शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

दोन्ही समितींच्या चौकशी अहवालात तफावत बालमृत्यू प्रकरण : स्थानिक चौकशी समितीचे निष्कर्ष अमान्य

By admin | Updated: February 5, 2016 00:33 IST

जळगाव : जिल्हा रुग्णालयातील बालमृत्यूप्रकरणी स्थानिक चौकशी समिती व उच्चस्तरीय चौकशी समितीच्या अहवालात तफावत दिसून येत आहे. त्यामुळे आयएमएने स्थानिक चौकशी समितीच्या अहवालावर आक्षेप घेत तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे.

जळगाव : जिल्हा रुग्णालयातील बालमृत्यूप्रकरणी स्थानिक चौकशी समिती व उच्चस्तरीय चौकशी समितीच्या अहवालात तफावत दिसून येत आहे. त्यामुळे आयएमएने स्थानिक चौकशी समितीच्या अहवालावर आक्षेप घेत तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे.
बालमृत्यूप्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर.के. शेळके यांनी स्थानिक चौकशी समिती स्थापन केली होती. यामध्ये आरोग्य उपसंचालकांच्या पत्रानुसार डॉ. शेळके यांनी उपसंचालकांना या प्रकरणाची माहिती सादर केली होती.
यामध्ये असा निष्कर्ष काढला होता की, डॉ. मंदार काळे यांनी कर्तव्यात कसूर केला आहे. या उलट उच्च स्तरीय चौकशी समितीने म्हटले आहे की, डॉ. मंदार काळे (कंत्राटी) यांनी त्यांच्या १० पानी जबाबात व आकडेवारी चौकशी समितीस सादर केली असून त्यांनी कोणत्याही प्रकारचा बेजबाबदारपणा व हलगर्जीपणा अथवा कार्यात कसूर केला नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी सादर केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल २०१३ ते जुलै २०१३ दरम्यान नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण सुमारे २३.३८ टक्के होते, त्यांच्या नियुक्तीनंतर ऑगस्ट २०१३ ते मार्च २०१४ दरम्यान ते १९.१६ टक्के इतके कमी झाले. सदर बाब मनुष्यबळाची कमतरता यामुळे असल्याचे नमूद केली आहे तसेच त्यांना नेमून दिलेली कामे त्यांनी पूर्ण केली असून त्यास उच्चस्तरीय चौकशी समितीने सहमती दर्शविली आहे.
या शिवाय अतितातडीच्या वेळी डॉ. मंदार काळे यांना बोलविले असता ते उपस्थित राहिले नाही, असे स्थानिक चौकशी अहवालात म्हटले आहे. तर उच्चस्तरीय चौकशी समितीच्या अहवालात म्हटले आहे की, इमर्जन्सी कॉल अटेण्ड केल्याचे कॉल रजिस्टरबद्दल डॉ. मंदार काळे यांना कुठल्याही प्रकारची माहिती नसल्याबाबत त्यांनी नमूद केले असून बहुतांश मृत्यू अतिगंभीर आजारामुळे झाल्याचे म्हटले आहे, त्यालाही उच्चस्तरीय चौकशी समितीने सहमती दर्शविली आहे.
याशिवाय डॉ. शेळके यांनी येथील नवजात शिशू कक्षातील अधिकारी, कर्मचार्‍यांची संंख्या, येथे उपलब्ध सुविधा यांची माहिती सादर केली आहे तर उच्च स्तरीय समितीने येथे मनुष्यबळाची कमतरता असल्याचे म्हणत रिक्त पदे आढळून आल्याचे म्हटले आहे.
यामुळेच आयएमए संघटनेने डॉ. शेळके यांनी कोणतीही शहानिशा न करता अहवाल सादर केल्याने त्यांच्याविरुद्ध तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे. उच्चस्तरीय चौकशी समितीनेही तसा ठपका ठेवला आहे.