शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

श्वासावर नियंत्रण ठेवा, ते तुमच्या मनालाही काबूत ठेवील!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 17:30 IST

सुखी जिवनाची गुरुकिल्ली दडलीय तुमच्याच मनात..

ठळक मुद्देमनाला काबूत ठेवायचं तर आधी श्वासावर नियंत्रण ठेवायला शिका.श्वासावर नियंत्रण ठेवलं तर आपोआपच तुमचं मनही ताब्यात राहील.सततच्या प्रयत्नांनी मनावर नियंत्रण ठेवणं आणि आयुष्य सुखी करणं शक्य.

- मयूर पठाडेजगात सर्वात, चंचल, चपळ असेल तर ते म्हणजे मन. काही केल्या ते थांबत नाही, हाताशी येत नाही आणि त्याला धरुनही ठेवता येत नाही. एका क्षणात या मनानं गिरक्या तरी किती घ्याव्यात आणि कुठून कुठे जावं?.. त्या कल्पनेलाही अंत नाही.पण मनावर जो ताबा मिळवतो तो संतपदाला पोहोचतो, असं आपल्या धर्मग्रंथांतही नमूद केलेलं आहे. पण मनाला ताब्यात ठेवण्याइतकी कठीण गोष्ट कोणतीच नाही. अनेक आव्हानं, जबाबदाºया अंगावर असताना आणि रोज, प्रत्येक क्षणाला वेगवेगळ्या स्पर्धांना तोंड द्यावं लागणाºय आजच्य काळात तर मन अधिकच चंचल झालेलं आहे.पण तुम्ही कोणीही असा, मनाला काबूत ठेवण्याची कला तुम्ही आत्मसात केलीच पाहिजे, नाहीतर मनाच्या या भन्नाट वेगात आपण कुठल्या कुठे भरकटत जाऊ, हेदेखील तितकंच खरं. अर्थातच भारतीय अध्यात्मात मनाला काबूत ठेवण्यासंदर्भात बरेच प्रयोग झाले आहेत. आपल्या ऋषिमुनींनी त्यावर अखंड चिंतन केलं आहे आणि ते शास्त्रसंमतही झालं आहे म्हणजे विज्ञानाच्या कसोटीवरही ते खरं उतरलं आहे. अलीकडच्या काळात भारताच्या या अध्यात्माचा परदेशांतही मोठ्या प्रमाणात अभ्यास सुरू आहे आणि त्यावर प्रयोगही केले जात आहेत. जे आपल्याला आधीच माहीत आहे, ते पुन्हा आपल्यालाच नव्या, रंगरुपांत सादर करुन सांगितलं जात आहे. तसंच आहे हे मनाचं. मनावर ताबा ठेवा, त्यावर कंट्रोल ठेवा, तुमच्या साºया दु:खाचं आणि आनंदाचं मूळही या मनात आहे, म्हणून मनावर लगाम ठेवला, तर तुमचं चित्तही समाधानी राहील आणि तुम्ही सुखी राहाल असा सल्ला पाश्चात्य अभ्यासकांनीही दिला आहे. आॅस्ट्रेलियातील काही अभ्यासकांनी यासंदर्भात नुकताच मोठा अभ्यास केला. त्यांच्या अभ्यासाचा निष्कर्ष सांगतो, भरकटणाºया मनाला काबूत ठेवायचं तर आधी श्वासावर नियंत्रण ठेवायला शिका. श्वासावर नियंत्रण ठेवलं तर आपोआपच तुमचं मनही ताब्यात राहील. सततच्या या प्रयत्नांनी मनाला तुम्ही थोडं तरी नियंत्रणात आणू शकाल. पण एकदा का ही किमया तुम्हाला साधली की, अनेक ताणांतून तुमची मुक्तता होईल आणि आयुष्य खºया अर्थानं जगायला तुम्ही शिकाल. मनाला लगाम घालण्याचे हे प्रयोग आपल्यालाही करुन पाहायला काय हरकत आहे! त्यातून तोटा काहीच नाही, झालाच तर फायदाच आहे!