शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

मातृत्व लाभलेल्या महिलांना मिळतं निरोगी दीर्घायुष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 17:41 IST

वंध्यत्व असलेल्या महिलांना तुलनेनं मिळतं कमी आयुष्य

ठळक मुद्देज्या महिलांना मूल नाही अशा महिलांपेक्षा ज्यांना मूल आहे अशा महिलांचं आयुष्य जास्त असतं.त्यांच्या आयुष्याची दोरी अधिक बळकट होते, त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मूल झाल्यावर स्त्रीच्या शरीर-मनांत अनेक बदल होतात.एक नवी ऊर्जा निसर्गत:च त्यांच्यात निर्माण होते. म्हणून त्यांच्या आयुष्यमानातही वाढ होते.

- मयूर पठाडेघरात मूल असलं की आपोआपच ते घर किती हसरं, खेळतं आणि आनंदी दिसायला लागतं. त्या घरातल्या महिलेला तर अक्षरश: आभाळच ठेंगणं झालेलं असतं. त्यातही त्या घरातलं जर ते पहिलंच मूल असेल तर मग त्याच्या कोडकौतुकाला पारावारच राहात नाही. मूल असल्याशिवाय, मातृत्वाशिवाय कोणत्याही महिलेला पूर्णत्व येत नाही, असं म्हटलं जातं, त्यातल्या खरेखोटेपणा आणि वादातही आपल्याला शिरायचं नाही, पण ज्या घरांत मूल असतं ते घर इतर घरांपेक्षा नक्कीच वेगळं दिसतं, असतं याविषयी दुमत असू नये.घरात मूल असणं किती आनंददायी आणि आवश्यक असतं, यावर शास्त्रज्ञांनीही आता शिक्कामोर्तब केलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ज्या महिलांना मूल नाही किंवा ज्यांना वंध्यत्व आहे, अशा महिलांपेक्षा ज्यांना मूल आहे अशा महिलांचं आयुष्य जास्त असतं. त्यांच्या आयुष्याची दोरी अधिक बळकट होते. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मूल झाल्यावर स्त्रीच्या शरीर-मनांत अनेक बदल होतात आणि स्त्री अधिक आनंदी होते, एक नवी ऊर्जा निसर्गत:च तिच्यात निर्माण होते. ही ऊर्जाच मूल असणाºया महिलांना एक नवं आयुष्य मिळवून देते. त्याचाच परिणाम म्हणून त्यांच्या आयुष्यमानातही वाढ होते.अमेरिकेतील अमेरिकन सोसायटी आॅफ रिज्युनेटिव्ह मेडिसिनच्या (एएसआरएम) वार्षिक सभेत नुकताच हा अभ्यास मांडण्यात आला. त्यात म्हटलं आहे की ज्या महिलांना मूल नाही किंवा ज्यांना वंध्यत्व आहे अशा महिलांना तुलनेनं लवकर मृत्यू येण्याचं प्रमाण तब्बल ४५ टक्के आहे. त्यातील अनेकींना ब्रेस्ट कॅन्सरमुळे मृत्यू येतो असं त्यांचं निरीक्षण आहे.केवळ मुलांना वाढवण्यातच नव्हे, तर कुठल्याही आव्हानांना तोंड देण्यात माता नेहमीच अग्रेसर असते ते बहुदा यामुळेच.