शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

राजीव गांधी आरोग्य जीवनदायी योजना सामान्यासाठी नवसंजीवनी १९ रुग्णालयांमध्ये सुविधा : ३६ हजार रुग्णांनी घेतला लाभ, ८३ कोटी रुपये खर्च

By admin | Updated: April 28, 2016 00:32 IST

जळगाव : राजीव गांधी आरोग्य जीवनदायी योजना सामान्यांसाठी नवसंजीवनी ठरत असून अनेक गंभीर आजारातून या योजनेमुळे रुग्णांची सुटका झाली आहे. योजना सुरू झाल्यापासून जिल्ह्यात आतापर्यंत ३६ हजार ६९० रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला असून त्यावर शासनाकडून ८३ कोटी ८२ लाख ९१ हजार ३१६ रुपये खर्च झाला आहे.

जळगाव : राजीव गांधी आरोग्य जीवनदायी योजना सामान्यांसाठी नवसंजीवनी ठरत असून अनेक गंभीर आजारातून या योजनेमुळे रुग्णांची सुटका झाली आहे. योजना सुरू झाल्यापासून जिल्ह्यात आतापर्यंत ३६ हजार ६९० रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला असून त्यावर शासनाकडून ८३ कोटी ८२ लाख ९१ हजार ३१६ रुपये खर्च झाला आहे.
राज्यातील शेवटच्या घटकांपर्यंत मोफत व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा पोहचविण्याच्या हेतूने २१ नोव्हेंबर २०१३ रोजी शासनाने सुरू केलेल्या या योजनेची प्रारंभी सामान्यांना पुरेशी माहिती नव्हती. मात्र नंतरच्या काळात सोशल मीडिया, फलक, माध्यमातील जाहिराती यामुळे ही योजना घराघरात पोहचली.

१९ रुग्णालयांमध्ये योजना सुरू...
ही योजना जिल्‘ात १९ रुग्णालयांमध्ये सुरू आहे. यामध्ये जळगाव शहरातील जिल्हा रुग्णालयासह १३ रुग्णालयांमध्ये तर भुसावळ येथे चार, जामनेर व चोपडा येथे प्रत्येकी एक रुग्णालयामध्ये ही सुरू आहे. या योजनेंतर्गत विविध प्रकारच्या आजारांवर उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून त्यात जळगाव, भुसावळ, चोपडा, जामनेर या तालुक्यांमध्ये योजनेचा लाभ घेण्यार्‍यांची संख्या मोठी आहे. जानेवारी महिन्यात झालेल्या महाआरोग्य शिबिरातील योजनेंतर्गत १००० पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

लाभार्थी कोण....
या योजनेंतर्गत ९७१ गंभीर शस्त्रक्रिया व उपचार पद्धतीवर मोफत सेवा दिली जाते. लाभ घेण्यासाठी रुग्ण हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा व तो पिवळे, अंत्योदय व अन्नपूर्णा शिधापत्रिकाधारक असावा.

चांगल्या सेवेची हमी....
जे नागरिक या योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना अंगीकृत रुग्णालयांमध्ये योग्य सेवा मिळाली की नाही याबाबत मुंबई कार्यालयातून थेट रुग्णांशी संपर्क साधून खात्री केली जाते. उपचारात उणीव असल्यास अथवा अन्य तक्रारी असल्यास संबंधित रुग्णालयाचा निधी रोखला जातो. त्यामुळे रुग्णालयांना चांगली सेवा देणे क्रमप्राप्त ठरल्याने या योजनेत चांगल्या सेवेची हमी असते.

गंभीर आजारांवर उपचार....
ह्रदयरोग, कर्करोग, मूत्रपिंड विकार, मेंदूचे विकार यासारख्या गंभीर आजारांवर शस्त्रक्रियेचा खर्च आवाक्याबाहेर असलेल्या रुग्णांना ही लाभदायी ठरली आहे. तपासणी, परीक्षण, वैद्यकीय उपचार, औषधे, शस्त्रक्रिया, रुग्णांचे जेवण तसेच दवाखान्यातून सु˜ी (डिस्चार्ज) देताना एकेरी प्रवास खर्च व उपचाराचा पाठपुरावा या बाबी योजनेच्या लाभात समाविष्ट केलेल्या आहेत. त्यामुळे या योजनेबाबत नागरिक अधिक सकारात्मक असल्याचे चित्र जिल्‘ात आहे.