शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

‘चिडका बिब्बा’! - मुलांची झोप जर पूर्ण होत नसेल तर ती अशीच राहतील किरकिरी..

By admin | Updated: May 27, 2017 16:10 IST

तुमच्या मुलांना रात्री वेळेवर झोपायची सवय तुम्ही लावली आहे? - तरच ती राहतील आनंदी आणि हुशार. नाहीतर..

- मयूर पठाडेआपली झोप झालेली नसेल, तर दुसरा दिवस किती डल जातो ना? काहीच सुचत नाही. काहीच करावंसं वाटत नाही. अख्खा दिवस आळसावलेला जातो. उत्साह नावाची तर गोष्टच नसते. कंटाळा येतो. काहीच करण्यात रस नसतो.. सगळं चैतन्यच हरवलेलं असतं.पण तेच झोप जर व्यवस्थित झालेली असेल, पुरेशी झोप घेतलेली असेल, तर दिवसभर आपल्या अंगात उत्साह कसा फसफसलेला असतो. सगळी कामंही झपाट्यानं होतात. थोडक्यात झोप आणि आपलं आरोग्य यात अत्यंत जवळचा संबंध आहे.पण लहान मुलांच्या बाबतीत तर हे आणखीच खरं आहे. पण बऱ्याच पालकांची तक्रार असते, आमची मुलं वेळेवर झोपत नाहीत, उठत नाहीत, उठवलं तरी उठत नाहीत आणि अगदीच बळजबरी केली, तर मग किरकिर, रडारड करतात.. काय करावं हेच आम्हाला सुचत नाही..

 

 खरंतर मुलं सकाळी लवकर उठत नाहीत, कारण रात्री ती लवकर झोपत नाहीत. रात्री वेळेवर, योग्य वेळी झोपली नाहीत, तर सकाळी उशिरापर्यंत मुलं झोपली तरी त्यांची झोप व्यवस्थित पूर्ण होत नाही. कारण आपल्याला शांत झोप लागण्याचाही ठराविक काळ असतो. त्या वेळेत झोपलं तर आपली झोप बऱ्यापैकी पूर्ण होते आणि दुसरा दिवसही मग उत्साहात जातो.याबाबत संशोधकांनी नुकताच एक सर्व्हे केला आणि काही निरीक्षणं मांडली. संशोधक म्हणतात, आपल्या मुलांनी वेळेवर झोपावं ही पालकांचीच जबाबदारी आहे. आणि त्यांनी वेळेवर झोपावं यासाठी लहानपणापासूनच त्यांना तशी सवय लावणं गरजेचं आहे. पालकांनी तशी नियमावलीच बनवायला हवी. मुलांची रोज ठराविक वेळी झोपण्याची सवय असेल तर त्याचा मुलांच्या आरोग्यावर नक्कीच सकारात्मक परिणाम होतो, ‘आमचा मुलगा रोज रात्री बारा-एकशिवाय झोपत नाही’, असं कौतुकानं सांगण्याचीही अनेक पालकांना सवय असते, पण ही कौतुकाची गोष्ट नक्कीच नाही. उलट पालकत्वाबाबत आपण कमी पडत आहोत हे समजून घेण्याची गोष्ट आहे. अपुऱ्या झोपेचा मुलांवरकाय परिणाम होतो?

 

१- मुलं जर रोज योग्य आणि ठराविक वेळा झापायला गेली तरच त्यांची झोप पूर्ण होते आणि त्यांना पुरेसा आराम मिळतो.२- मुलांची झोप जर पूर्ण झाली नाहीतर त्यांच्या वाढीवर तर परिणाम होतोच, पण भविष्यकाळावरही त्याचा परिणाम होतो आणि त्यांची ती लाइफस्टाइलच बनून जाते.३- पूर्ण आणि शांत झोप जर मुलांना लागत नसेल, तर त्यानं किती प्रॉब्लेम्स त्यांच्यात तयार व्हावेत?४-अपुऱ्या झोपेमुळे मुलांची एकाग्रता कमी होते. त्यांचा अटेन्शन स्पॅन कमी होतो. ५- अभ्यासावर परिणाम होतो. शालेय अभ्यासात ती मागे पडू शकतात. त्यांचे परिक्षेतले गुण कदाचित ‘उत्तम’ दिसत असले तरीही एकतर तो घोकंपट्टीचा परिणाम असतो, किंवा त्यापेक्षा कमी अभ्यास करूनही त्यांनी अधिक ज्ञान संपादन केलं असतं. ६- अशा मुलांचा सामाजिक सहभाग तुलनेनं बराच कमी असतो. ती एकलकोंडीही असू शकतात.७- मुलं कायम किरकिरी आणि चिडचिडीच राहातात.