शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

श्वासाचं बोट धरून वर्तमानात या, तुमचं जगणं तो समृद्ध करील..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 15:14 IST

भूतकाळ आणि भविष्यकाळातील आभासी जगण्यानं आयुष्याचा होतो कोंडमारा

ठळक मुद्देश्वासाबरोबर जगायला शिका.श्वासाचा उबदार अनुभव हरघडी घ्या..नक्की दिसतील सकारात्मक परिणाम.

- मयूर पठाडेअनेक जण असतात, ज्यांना एकतर भूतकाळानं पछाडलेलं असतं किंवा भविष्यकाळानं चिंतीत केलेलं असतं. वर्तमानकाळ जणू त्यांच्यासाठी नसतोच. एकतर ते भूतकाळात जगतात नाहीतर भविष्यकाळात..अर्थातच अशा लोकांच्या आयुष्यात त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात. कारण ‘वास्तवाशी’ संबंध नसलेल्या या गोष्टींचा त्यांना नुसता मनस्तापच होत नाही, तर वास्तविक काही करण्यातही अशा व्यक्ती बºयाचदा अपयशी ठरतात.आयुष्याचा सामना करायचा, ते जसं आहे तसं स्वीकारत पुढे जायचं, आपली प्रगती साधायची तर त्यासाठी वर्तमानाचा हात धरण्याशिवाय गत्यंतर नाही. कारण वर्तमानात ज्या काही गोष्टी तुम्ही करतात, त्या आणि त्याच गोष्टींचा प्रभाव तुमच्या संपूर्ण आयुष्यावर पडत असतो. तुम्ही कोण आहात किंवा भावी आयुष्यात तुम्ही कोण असणार आहात, हे तुमच्या वर्तमानावरच ठरत असतं. त्यामुळे भूतकाळात किंवा भविष्यकाळात रमण्यापेक्षा वर्तमानात जगणं केव्हाही महत्त्वाचं.पण वर्तमानात राहायचं तरी कसं?आपल्या मनाला आवरायचं तरी कसं?आता आपण वर्तमानातच जगायचं, असं नुसतं म्हणून तसं जगता येत नाही. त्यसाठी काही प्रयत्नही जाणीवपूर्वक करावे लागतात.त्यातला सर्वात महत्त्वाचा उपाय तज्ञांनी सांगितला आहे, तो म्हणजे आपल्या श्वासाबरोबर जगायचं. अर्थात तेही सोपं नाहीच, पण थोड्या प्रयत्नांनी ते जमू शकतं. निदान दिवसातला काही काळ, काही मिनिटं जरी तुम्ही तुमच्या श्वासाबरोबर म्हणजे वर्तमानात जगला, तरी त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो.जी वेळ आपल्या सोयीची असेल, दिवसाच्या त्या वेळी आपल्या श्वासाकडे लक्ष द्या. श्वास कसा येतो, कसा जातो ते अनुभवा. श्वासाचा तो उबदार अनुभव घ्या. आपल्या पोटाकडे लक्ष द्या. प्रत्येक श्वास आणि उच्छवासाबरोबर आपल्या पोटाचीही हालचाल होते. पोटाची ती हालचाल कशी होते ते अनुभवा. श्वास घेताना शरीरात हवा भरली जाते. त्यामुळे श्वास घेताना आपलं पोट थोडं फुगलं पाहिजे आणि श्वास सोडताना हवा बाहेर पडते. अशावेळी आपलं पोट खाली गेलं पाहिजे. श्वासाची आणि पोटाची ही हालचाल आपल्याला वर्तमानात राहायला शिकवेल. त्यामुळे श्वासाचं, आपल्या जगण्याचं बोट धरा आणि भूतकाळ, भविष्यकाळातून वर्तमानात या. तो तुमचं जगणं अधिक आश्वस्त करील..