शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

‘चिडका बिब्बा’! - मुलांची झोप जर पूर्ण होत नसेल तर ती अशीच राहतील किरकिरी..

By admin | Updated: May 27, 2017 16:10 IST

तुमच्या मुलांना रात्री वेळेवर झोपायची सवय तुम्ही लावली आहे? - तरच ती राहतील आनंदी आणि हुशार. नाहीतर..

- मयूर पठाडेआपली झोप झालेली नसेल, तर दुसरा दिवस किती डल जातो ना? काहीच सुचत नाही. काहीच करावंसं वाटत नाही. अख्खा दिवस आळसावलेला जातो. उत्साह नावाची तर गोष्टच नसते. कंटाळा येतो. काहीच करण्यात रस नसतो.. सगळं चैतन्यच हरवलेलं असतं.पण तेच झोप जर व्यवस्थित झालेली असेल, पुरेशी झोप घेतलेली असेल, तर दिवसभर आपल्या अंगात उत्साह कसा फसफसलेला असतो. सगळी कामंही झपाट्यानं होतात. थोडक्यात झोप आणि आपलं आरोग्य यात अत्यंत जवळचा संबंध आहे.पण लहान मुलांच्या बाबतीत तर हे आणखीच खरं आहे. पण बऱ्याच पालकांची तक्रार असते, आमची मुलं वेळेवर झोपत नाहीत, उठत नाहीत, उठवलं तरी उठत नाहीत आणि अगदीच बळजबरी केली, तर मग किरकिर, रडारड करतात.. काय करावं हेच आम्हाला सुचत नाही..

 

 खरंतर मुलं सकाळी लवकर उठत नाहीत, कारण रात्री ती लवकर झोपत नाहीत. रात्री वेळेवर, योग्य वेळी झोपली नाहीत, तर सकाळी उशिरापर्यंत मुलं झोपली तरी त्यांची झोप व्यवस्थित पूर्ण होत नाही. कारण आपल्याला शांत झोप लागण्याचाही ठराविक काळ असतो. त्या वेळेत झोपलं तर आपली झोप बऱ्यापैकी पूर्ण होते आणि दुसरा दिवसही मग उत्साहात जातो.याबाबत संशोधकांनी नुकताच एक सर्व्हे केला आणि काही निरीक्षणं मांडली. संशोधक म्हणतात, आपल्या मुलांनी वेळेवर झोपावं ही पालकांचीच जबाबदारी आहे. आणि त्यांनी वेळेवर झोपावं यासाठी लहानपणापासूनच त्यांना तशी सवय लावणं गरजेचं आहे. पालकांनी तशी नियमावलीच बनवायला हवी. मुलांची रोज ठराविक वेळी झोपण्याची सवय असेल तर त्याचा मुलांच्या आरोग्यावर नक्कीच सकारात्मक परिणाम होतो, ‘आमचा मुलगा रोज रात्री बारा-एकशिवाय झोपत नाही’, असं कौतुकानं सांगण्याचीही अनेक पालकांना सवय असते, पण ही कौतुकाची गोष्ट नक्कीच नाही. उलट पालकत्वाबाबत आपण कमी पडत आहोत हे समजून घेण्याची गोष्ट आहे. अपुऱ्या झोपेचा मुलांवरकाय परिणाम होतो?

 

१- मुलं जर रोज योग्य आणि ठराविक वेळा झापायला गेली तरच त्यांची झोप पूर्ण होते आणि त्यांना पुरेसा आराम मिळतो.२- मुलांची झोप जर पूर्ण झाली नाहीतर त्यांच्या वाढीवर तर परिणाम होतोच, पण भविष्यकाळावरही त्याचा परिणाम होतो आणि त्यांची ती लाइफस्टाइलच बनून जाते.३- पूर्ण आणि शांत झोप जर मुलांना लागत नसेल, तर त्यानं किती प्रॉब्लेम्स त्यांच्यात तयार व्हावेत?४-अपुऱ्या झोपेमुळे मुलांची एकाग्रता कमी होते. त्यांचा अटेन्शन स्पॅन कमी होतो. ५- अभ्यासावर परिणाम होतो. शालेय अभ्यासात ती मागे पडू शकतात. त्यांचे परिक्षेतले गुण कदाचित ‘उत्तम’ दिसत असले तरीही एकतर तो घोकंपट्टीचा परिणाम असतो, किंवा त्यापेक्षा कमी अभ्यास करूनही त्यांनी अधिक ज्ञान संपादन केलं असतं. ६- अशा मुलांचा सामाजिक सहभाग तुलनेनं बराच कमी असतो. ती एकलकोंडीही असू शकतात.७- मुलं कायम किरकिरी आणि चिडचिडीच राहातात.