शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
2
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
3
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
4
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
5
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
6
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
7
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
8
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
9
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
10
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
11
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
12
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
13
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
14
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!
15
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
16
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
17
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
18
"मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
19
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
20
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर

बीएएमएसच्या ८० टक्के प्रवेशावर रोख

By admin | Updated: October 3, 2015 00:20 IST

बीएएमएसच्या ८० टक्के प्रवेशावर रोख

बीएएमएसच्या ८० टक्के प्रवेशावर रोख
-विद्यार्थी अडचणीत : यंत्रसामुग्री व शिक्षकांची कमी

नागपूर : राज्यातील मेडिकल महाविद्यालयांतील एमबीबीएसच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत, परंतु बीएएमएसची प्रक्रिया रोखण्यात आल्याने विद्यार्थी अडचणीत आले आहे. भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेने केलेल्या पाहणीत अनेक त्रुटी आढळून आल्याने सुमारे ८० टक्के महाविद्यालयांमधील प्र्रवेश प्रक्रिया थांबविण्यात आल्याची माहिती आहे. यात नागपुरातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयासह, मुंबई, पुणे आणि नांदेडच्या महाविद्यालयांचा समावेश आहे.
शासकीय आयुर्वेद महाविद्यालयांत दरवर्षी प्रवेश प्रक्रियेपूर्वी भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेद्वारे तपासणी केली जाते. परिषदेच्या मानकाचे पालन न झाल्यास प्रवेश प्रक्रिया थांबविली जाते. राज्यभरात एकूण ६५ आयुर्वेद महाविद्यालये आहेत. यात चार शासकीय १८ अनुदानित तर उर्वरित खासगी महाविद्यालये आहेत. सूत्राच्या माहितीनुसार उस्मानाबाद येथील महाविद्यालयाला परवानगी देण्यात आली आहे, तर तीन शासकीय महाविद्यालयावर रोख लावण्यात आली आहे. सांगण्यात येते की, सुमारे १०-१२ खासगी महाविद्यालयांनाच प्रथम वर्षाच्या प्रवेशाला मंजुरी देण्यात आली. नागपूर आयुर्वेद महाविद्यालयाच्या बीएएमएस प्रथम वर्षाच्या १०० जागा आहेत. सोबतच याच सत्रात पदव्युत्तरच्या २१ जागांच्या पहिल्या टप्प्यातील प्रवेश होणार होते. परंतु या जागांवरील प्रवेश प्रक्रिया थांबविण्यात आल्या आहेत.
-५ ऑक्टोबरपर्यंत दिला वेळ
सूत्राच्या माहितीनुसार त्रुटी दूर करण्यासंदर्भातील अहवाल सादर करण्यासाठी परिषदेने ५ ऑक्टोबरपर्यंत वेळ दिला आहे. शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाची एक चमू या दिवशी दिल्लीतील भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेसमोर त्रुटी दूर करण्यासंदर्भातील उपाययोजनांची माहिती देईल. सांगण्यात येते की, महाविद्यालयांमधील उपकरणांची कमी, लेक्चर आणि काही विषयांचे प्राध्यापक नसल्याने या महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेवर रोख लावण्यात आली आहे. जर रोख हटविण्यात आली तर बीएएमएसच्या १०० आणि स्नातकोत्तरच्या २१ जागांवर प्रवेश दिले जातील.

बॉक्स...
-मुख्यमंत्री पुढाकार घेतील का?
शनिवार ३ ऑक्टोबर रोजी नागपुरातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सवाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाहतूक व जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी, वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे येणार आहेत. महाविद्यालयातील त्रुटींमुळे रोखण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेसाठी ही सर्व नेते मंडळी पुढाकार घेतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.