शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेत ‘फेल्युअर’? कमी मार्क्स, पोरानं घराण्याचं नाव घालवलं? भविष्याचं ‘वाटोळं’? अ‍ॅडमिशनचा बोऱ्या?..

By admin | Updated: May 31, 2017 16:13 IST

तुम्हाला मार्क्स हवेत की तुमचं मूल? रिझल्टच्या काळात खास पालकांसाठी नऊ टिप्स..

- मयूर पठाडेसध्या परीक्षांच्या रिझल्टचे दिवस आहेत. दहावी, बारावी, त्याचबरोबर सीईटी.. अशा अनेक परीक्षांचे रिझल्ट लागताहेत.. काहींचे रिझल्ट लागलेत, तर काहींचे लागायचेत. या परीक्षांमध्ये ज्यांना खरोखरच चांगले, आपल्या अपेक्षेप्रमाणे मार्क्स पडलेत किंवा पडतील, त्यांचं ठीक आहे, पण बहुतेकांचं तसं होत नाही. कितीही मार्क्स पडलेत तरी ते पालकांना आणि विद्यार्थ्यांनाही कमीच वाटतात. अर्थात आजच्या स्पर्धेच्या युगात ते साहजिकही आहे. कारण गुणांच्या या खैरातीत कितीही मार्क्स पडलेत तरीही आजकाल हव्या त्या शाखेला अ‍ॅडमिशन मिळण्याची मारामार.

 

पालकांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत सारेच जण रिझल्टच्या दिवसाची प्राण कंठात आणून वाट पाहात असतात. या परीक्षांमध्ये फेल होणं तर जाऊ द्या, पण कमी मार्क्स पडणं म्हणजेही फेल्युअरच मानलं जातं. अशावेळी विद्यार्थ्यांना प्रचंड टेन्शन येतं. आपल्या भविष्याचं, भवितव्याचं काय याचं मोठंच प्रश्नचिन्ह त्यांच्यासमोर आ वासून उभं राहातं. याशिवाय आपला हा ‘निकाल’ जर घरी कळला तर काय, आईवडील, पालक काय म्हणतील, किती झापतील, त्यांनी आणि आपणही घेतलेल्या आर्थिक, शारीरिक कष्टांचं काय चिज झालं.. म्हणून त्यांच्या डोक्यावर अक्षरश: आभाळ कोसळतं.अशावेळी बऱ्याचदा पालकही हतबल होतात आणि आपली सगळी भडास, फ्रस्ट्रेशन ते पाल्यांवर उतरवतात. पण हीच खरी वेळ आहे, आपल्या पाल्यांना समजून घेण्याची. पालक म्हणून तुम्ही जर सजग असाल, तर परीक्षेतल्या या मार्कांचं आणखी टेन्शन मुलांवर लादू नका. नाहीतर तुमचं मूल हातचं जाऊ शकतं. याच काळात ‘फेल्युअर’मुळे अनेक विद्यार्थी आत्महत्येचा मार्गही चोखाळतात. खरं तरी परीक्षेत नापास किंवा कमी मार्क्स मिळणं हे फेल्युअर नाही. विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्याचा हा मार्ग नव्हेच.

 

पालकांनीही एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की त्यांना खरोखर मार्क्स हवे आहेत, की आपलं मूल? फेल्युअरच्या टेन्शनपायी त्यानं नको ते करून घेतलं तर शेवटी हाती काय उरणार आहे?त्यामुळे खरंतर यावेळी विद्यार्थ्यांऐवजी पालकांनीच समजून घेण्याची गरज आहे.पालकांसाठी काही खास टिप्स१- आपल्या मुलाला खरोखरच कमी मार्क्स मिळाले असतील किंवा तो फेल झाला असेल तर जाहीरपणे आपली निराशा दाखवण्याऐवजी मुलाला समजून घ्या. त्याच्या पाठीशी उभे राहा. यशापेक्षाही अपयशातून माणूस सर्वाधिक शिकत असतो. तुमचा हाच सपोर्ट मुलाला नवी उभारी देऊन जाईल.२- लक्षात ठेवा, आपल्या पाल्यांची इतरांबरोबर तुलना कधीही करू नका. ‘तुझ्याच बरोबरचा ना तो? बघ, त्याला किती मार्क्स मिळाले आणि तुला?’ अशी तुलना मुलांचा आत्मविश्वासच खचवून टाकते.३- प्रत्येक मुलाची कपॅसिटी, स्ट्रेंथ, क्षमता, आवड वेगवेगळी असते. कोणी अभ्यासात चांगला, कोणी खेळात, कोणी तार्किक बुद्धिमत्तेत, कोणी कशात, तर कोणी कशात.. एका गोष्टीत फेल म्हणजे साऱ्यात फेल, असं कधीच होत नाही.४- अपयशामुळे आपलं मूलही निराशच झालं असेल. त्याच्या शेजारी बसा. प्रेमानं त्याला जवळ घ्या. तो कशात कमी पडला हे समजून घ्या आणि पुढच्या वेळी त्या गोष्टीवर अधिक लक्ष केंद्रित करा.५- आपल्या मुलाची स्ट्रेंग्थ काय आहे आणि विकनेस कशात आहे, याची पालक म्हणून आपल्याला कल्पना असलीच पाहिजे. त्यानुसारच त्यांच्या अभ्यासाचा वेळ आणि फोकस केंद्रित करायला हवा. ६- आपल्या अपेक्षा कायम वास्तव, रिअलिस्टिक आणि साध्य करता येण्याजोग्या असू द्या. नाहीतर या अपेक्षांच्या ओझ्याखाली आपलं मूलही कायम दडपलेलंच राहील आणि आपल्याही वाट्याला कायम नैराश्यच येईल. आत्ता आपण ज्यावरून नाराज झाला आहात किंवा मुलाला झापताहात, त्याचं कारणही हेच आहे का, याकडे एकदा स्वत: बघा आणि आत्मपरीक्षण करा.७- अपयश पचवायला शिकणं हेदेखील एक खूप मोठं शिक्षण असतं, जे कधीच पैसे देऊन शिकायला मिळत नाही हेदेखील लक्षात घ्या.८- आत्ताच्या रिझल्टमुळे किंवा (पुढे लागणाऱ्या रिझल्टनंतर) आपलं मूल नैराश्यात गेलंय का, ते एकटं एकटं राहतंय का, स्वत:शीच खूप कुढतंय का, ते खूप संताप करतंय का, त्याची भूक आणि झोप खूपच कमी झालंय का.. अशा गोष्टींकडेही बारीक लक्ष द्या.. वेळीच त्याला आधार द्या.. स्वत:चं काही बरंवाईट करून घेण्यापूर्वीची ही सर्वसाधारण लक्षणं आहेत एवढं लक्षात असू द्या.. आपलं मूल असं काही करणार नाही, इतका काही गुन्हा त्यानं केलेला नाही. त्याला घालूनपालून बोलू नका. चारचौघात अपमान करू नका.. ९- तुमचं मूल तुमच्याजवळ आहे, भविष्याच्या आव्हानांसाठी ते तयार आहे, यापेक्षा अधिक तुम्हालाही काय हवं?