शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

भावी डॉक्टर तुम्हीसुद्धा... तणावात? कारणे वेगवेगळी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2022 11:17 IST

अलीकडेच २५ ऑगस्ट आणि २१ सप्टेंबर रोजी अनुक्रमे केईएम आणि नायर या रुग्णालयातील विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. वैद्यकीयसारखे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना कोणत्या तणावाला सामोरे जावे लागत असेल?

संतोष आंधळे, विशेष प्रतिनिधी द्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता इतरांच्या तुलनेत नक्कीच चांगली असते. सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या या व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना एका विशिष्ट टप्प्यावर नैराश्य ग्रासते आणि त्यातून आत्महत्येसारख्या घटना घडतात. वैद्यकीय अभ्यासक्रम शिकत असताना तरुण भावी डॉक्टरांच्या आयुष्यात एवढा तणाव का निर्माण होत असावा, यामागची कारणे वेगवेगळी असली तरी इतिहासात प्रथमच राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) याची गंभीर दखल घेतली आहे. गेल्या पाच वर्षांत राज्यातील सर्व मेडिकल कॉलेज आणि विद्यापीठांत किती विद्यार्थांनी आत्महत्या केल्या, त्याचप्रमाणे  किती विद्यार्थी अभ्यासक्रम अर्धवट सोडून गेले इत्यादी माहिती आयोगाने मागवली आहे. तसेच वैद्यकीय अभ्यासक्रम शिकणारे विद्यार्थी किती तास काम करतात आणि त्यांना साप्ताहिक रजा कधी दिली जाते, ही माहितीही आयोगाने मागितली आहे. ही सर्व माहिती ७ ऑक्टोबरपर्यंत आयोगाच्या कार्यालयात ई-मेलद्वारे कळविणे अपेक्षित होते. 

महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड), ही राज्यातील रेसिडेंट डॉक्टरांची अधिकृत संघटना. ही ५० वर्षांंपेक्षा जुनी संघटना निवासी डॉक्टरांच्या न्यायहक्कासाठी भांडत असते. दरवर्षी या संघटनेचे पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेले नवनवीन पदाधिकारी आपल्या मागण्यांचे पत्रक घेऊन संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटत असतात.  १४ वर्षांपूर्वी जे जे रुग्णालयात शिकणारे आणि मार्डचे अध्यक्षपद भूषविणारे  डॉ. योगानंद पाटील म्हणाले, निवासी डॉक्टर म्हणून विद्यार्थ्याला शिकण्याची भूक असतेच, मात्र तोही एक माणूसच आहे, हे विसरता कामा नये. त्यालाही भावभावना आहेत याचे भान बाळगले जाणे महत्त्वाचे आहे. सार्वजनिक रुग्णालयांशी संलग्न असणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांत शिकणाऱ्या निवासी डॉक्टरला २४ तास काम करावे लागते. त्यात त्याची दमछाक होते. त्यालाही विरंगुळ्याची गरज असते. दिवसातील काही तास त्याला विश्रांती मिळेल का, या दृष्टीने पावले उचलण्याची गरज आहे. 

नैराश्यग्रस्तांना मदतीचा हात देणे गरजेचे एमबीबीएसचे शिक्षण घेत असताना विद्यार्थी आनंदी असणे अपेक्षित असते. वैद्यकीय अभ्यासक्रम हा इतर सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांपेक्षा वेगळा आहे. येथे विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा कस लागतो. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी घरंदारं सोडून डॉक्टरी शिकण्यासाठी शहरातील महाविद्यालयांच्या वसतिगृहात राहत असतात. घरापासून दूर शहरी वातावरणात राहून वैद्यकीयसारखा विषय शिकणे तसे जिकिरीचेच असते. या तणावामुळे कधी हे विद्यार्थी एकलकोंडे बनतात. त्यांना नैराश्य येते. अशावेळी त्यांना कोणीतरी मदतीचा हात देणे अपेक्षित असते. - डॉ. जयेश लेले, राष्ट्रीय सरचिटणीस, इंडियन मेडिकल असोसिएशन

वेळेवर उपचार मिळणे आवश्यकमेडिकलचे शिक्षण घेतेवेळी विद्यार्थ्यांना रुग्ण तपासणी, त्यांच्या चाचण्यांचे अहवाल, वॉर्डचे राउंड, अभ्यास या सर्व गोष्टींचा ताळमेळ साधावा लागतो. काही विद्यार्थी  भावनिकदृष्ट्या सक्षम नसतात. त्यांचे व्यक्तिमत्त्व अपरिपक्व असते. अशा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात समुपदेशनाची गरज असते. माझ्या काळात आम्ही कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून विद्यार्थी स्तरावर वेगवेगळे प्रयोग राबविले होते. कुणी विद्यार्थी नैराश्यग्रस्त वाटला तर त्याची कुठेही बाहेर ओळख न होऊ देता त्याच्यावर गरजेचे उपचार किंवा समुदेशन केले जायचे. २००२ ते २०१९ या काळात केईएम रुग्णालयात एकही अशी दुर्दैवी घटना घडली नव्हती.- डॉ. शुभांगी पारकर, मानसोपचारतज्ज्ञ आणि केईएमच्या माजी अधिष्ठाता

टॅग्स :doctorडॉक्टर