शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

मोबाइलच्या स्क्रीनला तुम्ही किती वेळ चिकटलेले असता?

By admin | Updated: June 1, 2017 17:29 IST

रात्री लाइट बंद केल्यावरही तुमचं टेक्स्टिंग सुरूच असतं? मग या ११ गोष्टी खास तुमच्याचसाठी..

- मयूर पठाडेमोबाइलच्या स्क्रीनला आपण किती चिकटलेले असतो? मोबाइल जर हातातून थोडा वेळ जरी बाजूला राहिला तर आपल्याला किती अस्वस्थ होतं? उठता-बसता किती वेळा आपण मोबाइल चेक करतो? सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत किती वेळा आणि किती वेळ आपण त्यात तोंड घालून असतो? मित्र-मैत्रिणींसोबत रात्री किती वाजेपर्यंत आपण टेक्स्टिंग करत असतो? किती वेळ त्यावर व्हीडीओ पाहतो?..

विचारा स्वत:लाच. आणि आता काही वेळ तुमच्या हातातला मोबाइल जरा बाजूलाही काढून ठेवा. पाहूच नका त्याच्याकडे. तुमच्या लक्षात येईल मोबाइलच्या या स्क्रीनशिवाय आपण राहूच शकत नाही. थोडा वेळ जरी या स्क्रीनपासून आपण बाजूला गेलो तर आपल्याला अस्वस्थ वाटल्यासारखं होतंय.तरुणांमध्ये तर या स्क्रीनचं आॅब्सेशन आहेच, पण आता हे वयही कमी कमी होत जाऊन शाळकरी मुलांच्याही हातात मोबाइल आला आहे. तेही या स्क्रीनच्या वेडाला तितकेच सरावले आणि बळी पडले आहेत.पण ही धोक्याची घंटा आहे.

 

 

या संदर्भात जगातील सर्वात मोठं संशोधन नुकतंच करण्यात आलं.आॅस्ट्रेलियाच्या मर्डोक आणि ग्रिफिथ युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हे संशोधन केलं. तब्बल चार वर्षं हे संशोधन सुरू होतं.वेगवेगळ्या शाळांतले आठवतीले तब्बल ११०० मुलं त्यांनी निवडली आणि ते अकरावीला जाईपर्यंत त्यांचा आणि त्यांच्यावर मोबाइलच्या होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला. विशेषत: मुलांच्या मेंदूवर आणि त्यांच्या झोपेवर या स्क्रीनचा काय परिणाम होतो, याविषयीचा हा अभ्यास होता.त्यांच्या अभ्यासाचा निष्कर्ष सर्वांच्याच डोळ्यांत अंजन घालणारा आहे. आठवीत असणारी ही मुलं तेव्हा रात्री सारे जण झोपल्यावर आणि लाईट बंद केल्यावरही मोबाइलच्या स्क्रीनवर असायची. त्याचं प्रमाण होतं जवळपास ६५ टक्के. चार वर्षानंतर संशोधकांच्या लक्षात आलं, रात्री लाइट बंद झाल्यावरही स्क्रीनवर डोळे खिळवून बसण्याचं हे प्रमाण जवळपास ७८ टक्क्यांपेक्षाही अधिक झालं आहे आणि त्याचा परिणाम त्यांच्या केवळ शारीरिक क्षमतेवरच नाही, तर त्यांच्या मानसिक क्षमतेवरही त्याचा विपरित परिणाम झाला आहे. या अनैसर्गिक प्रकाशाचा धोका सर्वात मोठा आहे हेदेखील त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे रात्री लाइट बंद केल्यानंतर तर चुकूनही मोबाइलच्या स्क्रीनमध्ये डोळे खुपसून बसू नका, असा इशाराही संशोधकांनी दिला आहे. काय आढळून आलं संशोधकांना?मोबाइल स्क्रीनचे धोके

१- अर्थातच झोपेचं खोबरं होतं.२- एकाग्रता कमी होते.३- मूड सारखे बदलतात.४- चिडचिडेपणा वाढतो.५- खूप लवकर नैराश्य येतं.६- स्किल्स कमी होतात.७- होर्मोन्समध्ये बदल होतात.८- शरीरातील इन्सुलीनचं प्रमाण कमी जास्त होतं.९- शरीराचा एकूण समतोल, बॅलन्सच बिघडतो.१०- आकलन क्षमता कमी होते.११- अ‍ॅटिट्यूडवर परिणाम होतो..