शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

या पावसाळ्यात आपलं मूल सारखं आजारी पडतंय?..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 4:16 PM

थोडीशी काळजी घेतली तर मुलांपासून दूर पळवता येतील आजार..

ठळक मुद्देमच्छर आणि इतर जीवजंतूंपासून मुलांची काळजी घ्या, मच्छरदाणीचा आवर्जुन वापर करा. मुलांना उकळून गार केलेले पाणी देणे केव्हाही उत्तम.पावसाळी वातावरणात मुलांना फार वेळ बाहेर आणि गर्दीच्या ठिकाणी नेऊ नये. मुलांची वैयक्तिक स्वच्छताही या काळात खूपच महत्त्वाची.

- मयूर पठाडेपावसाळ्यातला तो सारखा पाऊस, चिकचिक, दमट वातावण.. अशा डल वातावरणात आपल्यालाही डल वाटायला लागतं, पण याच काळात आजारांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढलेली असते. लहान मुलांनी तर दवाखाने अक्षरश: भरलेले असतात. हाच काळ असा आहे, ज्यावेळी डास, मच्छर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या जीवजंतूंचीही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असते. कारण हाच काळ त्यांच्या वाढीसाठी खूपच पोषक असतो.मुलांची रोगप्रतिकारशक्ती पूर्णत: विकसित झालेली नसल्याने याच काळात हे जीवजंतू त्यांच्यावर आक्रमण करतात आणि लहान मुलं आजारांनी त्रस्त होतात.याच काळात मुलांची मोठ्या प्रमाणात काळजी घेणं गरजेचं असतं. अर्थात त्यासाठी फार काही करण्याची गरज नाही, पण काही महत्त्वाच्या आणि ठराविक गोष्टी केल्या तरी आपली मुलं या आजारांपासून दूर राहू शकतील आणि त्यांच्या आनंदी बागडण्यानं घरंही प्रफुल्लित राहू शकेल.काय काळजी घ्याल?1- पावसाळी वातावरणात मच्छरांपासून आपल्या मुलांना जपा. डासांपासून अनेक आजार पसरतात.२- या काळात अनेक आजारांनी थैमान मांडलेलं असतं. अ‍ॅलर्जिक आजार तर या काळात वाढतातच, पण कावीळ, व्हायरल फिवर, डेंग्यू, मलेरियासारखे आजारही मुलांना लगेच आपल्या कह्यात घेतात.३- मच्छरांपासून मुलांचं रक्षण करण्यासाठी मच्छरदाणीचा वापर अवश्य केला जावा. मच्छर कोणत्याही प्रतिबंधक उपायांना दाद देण्यास फार लवकर शिकतात. त्यामुळे त्यांना अटकाव करणं फारच कठीण असतं. त्यामुळे मच्छरदाणी हा त्यातल्या त्यात सर्वोत्तम उपाय.४- या काळात पाणी दुषित झालेलं असतं. त्यामुळे डायरिया, टॉयफॉइडसारखे आजारही लगेच बळावतात. त्यासाठी मुलांना उकळून गार केलेले पाणी देणे केव्हाही उत्तम.५- शक्यतो पावसाळी वातावरणात मुलांना फार वेळ बाहेर आणि गर्दीच्या ठिकाणी नेऊ नये. मुलांना इन्फेक्शन होण्यास वेळ लागत नाही.६- आपल्या आसपासचा परिसर तर स्वच्छ असावाच, पण मुलांची वैयक्तिक स्वच्छताही या काळात खूपच महत्त्वाची.या गोष्टींची काळजी घेतली तर आपलं मूल नक्कीच वेगवेगळ्या आजारांना दूर ठेवील आणि त्यामुळे आपलं घरही हसतं, आनंदी राहील.