शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

पाणी कमी पित असाल, तर तुम्हाला जडू शकतं साखरेचं व्यसन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 19:05 IST

‘गोडघाशा’ ही कौतुकाची नाही, चिंता करण्याचीच गोष्ट आहे!

ठळक मुद्देआपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झालं की आपल्याला साखर खावीशी वाटते. त्यामुळे आपलं शरीर डिहायड्रेटेड राहाणार नाही, याकडे कटाक्षानं लक्ष द्या.बराच वेळ उपाशी राहाण्यानं किंवा दिवसातून दोन- तिनदाच खात असाल तरीही शरीर साखरेची मागणी करतं.साखर खाण्याची इच्छा कमी करायची असेल तर ‘सी व्हेजिटेबल’ हा त्यावरचा उत्तम उपाय आहे.शरीरातील साखरेचं प्रमाण नेहमी स्थिर ठेवायला हवं. त्याचं प्रमाण अगदी कमी किंवा अगदी जास्त होणार नाही याकडे लक्ष द्यायला हवं.

- मयूर पठाडे‘गोडघाशा’ म्हणून आपण अनेकांचं कौतुक करतो. आपलं मूल जर खूप गोड खात असेल किंवा त्याला गोडाची फार आवड असेल तर विशेषत: आई त्या मुलाचं ‘गोडघाशा’ म्हणून इतकं काही कौतुक करते की बस! त्याला आवडतं म्हणून ती मुलाला मग सारखं गोडधोड करून खाऊदेखील घालत असत. त्यानं ती किती कृतकृत्य होत असते! पण अति साखर खाण्यानं आणि मुलाच्या या साखरवेडाला हातभार पुरवल्यानं आपलं मूल किती गंभीर समस्यांना भविष्यात सामोरं जाऊ शकतं याची त्या बिचाºया माऊलीला काही कल्पनाच नसते.त्यामुळे अति गोड खाण्याचा आणि तेही सातत्यानं खाण्याचा मोह आपल्याला सोडायलाच हवा. घरात जर कुणाला अशी सवय असेल तर त्या सवयीचं व्यसनात रुपांतर होणार नाही याकडेही कटाक्षानं लक्ष द्यायला हवं.साखरेची गोडी लागण्यात आणि साखर खावीशी वाटण्यातही अनेक घटक कारणीभूत असतात.१- एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी की, बºयाचदा आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झालं की आपल्याला साखर खावीशी वाटते. त्यामुळे आपलं शरीर डिहायड्रेटेड राहाणार नाही, याकडे कटाक्षानं लक्ष द्या. वेळच्या वेळी आणि पुरेसं पाणी आपल्या शरीराला मिळायलाचं हवं. ते मिळालं नाही की मग आपलं शरीर साखरेची, गोडाची मागणी करतं आणि मग साखरेची चटक लागत जाते. आपण जास्त गोड खातोय, ते आपल्याला आवडतं म्हणून हे कारण प्रत्येक वेळी खरं असेलच असं नाही. शरीरातील पाण्याची कमतरता हेदेखील त्याचं कारण असू शकतं.२- तुम्ही बराच वेळ उपाशी राहात असाल, दिवसातून दोनदा किंवा तिनदाच खात असाल तरीही शरीर साखरेची मागणी करतं. या दोन्ही तिन्ही वेळा तुम्ही अगदी भरपेट जेवत असला, तरीही असं होऊ शकतं. त्यामुळे रोज जेवढं आपण जेवतो, आपल्या शरीराला जेवढ्या अन्नाची गरज आहे, तेवढं अन्न आपण दिवसात पाच-सहा वेळा विभागून खाल्लं तर गोड पदार्थ खाण्याची आपली इच्छा नक्कीच कमी होईल.३- आपल्या शरीरातील साखरेचं प्रमाण नेहमी स्थिर ठेवायला हवं. त्याचं प्रमाण अगदी कमी किंवा अगदी जास्त होणार नाही याकडे लक्ष द्यायला हवं.४- साखर खाण्याची इच्छा जर आपल्याला वारंवार होत असेल तर त्यावर सी व्हेजिटेबल हा उत्तम उपाय आहे. नैसर्गिकरित्या त्यामध्ये खनिजं भरपूर प्रमाणात असतात. साखरेची लहर त्यामुळे उफाळून येणार नाही.आपलं आरोग्य जर आपल्याला चांगलं ठेवायचं असेल तर सुरुवातीपासूनच अति गोड खाण्यावर आपण नियंत्रण राखायला हवं. तुम्ही जर अति गोड आणि नेहेमी खाणाºयातले नसलात, तर काही धोका नाही, त्यासाठी साखरेला अगदी रामरामच केला पाहिजे असंही नाही, पण या गोडाची वाटचाल मात्र न्याहाळतच राहायला हवी.