ‘जल्लोष २०१६’ कार्यक्रमानिमित्त सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत जळगावात आल्या असता...

‘लोकमत’ सखी मंच आयोजित ‘जल्लोष २०१६’ कार्यक्रमानिमित्त सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत जळगावात आल्या असता, लोकमतच्या शहर कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित सखी मंचच्या सदस्यांशी प्रश्नोत्तर स्वरूपात हसत खेळत मनसोक्त गप्पा मारत सुरेख आवाजासाठी आवाजाला आराम महत्त्वाचा आहे असा सल्ला दिला. त्यांनी आपल्या गायनातील आवडी निवडी बरोबरच आपल्या कौटुंबीक सुखाचे गुपीत सांगून सखींना कानमंत्र दिला. यावेळी ‘लोकमत’चे वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रविण चोपडा, संपादकीय प्रमुख मिलिंद कुलकर्णी, विनित जोशी व मिलिंद जैन आदी मान्यवर उपस्थित होते.  सखींच्या प्रश्नांना वैशाली सामंत यांनी दिलेले मनसोक्त उत्तरे- प्रश्न- गायन सुंदर होण्यासाठी आपण रोज किती वेळ सराव करतात? वैशाली- आपण महिला रोज स्वयंपाक बनवितो, मात्र रोजच सराव करीत नाही. माझी गायनाची कला मी आत्मसात केली आहे. त्यामुळे रोजच सरावाची गरज नाही. मात्र कार्यक्रम असेल तर थोडा सराव करून जाते. आणि चांगल्या गायनासाठी जेवण, सराव व आराम महत्त्वाचा आहे. या तीघांचा समतोल साधला गेला पाहीजे.    प्रश्न- आपण जेवण चांगले बनवत असाल?  वैशाली- मी शुद्ध शाकाहारी असून एक चांगली गृहिणीदेखील आहे. यामुळे मला कुटुंबियांसोबत राहून त्यांच्यासाठी चांगले जेवण करणे आवडते.   प्रश्न- गायना व्यतिरिक्त आपला दुसरा छंद कोणता आहे? वैशाली- वाचन करायला आवडते. मात्र व्यवसायाच्या व्यापामुळे वाचनाला सध्या कमी वेळ मिळतो. तसेच चांगले चित्रपट बघायला आवडते व बाजारात भाजी खरेदी करायला देखील आवडते.  प्रश्न- आपल्या यशाचे श्रेय कोणाला द्याल? वैशाली- माझ्या यशाचे श्रेय मी माझ्या आई वडिल तसेच गुरू पंडित मनोहर यांना देईल.    प्रश्न- पहिले गाणे गायल्यावर काय वाटले? वैशाली- पहिल्या गाण्याचा अनुभव वेगळाच होता,  थोडी भितीही होती. मात्र गाणे गायल्यावर मिळालेल्या प्रतिसादाने मन भारावून गेले स्वत:च्या आवाजाला न्याय देऊ शकते असे वाटले. प्रश्न- गाणे गाण्यासाठीची उर्जा कशी प्राप्त करतात?वैशाली- योगा व ध्यान साधनाने उर्जा टिकवून ठेवते. दुसरे महत्त्वाचे म्हणजे मी जेवणाशिवाय गाणे गाऊ शकत नाही, म्हणून माझ्या साठी जेवणही तेवढेच महत्त्वाचे आहे. प्रश्न- आपल्या जीवनातील एखादा विनोदी किस्सा सांगा?वैशाली- माझ्या विसराळूपणामुळे बºयाचदा विनोदी किस्से घडले आहेत. एकदा गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी एका स्टुडिओत जायायचे होते, मात्र तिथे जायायचेच विसरले. कधी कधी भाजीपाला खरेदी करताना पैसे तर देते मात्र घेतलेली भाजीच तिथे विसरते. प्रश्न- बेटी बचाओ, बेटी पढाओ बाबत काय सांगु शकाल? वैशाली- हे अभियान राबविणेच मुळात खंताची बाब आहे. चुकीच्या समजूतीमुळे स्त्री भृण हत्या केली जाते. आज मुली कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत. तरीही आाज मुलगा-मुलगी भेदभाव दिसुन येतो ही दुर्देवाची गोष्ट आहे. घराचे व्यवस्थापन स्त्रीच चांगल्या प्रकारे करू शकते. आणि वृद्धापकाळात मुला पेक्षा मुलगी चांगली काळगी घेऊ शकते. प्रश्न- कोणते गाणे गायायला मजा आली?वैशाली- ऐका दाजिबावर जास्त मेहनत घेतली आहे, त्यामुळे कोंबडी पळाली पेक्षा ते गाणे गायायला जास्त मजा येते. प्रश्न- गळा चांगला राहावा म्हणून काय काळजी घ्यावी?वैशाली- अनेक गायक यासाठी खाण्या पिण्याचे पथ्य पाळतात, मात्र मला खाण्याची जास्त आवड असल्याने मी आईस्क्रीम, समोसे, वडे, पाणीपूरी आदी खात असते, मात्र बर्फाचे पाणी टाळते.