शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

राजीव गांधी आरोग्य जीवनदायी योजना सामान्यासाठी नवसंजीवनी १९ रुग्णालयांमध्ये सुविधा : ३६ हजार रुग्णांनी घेतला लाभ, ८३ कोटी रुपये खर्च

By admin | Updated: April 28, 2016 00:32 IST

जळगाव : राजीव गांधी आरोग्य जीवनदायी योजना सामान्यांसाठी नवसंजीवनी ठरत असून अनेक गंभीर आजारातून या योजनेमुळे रुग्णांची सुटका झाली आहे. योजना सुरू झाल्यापासून जिल्ह्यात आतापर्यंत ३६ हजार ६९० रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला असून त्यावर शासनाकडून ८३ कोटी ८२ लाख ९१ हजार ३१६ रुपये खर्च झाला आहे.

जळगाव : राजीव गांधी आरोग्य जीवनदायी योजना सामान्यांसाठी नवसंजीवनी ठरत असून अनेक गंभीर आजारातून या योजनेमुळे रुग्णांची सुटका झाली आहे. योजना सुरू झाल्यापासून जिल्ह्यात आतापर्यंत ३६ हजार ६९० रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला असून त्यावर शासनाकडून ८३ कोटी ८२ लाख ९१ हजार ३१६ रुपये खर्च झाला आहे.
राज्यातील शेवटच्या घटकांपर्यंत मोफत व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा पोहचविण्याच्या हेतूने २१ नोव्हेंबर २०१३ रोजी शासनाने सुरू केलेल्या या योजनेची प्रारंभी सामान्यांना पुरेशी माहिती नव्हती. मात्र नंतरच्या काळात सोशल मीडिया, फलक, माध्यमातील जाहिराती यामुळे ही योजना घराघरात पोहचली.

१९ रुग्णालयांमध्ये योजना सुरू...
ही योजना जिल्‘ात १९ रुग्णालयांमध्ये सुरू आहे. यामध्ये जळगाव शहरातील जिल्हा रुग्णालयासह १३ रुग्णालयांमध्ये तर भुसावळ येथे चार, जामनेर व चोपडा येथे प्रत्येकी एक रुग्णालयामध्ये ही सुरू आहे. या योजनेंतर्गत विविध प्रकारच्या आजारांवर उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून त्यात जळगाव, भुसावळ, चोपडा, जामनेर या तालुक्यांमध्ये योजनेचा लाभ घेण्यार्‍यांची संख्या मोठी आहे. जानेवारी महिन्यात झालेल्या महाआरोग्य शिबिरातील योजनेंतर्गत १००० पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

लाभार्थी कोण....
या योजनेंतर्गत ९७१ गंभीर शस्त्रक्रिया व उपचार पद्धतीवर मोफत सेवा दिली जाते. लाभ घेण्यासाठी रुग्ण हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा व तो पिवळे, अंत्योदय व अन्नपूर्णा शिधापत्रिकाधारक असावा.

चांगल्या सेवेची हमी....
जे नागरिक या योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना अंगीकृत रुग्णालयांमध्ये योग्य सेवा मिळाली की नाही याबाबत मुंबई कार्यालयातून थेट रुग्णांशी संपर्क साधून खात्री केली जाते. उपचारात उणीव असल्यास अथवा अन्य तक्रारी असल्यास संबंधित रुग्णालयाचा निधी रोखला जातो. त्यामुळे रुग्णालयांना चांगली सेवा देणे क्रमप्राप्त ठरल्याने या योजनेत चांगल्या सेवेची हमी असते.

गंभीर आजारांवर उपचार....
ह्रदयरोग, कर्करोग, मूत्रपिंड विकार, मेंदूचे विकार यासारख्या गंभीर आजारांवर शस्त्रक्रियेचा खर्च आवाक्याबाहेर असलेल्या रुग्णांना ही लाभदायी ठरली आहे. तपासणी, परीक्षण, वैद्यकीय उपचार, औषधे, शस्त्रक्रिया, रुग्णांचे जेवण तसेच दवाखान्यातून सु˜ी (डिस्चार्ज) देताना एकेरी प्रवास खर्च व उपचाराचा पाठपुरावा या बाबी योजनेच्या लाभात समाविष्ट केलेल्या आहेत. त्यामुळे या योजनेबाबत नागरिक अधिक सकारात्मक असल्याचे चित्र जिल्‘ात आहे.