शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

ब्रेकफास्ट टाळाल, तर वजनावर राहणार नाही कंट्रोल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 19:01 IST

प्रत्येक घरानं लावायला हवी सकाळच्या नाश्त्याची सवय..

ठळक मुद्देतुम्हाला कितीही काम असलं, अगदी बिझी शेड्यूल असलं तरीही ब्रेकफास्ट टाळणं हा त्यावरचा उपाय नाही.सकाळी घरातून लवकर बाहेर पडायचं असलं तरीही नेहेमीपेक्षा आणखी थोडं लवकर उठून घरी ब्रेकफास्ट करूनच बाहेर पडायला हवं.आपल्या तब्येतीसाठी तर ते चांगलं आहेच, पण इतर बिनबुलाए आजारांना टाळण्याचाही तो सर्वोत्तम उपाय आहे.

- मयूर पठाडेकामाचं रहाटगाडगं मागं लागलंय? आॅफिसमध्येही खूप लवकर जावं लागतंय आणि उशिरापर्यंत थांबावं लागतंय?.. त्यामुळे वेळेवर आणि पुरेसा ब्रेकफास्ट घ्यायलाही तुम्हाला वेळ मिळत नाहीए ना?..काय म्हणताय, तुम्ही ब्रेकफास्ट चक्क स्किपच करताय? आॅफिसमध्ये जाऊनच जे मिळेल ते घेताय किंवा थेट जेवणच तुम्ही करत असाल तर मग तुम्ही फार मोठी चूक करताय हे लक्षात घ्या.. प्रत्येकासाठी सकाळचा नाश्ता अत्यावश्यक असतो. घरी भरपेट नाश्ता करूनच घराबाहेर पडलं पाहिजे. तुम्ही फिटनेस फ्रिक असा किंवा नसा, पण नाश्ता टाळल्यामुळे तुमच्या वेटलॉसच्या निर्णयाचा पार बोºया वाजेल. कारण नाश्ता न करता बाहेर पडल्यावर, विशेषत: आॅफिस किंवा इतर कामाच्या ठिकाणी गेल्यावर आपोआपच काही अरबट चरबट खाणं आपल्याकडून होतं. त्यामुळे तुमच्याकडून अधिकच्या कॅलरीजही सेवन केल्या जातात. शिवाय ब्रेकफास्ट न करता घराबाहेर पडल्यामुळे जास्त कॅलरीज असलेल्या फास्ट फूडकडे आपोआपच आपण ओढले जातो आणि दुहेरी नुकसान होतं.तुम्हाला कितीही काम असलं, अगदी बिझी शेड्यूल असलं तरीही ब्रेकफास्ट टाळणं हा त्यावरचा उपाय नाही. सकाळी घरातून लवकर बाहेर पडायचं असलं तरीही नेहेमीपेक्षा आणखी थोडं लवकर उठून घरी ब्रेकफास्ट करूनच बाहेर पडायला हवं.आपल्या तब्येतीसाठी तर ते चांगलं आहेच, पण इतर बिनबुलाए आजारांना टाळण्याचाही तो सर्वोत्तम उपाय आहे.आहारतज्ञ आणि संशोधकांनी त्यामुळे सगळ्यांनाच आवर्जुन नाश्ता करण्याचा सल्ला दिला आहे. तुम्हाला सकाळी लवकर घराबाहेर पडायचं असो किंवा नसो, तुम्हाला ‘भूक’ असो नसो, प्रत्येकानं सकाळी व्यववस्थित ब्रेकफास्ट केलेला असला तर तब्येतीच्या अनेक तक्रारी त्यामुळे दूर राहतात.