शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

परीक्षेत ‘फेल्युअर’? कमी मार्क्स, पोरानं घराण्याचं नाव घालवलं? भविष्याचं ‘वाटोळं’? अ‍ॅडमिशनचा बोऱ्या?..

By admin | Updated: May 31, 2017 16:13 IST

तुम्हाला मार्क्स हवेत की तुमचं मूल? रिझल्टच्या काळात खास पालकांसाठी नऊ टिप्स..

- मयूर पठाडेसध्या परीक्षांच्या रिझल्टचे दिवस आहेत. दहावी, बारावी, त्याचबरोबर सीईटी.. अशा अनेक परीक्षांचे रिझल्ट लागताहेत.. काहींचे रिझल्ट लागलेत, तर काहींचे लागायचेत. या परीक्षांमध्ये ज्यांना खरोखरच चांगले, आपल्या अपेक्षेप्रमाणे मार्क्स पडलेत किंवा पडतील, त्यांचं ठीक आहे, पण बहुतेकांचं तसं होत नाही. कितीही मार्क्स पडलेत तरी ते पालकांना आणि विद्यार्थ्यांनाही कमीच वाटतात. अर्थात आजच्या स्पर्धेच्या युगात ते साहजिकही आहे. कारण गुणांच्या या खैरातीत कितीही मार्क्स पडलेत तरीही आजकाल हव्या त्या शाखेला अ‍ॅडमिशन मिळण्याची मारामार.

 

पालकांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत सारेच जण रिझल्टच्या दिवसाची प्राण कंठात आणून वाट पाहात असतात. या परीक्षांमध्ये फेल होणं तर जाऊ द्या, पण कमी मार्क्स पडणं म्हणजेही फेल्युअरच मानलं जातं. अशावेळी विद्यार्थ्यांना प्रचंड टेन्शन येतं. आपल्या भविष्याचं, भवितव्याचं काय याचं मोठंच प्रश्नचिन्ह त्यांच्यासमोर आ वासून उभं राहातं. याशिवाय आपला हा ‘निकाल’ जर घरी कळला तर काय, आईवडील, पालक काय म्हणतील, किती झापतील, त्यांनी आणि आपणही घेतलेल्या आर्थिक, शारीरिक कष्टांचं काय चिज झालं.. म्हणून त्यांच्या डोक्यावर अक्षरश: आभाळ कोसळतं.अशावेळी बऱ्याचदा पालकही हतबल होतात आणि आपली सगळी भडास, फ्रस्ट्रेशन ते पाल्यांवर उतरवतात. पण हीच खरी वेळ आहे, आपल्या पाल्यांना समजून घेण्याची. पालक म्हणून तुम्ही जर सजग असाल, तर परीक्षेतल्या या मार्कांचं आणखी टेन्शन मुलांवर लादू नका. नाहीतर तुमचं मूल हातचं जाऊ शकतं. याच काळात ‘फेल्युअर’मुळे अनेक विद्यार्थी आत्महत्येचा मार्गही चोखाळतात. खरं तरी परीक्षेत नापास किंवा कमी मार्क्स मिळणं हे फेल्युअर नाही. विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्याचा हा मार्ग नव्हेच.

 

पालकांनीही एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की त्यांना खरोखर मार्क्स हवे आहेत, की आपलं मूल? फेल्युअरच्या टेन्शनपायी त्यानं नको ते करून घेतलं तर शेवटी हाती काय उरणार आहे?त्यामुळे खरंतर यावेळी विद्यार्थ्यांऐवजी पालकांनीच समजून घेण्याची गरज आहे.पालकांसाठी काही खास टिप्स१- आपल्या मुलाला खरोखरच कमी मार्क्स मिळाले असतील किंवा तो फेल झाला असेल तर जाहीरपणे आपली निराशा दाखवण्याऐवजी मुलाला समजून घ्या. त्याच्या पाठीशी उभे राहा. यशापेक्षाही अपयशातून माणूस सर्वाधिक शिकत असतो. तुमचा हाच सपोर्ट मुलाला नवी उभारी देऊन जाईल.२- लक्षात ठेवा, आपल्या पाल्यांची इतरांबरोबर तुलना कधीही करू नका. ‘तुझ्याच बरोबरचा ना तो? बघ, त्याला किती मार्क्स मिळाले आणि तुला?’ अशी तुलना मुलांचा आत्मविश्वासच खचवून टाकते.३- प्रत्येक मुलाची कपॅसिटी, स्ट्रेंथ, क्षमता, आवड वेगवेगळी असते. कोणी अभ्यासात चांगला, कोणी खेळात, कोणी तार्किक बुद्धिमत्तेत, कोणी कशात, तर कोणी कशात.. एका गोष्टीत फेल म्हणजे साऱ्यात फेल, असं कधीच होत नाही.४- अपयशामुळे आपलं मूलही निराशच झालं असेल. त्याच्या शेजारी बसा. प्रेमानं त्याला जवळ घ्या. तो कशात कमी पडला हे समजून घ्या आणि पुढच्या वेळी त्या गोष्टीवर अधिक लक्ष केंद्रित करा.५- आपल्या मुलाची स्ट्रेंग्थ काय आहे आणि विकनेस कशात आहे, याची पालक म्हणून आपल्याला कल्पना असलीच पाहिजे. त्यानुसारच त्यांच्या अभ्यासाचा वेळ आणि फोकस केंद्रित करायला हवा. ६- आपल्या अपेक्षा कायम वास्तव, रिअलिस्टिक आणि साध्य करता येण्याजोग्या असू द्या. नाहीतर या अपेक्षांच्या ओझ्याखाली आपलं मूलही कायम दडपलेलंच राहील आणि आपल्याही वाट्याला कायम नैराश्यच येईल. आत्ता आपण ज्यावरून नाराज झाला आहात किंवा मुलाला झापताहात, त्याचं कारणही हेच आहे का, याकडे एकदा स्वत: बघा आणि आत्मपरीक्षण करा.७- अपयश पचवायला शिकणं हेदेखील एक खूप मोठं शिक्षण असतं, जे कधीच पैसे देऊन शिकायला मिळत नाही हेदेखील लक्षात घ्या.८- आत्ताच्या रिझल्टमुळे किंवा (पुढे लागणाऱ्या रिझल्टनंतर) आपलं मूल नैराश्यात गेलंय का, ते एकटं एकटं राहतंय का, स्वत:शीच खूप कुढतंय का, ते खूप संताप करतंय का, त्याची भूक आणि झोप खूपच कमी झालंय का.. अशा गोष्टींकडेही बारीक लक्ष द्या.. वेळीच त्याला आधार द्या.. स्वत:चं काही बरंवाईट करून घेण्यापूर्वीची ही सर्वसाधारण लक्षणं आहेत एवढं लक्षात असू द्या.. आपलं मूल असं काही करणार नाही, इतका काही गुन्हा त्यानं केलेला नाही. त्याला घालूनपालून बोलू नका. चारचौघात अपमान करू नका.. ९- तुमचं मूल तुमच्याजवळ आहे, भविष्याच्या आव्हानांसाठी ते तयार आहे, यापेक्षा अधिक तुम्हालाही काय हवं?