शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भारतात वाढताहेत कर्करोगाचे रुग्ण; 2040 पर्यंत रुग्णसंख्या 20 लाखांवर जाणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 19:16 IST

हा आकडा देशाच्या आरोग्य व्यवस्थेसाठी मोठा इशारा आहे.

Cencer in India: भारताl कर्करोग ही एक गंभीर आरोग्य समस्या बनत चालली आहे. एकेकाळी वृद्धांशी संबंधित मानला जाणारा हा आजार आता तरुण आणि मध्यमवयीन लोकांनाही मोठ्या प्रमाणावर प्रभावित करतोय. बदलती जीवनशैली, वाढते प्रदूषण, असंतुलित आहार आणि लोकसंख्येतील वृद्धांचे प्रमाण वाढत असल्याने भविष्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

राज्य मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार, सध्याची परिस्थिती कायम राहिली तर 2040 पर्यंत भारतातील कर्करोग रुग्णांची संख्या 20 लाखांपर्यंत पोहोचू शकते. हा आकडा केवळ धक्कादायक नसून देशाच्या आरोग्य व्यवस्थेसाठीही मोठा इशारा आहे.

भारतावर वाढता कर्करोगाचा भार

राज्यसभेतील प्रश्नोत्तराच्या वेळी बोलताना डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, आजारांचे स्वरूप बदलत आहे. पूर्वी वृद्धांमध्ये आढळणारे आजार आता कमी वयातच दिसू लागले आहेत आणि कर्करोग त्यापैकी एक प्रमुख आजार ठरत आहे. कर्करोगाच्या रुग्णसंख्येत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. चीन आणि अमेरिकेनंतर भारतात सर्वाधिक कर्करोग रुग्ण आहेत. 

2024 पर्यंत कर्करोगाचे रुग्ण वाढणार

1) वृद्ध लोकसंख्येतील वाढ

भारतामध्ये 60 वर्षांवरील लोकसंख्या वेगाने वाढत आहे. वय वाढल्यास कर्करोगाचा धोका वाढतो. अभ्यासानुसार 60 ते 74 वयोगटात कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आढळते. लोकसंख्येचा आकार आणि वयाची रचना बदलत असल्याने एकूण रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे.

2) जीवनशैलीशी संबंधित सवयी

आजची जीवनशैली कर्करोगाला आमंत्रण देते. वैद्यकीय संशोधनानुसार भारतामधील सुमारे 70 टक्के कर्करोगाचे प्रकार टाळता येऊ शकतात, मात्र त्यासाठी सवयी बदलणे आवश्यक आहे.

मुख्य कारणांमध्ये तंबाखू, गुटखा सेवन, मद्यपानाचे अति प्रमाण, जंक फूड व असंतुलित आहार आणि शारीरिक हालचालींचा अभावाने आलेला लठ्ठपणा...यामुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो. यामध्ये तंबाखू हे आजही कर्करोगाचे सर्वात मोठे कारण आहे.

प्रदूषणही मोठा धोका

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) वायू प्रदूषणाला कर्करोगास कारणीभूत घटक म्हटले आहे. भारतातील अनेक शहरांमध्ये PM2.5 चे प्रमाण सुरक्षित मर्यादेपेक्षा खूप जास्त आहे. दीर्घकाळ प्रदूषित हवेत श्वास घेतल्याने फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका वाढतो, अगदी कधीही धूम्रपान न केलेल्या लोकांमध्येही.

भारतात कोणते कर्करोग वाढत आहेत?

महिलांमध्ये: स्तनाचा कर्करोग सर्वाधिक, त्यानंतर गर्भाशय मुखाचा (सर्व्हायकल) कर्करोग

पुरुषांमध्ये: तोंडाचा आणि फुफ्फुसांचा कर्करोग

फुफ्फुसांचा कर्करोग आता महिलांमध्येही वाढताना दिसतो

शहरी भागात: कोलोरेक्टल (आतड्यांचा) कर्करोग वाढतो आहे

ईशान्य राज्यांमध्ये: डोके आणि मानेचे कर्करोग अधिक प्रमाणात

सरकारी व आरोग्य संस्थांच्या अंदाजानुसार, प्रत्येक 9 पैकी 1 भारतीयाला आयुष्यात कधी ना कधी कर्करोग होण्याची शक्यता आहे. यावरून हा आजार आता कोणत्याही एका वयोगटापुरता किंवा वर्गापुरता मर्यादित राहिलेला नाही, हे स्पष्ट होते.

सरकारची तयारी आणि उपाययोजना

डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, देशातील जवळपास प्रत्येक जिल्हा रुग्णालयात कर्करोग उपचार सुविधा विकसित केल्या जात आहेत. कर्करोगाचे उपचार कमी खर्चात किंवा मोफत उपलब्ध करुन देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आरोग्य मंत्रालयाच्या सहकार्याने एक व्यापक राष्ट्रीय योजना राबवली जात असून, कर्करोगाचा वाढता धोका रोखण्यासाठी बहुआयामी उपाययोजना केल्या जात आहेत.

टॅग्स :cancerकर्करोगCancer Awarenessकॅन्सर जनजागृती