शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
3
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
4
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
5
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
6
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
7
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
8
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
9
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
10
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
11
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
12
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
13
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
14
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
15
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
16
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
17
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
18
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
19
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
20
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव

श्वासावर नियंत्रण ठेवा, ते तुमच्या मनालाही काबूत ठेवील!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 17:30 IST

सुखी जिवनाची गुरुकिल्ली दडलीय तुमच्याच मनात..

ठळक मुद्देमनाला काबूत ठेवायचं तर आधी श्वासावर नियंत्रण ठेवायला शिका.श्वासावर नियंत्रण ठेवलं तर आपोआपच तुमचं मनही ताब्यात राहील.सततच्या प्रयत्नांनी मनावर नियंत्रण ठेवणं आणि आयुष्य सुखी करणं शक्य.

- मयूर पठाडेजगात सर्वात, चंचल, चपळ असेल तर ते म्हणजे मन. काही केल्या ते थांबत नाही, हाताशी येत नाही आणि त्याला धरुनही ठेवता येत नाही. एका क्षणात या मनानं गिरक्या तरी किती घ्याव्यात आणि कुठून कुठे जावं?.. त्या कल्पनेलाही अंत नाही.पण मनावर जो ताबा मिळवतो तो संतपदाला पोहोचतो, असं आपल्या धर्मग्रंथांतही नमूद केलेलं आहे. पण मनाला ताब्यात ठेवण्याइतकी कठीण गोष्ट कोणतीच नाही. अनेक आव्हानं, जबाबदाºया अंगावर असताना आणि रोज, प्रत्येक क्षणाला वेगवेगळ्या स्पर्धांना तोंड द्यावं लागणाºय आजच्य काळात तर मन अधिकच चंचल झालेलं आहे.पण तुम्ही कोणीही असा, मनाला काबूत ठेवण्याची कला तुम्ही आत्मसात केलीच पाहिजे, नाहीतर मनाच्या या भन्नाट वेगात आपण कुठल्या कुठे भरकटत जाऊ, हेदेखील तितकंच खरं. अर्थातच भारतीय अध्यात्मात मनाला काबूत ठेवण्यासंदर्भात बरेच प्रयोग झाले आहेत. आपल्या ऋषिमुनींनी त्यावर अखंड चिंतन केलं आहे आणि ते शास्त्रसंमतही झालं आहे म्हणजे विज्ञानाच्या कसोटीवरही ते खरं उतरलं आहे. अलीकडच्या काळात भारताच्या या अध्यात्माचा परदेशांतही मोठ्या प्रमाणात अभ्यास सुरू आहे आणि त्यावर प्रयोगही केले जात आहेत. जे आपल्याला आधीच माहीत आहे, ते पुन्हा आपल्यालाच नव्या, रंगरुपांत सादर करुन सांगितलं जात आहे. तसंच आहे हे मनाचं. मनावर ताबा ठेवा, त्यावर कंट्रोल ठेवा, तुमच्या साºया दु:खाचं आणि आनंदाचं मूळही या मनात आहे, म्हणून मनावर लगाम ठेवला, तर तुमचं चित्तही समाधानी राहील आणि तुम्ही सुखी राहाल असा सल्ला पाश्चात्य अभ्यासकांनीही दिला आहे. आॅस्ट्रेलियातील काही अभ्यासकांनी यासंदर्भात नुकताच मोठा अभ्यास केला. त्यांच्या अभ्यासाचा निष्कर्ष सांगतो, भरकटणाºया मनाला काबूत ठेवायचं तर आधी श्वासावर नियंत्रण ठेवायला शिका. श्वासावर नियंत्रण ठेवलं तर आपोआपच तुमचं मनही ताब्यात राहील. सततच्या या प्रयत्नांनी मनाला तुम्ही थोडं तरी नियंत्रणात आणू शकाल. पण एकदा का ही किमया तुम्हाला साधली की, अनेक ताणांतून तुमची मुक्तता होईल आणि आयुष्य खºया अर्थानं जगायला तुम्ही शिकाल. मनाला लगाम घालण्याचे हे प्रयोग आपल्यालाही करुन पाहायला काय हरकत आहे! त्यातून तोटा काहीच नाही, झालाच तर फायदाच आहे!