शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

बीएएमएसच्या ८० टक्के प्रवेशावर रोख

By admin | Updated: October 3, 2015 00:20 IST

बीएएमएसच्या ८० टक्के प्रवेशावर रोख

बीएएमएसच्या ८० टक्के प्रवेशावर रोख
-विद्यार्थी अडचणीत : यंत्रसामुग्री व शिक्षकांची कमी

नागपूर : राज्यातील मेडिकल महाविद्यालयांतील एमबीबीएसच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत, परंतु बीएएमएसची प्रक्रिया रोखण्यात आल्याने विद्यार्थी अडचणीत आले आहे. भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेने केलेल्या पाहणीत अनेक त्रुटी आढळून आल्याने सुमारे ८० टक्के महाविद्यालयांमधील प्र्रवेश प्रक्रिया थांबविण्यात आल्याची माहिती आहे. यात नागपुरातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयासह, मुंबई, पुणे आणि नांदेडच्या महाविद्यालयांचा समावेश आहे.
शासकीय आयुर्वेद महाविद्यालयांत दरवर्षी प्रवेश प्रक्रियेपूर्वी भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेद्वारे तपासणी केली जाते. परिषदेच्या मानकाचे पालन न झाल्यास प्रवेश प्रक्रिया थांबविली जाते. राज्यभरात एकूण ६५ आयुर्वेद महाविद्यालये आहेत. यात चार शासकीय १८ अनुदानित तर उर्वरित खासगी महाविद्यालये आहेत. सूत्राच्या माहितीनुसार उस्मानाबाद येथील महाविद्यालयाला परवानगी देण्यात आली आहे, तर तीन शासकीय महाविद्यालयावर रोख लावण्यात आली आहे. सांगण्यात येते की, सुमारे १०-१२ खासगी महाविद्यालयांनाच प्रथम वर्षाच्या प्रवेशाला मंजुरी देण्यात आली. नागपूर आयुर्वेद महाविद्यालयाच्या बीएएमएस प्रथम वर्षाच्या १०० जागा आहेत. सोबतच याच सत्रात पदव्युत्तरच्या २१ जागांच्या पहिल्या टप्प्यातील प्रवेश होणार होते. परंतु या जागांवरील प्रवेश प्रक्रिया थांबविण्यात आल्या आहेत.
-५ ऑक्टोबरपर्यंत दिला वेळ
सूत्राच्या माहितीनुसार त्रुटी दूर करण्यासंदर्भातील अहवाल सादर करण्यासाठी परिषदेने ५ ऑक्टोबरपर्यंत वेळ दिला आहे. शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाची एक चमू या दिवशी दिल्लीतील भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेसमोर त्रुटी दूर करण्यासंदर्भातील उपाययोजनांची माहिती देईल. सांगण्यात येते की, महाविद्यालयांमधील उपकरणांची कमी, लेक्चर आणि काही विषयांचे प्राध्यापक नसल्याने या महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेवर रोख लावण्यात आली आहे. जर रोख हटविण्यात आली तर बीएएमएसच्या १०० आणि स्नातकोत्तरच्या २१ जागांवर प्रवेश दिले जातील.

बॉक्स...
-मुख्यमंत्री पुढाकार घेतील का?
शनिवार ३ ऑक्टोबर रोजी नागपुरातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सवाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाहतूक व जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी, वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे येणार आहेत. महाविद्यालयातील त्रुटींमुळे रोखण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेसाठी ही सर्व नेते मंडळी पुढाकार घेतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.