शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

बाळंतपणानंतर पिझा खात वजन कमी करताय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 17:17 IST

बाळंतपणानंतरच्या आहाराचा सुक्ष्म विचार आपल्या पारंपरिक पद्धतीत दिसतो, ते नाकारुन आपण काय स्वीकारतोय?

ठळक मुद्देसेलिब्रीटी मॉम बारीक होतात, म्हणून आपणही तेच करावं असं नाही, आणि करायचं ठरवलंच तर निदान अतिरेक तरी टाळायलाच हवा.

- नेहा नाशिककर

आपल्याही नकळत माध्यमं आपली विचारप्रक्रिया घडवतात. आपल्या वर्तनावर प्रभाव टाकतात. आणि  आपण नकळत त्यासार्‍यात वाहून जातो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे वर्तमानपत्रात प्रसिद्ध होणार्‍या स्टार महिलांच्या आई होण्याच्या आणि त्यातून लगेच वजन घटवून कामाला लागण्याच्या बातम्या. अशा बातम्या देताना काही भान ठेवावं का, याविषयी बोलण्यात काही हाशील नाही. पण त्या बातम्या वाचून स्वतर्‍वर आणि बाळावर अन्याय करणार्‍या अनेकींनी मात्र काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. कारण  बाळंतपणानंतर लगेच वजन घटवून अतीश्रम करण्याची घाई आरोग्याला बरी नाही.होतं काय करीना कपूरने बाळंतपणानंतर इतके किलो वजन घटवले, सोहा खान ने तितके, राणी मुखर्जी बॅक इन शेप, शिल्पा शेट्टीने तर काय फिगर कमावली अशा बातम्या वर्तमानपत्र, अनेक वेबसाईटस, टीव्हीवाले हमखास दाखवतात. आणि घरबसल्या त्या बातम्या वाचून अनेकजणी स्वतर्‍वर प्रयोग करू लागतात. बाळंतपणानंतर वाढलेलं वजन कमी व्हावं आणि आपणही (इतरांनी ठरवलेल्या) सौंदर्यमापात जाऊन बसावं असं वाटू लागतं.मात्र त्यानं आपल्या बाळावर काय परिणाम होईल, आपल्या शरीरावर काय परिणाम होइल याचा मात्र विचार केला जात नाही. आणि डाएट सुरू होतं. जीम लावलं जातं. खाणं कमी केलं जातं. मूल अंगावर पीत असताना हे सगळे उद्योग म्हणजे त्या मुलाचंही पोषण न करणं आणि आपलंही.केवळ दिसणं हे सौंदर्य नसतं तर बाळांतपणानं झालेली शरीराची झीजही भरुन यायला हवी. आपल्या बाळंतपणाच्या पारंपरिक आहारात हा विचार केलेला आहे.मात्र वजन वाडेल या भितीनं अनेकजणी पौष्टिक अन्न खात नाहीत. दूध पित नाही. आराम करत नाहीत.अतीच व्यायामाला लागतात. परिणाम म्हणून पचन बिघडतं. हाडं कुरकुरकुरायला लागतात. हे टाळा, किमान करीना कपूर बाळंतपणात गुळ भाकरी, तीळाची, जवसाची चटणी खात होती हे जरी लक्षात ठेवलं तरी पुरे!दुध भाकरी, खिचडी, तूप, जवसाची चटणी, सूर्यनमस्कार घालणारी करीना विसरुन चालणार नाही. आणि आधुनिकतेच्या नावाखाली पारंपरिक आहारविचार बाजूला ठेवून बाळंतपणानंतर पिझा खाणंही फार बुद्धीमत्तेचं लक्षण नाही, हे एवढं जरी लक्षात ठेवलं तरी आपलं शरीर आपले आभार मानू शकेल!