शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

किती दिवस झालेत पायी चालून?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 19:18 IST

व्यायाम म्हणून तुम्ही चालत असालही, पण छोट्यामोठ्या कामांसाठीही पायीच फिरुन बघा तर खरी..

- मयूर पठाडेबघा आठवून.. पायी चालून किती दिवस झालेत?.. म्हणजे घरातल्या घरात किंवा आॅफिसमध्ये जे काही चालावं लागत असेल ते नाही. काही जण विशेषत: कारखान्यांमध्ये काम करणारे वर्कर्स, कर्मचारी बरेच तास उभे असतात. उभं राहाण्याचा त्यांचा जॉबच असतो. काही कर्मचाºयांना आॅफिसातल्या आॅफिसातही बराच काळ चालावं लागतं.. अनेकांना वाटतं, त्यातच आमचा खूप व्यायाम होतो, पण वैद्यकीय परिभाषेत याला व्यायाम म्हणत नाहीत. उलट ज्या वेळेस तुम्ही एकच एक काम सातत्यानं करता, त्यावेळी तुमच्या शरीराच्या त्या विशिष्ट भागावरच जास्त ताण येतो, त्यावर अनावश्यक जबाबदारी पडते आणि त्याची जास्त झीजही होते..काही जण व्ययामानिमित्त सकाळी फिरायला जात असतील, काही जण रनिंग, जॉगिंग करत असतील, तो अपवाद, पण खरंच सांगा, गेल्या किती दिवसांत तुम्ही जवळच्याच कोपºयावर असलेल्या भाजीबाजारात किंवा टपरीवर पायी चालत भाजी आणलीत? किती वेळा पायी किराणा दुकानातून वस्तू घेऊन आलात? मुलांसाठी काही वह्या, पुस्तकं, पेन किंवा इतर गोष्टी आणण्यासाठी गल्लीतल्याच स्टेशनरी दुकानात पायीच गेलात?..बहुतांश याचं उत्तर नकारात्मकच येईल. या सगळ्या गोष्टी आपण बºयाचदा करतोही, पण कसं? आॅफिसातून येताना, कामात काम म्हणून किंवा फक्त त्याच कामासाठी गेलो तरी गाडीवरच जातो.अभ्यासकांचं म्हणणं आहे, रोज किमान काही वेळ तरी आपण पायी चाललं पाहिजे. त्यातून अनेक गोष्टी साध्य होतात. मुख्य म्हणजे तुमच्या आरोग्यासाठी चालणं अत्यंत उपयोगी आहे. व्यायाम म्हणून तुम्ही चालता, त्यापेक्षाही रोजच्या अशा साध्या साध्या गोष्टी जर तुम्ही पायीच जाऊन करीत असाल, तर त्याचा जास्त उपयोग होतो हे आता सिद्ध झालेलं आहे.मुख्य म्हणजे यामुळे तुमचा ताणतणाव किमान निम्म्यानं कमी होतो. तुमचा संवाद वाढतो. हृदयाची शक्ती वाढते. उत्साह वाढतो. नवी आव्हानं घेण्यासाठी तुम्ही सज्ज होता..असं बरंच काही..मग पायी चालणार ना आता आजपासून?व्यायाम म्हणून तुम्ही चालत असलात, तरी जवळपासची छोटीमोठी कामंही जरा पायी फिरुनच करा. बघा.. तुम्हाला नक्कीच फ्रेश झाल्यासारखं वाटेल. नव्हे, तुम्ही व्हालच फ्रेश..अभ्यासकांचं म्हणणं आहे, रोज किमान काही वेळ तरी आपण पायी चाललं पाहिजे.व्यायाम म्हणून तुम्ही चालता, त्यापेक्षाही रोजच्या साध्या साध्या गोष्टी जर तुम्ही पायीच जाऊन करीत असाल, तर त्याचा जास्त उपयोग होतो.पायी चालण्यानं ताणतणाव कमी होतो. तुमचा संवाद वाढतो. हृदयाची शक्ती वाढते. उत्साह वाढतो.