शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
2
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
3
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
4
Stock Market Today: शेअर बाजाराचं फ्लॅट ओपनिंग, १११ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; फार्मा-रियल्टी शेअर्स आपटले
5
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
6
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
7
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
8
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
9
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
10
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
11
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
12
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
13
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
15
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
16
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
17
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
18
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
19
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
20
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा

निरोगी जीवनासाठी ब्रेक फास्ट महत्त्वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2016 20:08 IST

शरीर निरोगी ठेवायचे असेल तर सकाळी ब्रेकफास्ट करणे आवश्यक आहे.

निरोगी राहण्यासाठी सकाळचा ब्रेकफास्ट हा फार महत्त्वाचा आहे. मात्र, या स्पर्धेच्या युगात अनेकांच्या जीवनशैलीचे वेळापत्रक पार बदलून गेले आहे. यामुळे ब्रेकफास्टही काहींना वेळेवर घेता येत नाही. त्याचे विविध प्रकारचे दुष्परिणामही आहेत. त्याकरिता शरीर निरोगी ठेवायचे असेल तर  सकाळी ब्रेकफास्ट करणे आवश्यक आहे. त्याकडे दुर्लक्ष केले तर त्याचे आरोग्यावर दुरगामी परिणामी होतात.  त्याचीच माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.  ब्रेकफास्ट का आहे आवश्यक :दररोज सकाळी  ब्रेकफास्ट करणे हे शरीरासाठी उत्तम आहे.  रात्रीच्या झोपेनंतर  पचनशक्तीला ताजेतवाने ठेवण्यासाठी पौष्टिक पदार्थांचा त्यामध्ये समावेश करावा. त्यामुळे कार्यक्षमता वाढण्यास मदत होऊन, दिवसभर काम करण्यासाठी ऊजार्ही मिळते. तसेच दुपारी जादा भूक लागत नाही व त्यामुळे पचनक्रियाही चांगली राहते. मनाची एकाग्रता ठेवण्यासाठीही सकाळचा ब्रेकफास्ट आवश्यक आहे.काय असावे ब्रेकफास्टमध्ये  : दडपे पोहे, दही पोहे, दूध पोहे, मक्याचे पोहे, हिरव्या पालेभाज्यांचे पराठे  खीर, खारीक, बदाम पूड, उकडलेले अंडी, सुकामेवा, शेंगणदाणा, राजगिरा, कणीक, मूग, नाचणी पिठाचा लाडू, थालीपीठ व पुºया, कॉर्नफ्लेक्स, आॅम्लेट पोळी , धिरडे,  फळे, सुकामेवा व मोड आलेली धान्य याचा ब्रेकफास्टमध्ये समावेश असावा.ब्रेकफास्टचे फायदे : सकाळी ब्रेकफास्ट केल्याने तब्येत उत्तम राहते. चिडचिडपणा होत नसून उलट एकाग्रता चांगली राहते. हृदयाचा आजार किंवा मधुमेह असणाºया रुग्णांसाठी तर  ब्रेकफास्ट हा खूप गरजेचा आहे.  शरीराला दिवसभर गतीशील ठेवण्यासाठी व  आळस दूर ठेवण्यासाठी आवश्यक आहे. सकाळी जर ब्रेकफास्ट केला नाहीतर वेळोवेळी खाण्याची इच्छा निर्माण होते. असे वेळोवेळी खाणे हे आरोग्यासाठी चांगले नसून, त्यामुळे विविध समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच त्यांचे वजनही वाढू शकते. ताज्या व पौष्टिक ब्रेकफास्टामुळे दिवसभर उत्साह राहतो. सकाळी घरातून बाहेर पडताना ब्रेकफास्ट करणे हे आवश्यक आहे.  तसेच लहान मुलांचे  अभ्यासात मन चांगले रमते. तसेच ते अधिक तळमळीने दिलेले काम पूर्ण करतात. जी मुले ब्रेकफास्ट करीत नाहीत. ती थकलेली वाटतात व चिडचिड्या स्वभावाची होतात.ब्रेकफास्ट ही एक फॅशन : ब्रेकफास्ट करणे हे आरोग्यासाठी उत्तम आहे. परंतू, अलीकडे फॅशन म्हणून ब्रेकफास्टकडे बघीतले जात आहे. घरी बे्रकफास्ट न करता बाहेर हॉटेलमध्ये जाऊन, ब्रेकफास्ट करणे ही आपल्याकडे फॅशन रुजत चालली आहे. त्यामुळे वीकेंडला तर हॉटेल फुल्ल होतात. cnxoldfiles/strong> : आपल्याकडील स्टार मंडळी ही  कामात कितीही बिझी असली. तरीही सकाळचा ब्रेकफास्ट वेळेवर घेतात. तसेच दररोज त्यामध्ये वेगवेगळ्या पौष्टिक पदार्थांचा समावेश असतो. सकाळच्या ब्रेकफास्टसाठी त्यांच्या फेमस हॉटेल्स या ठरलेल्या आहेत. यावरुनच ब्रेकफास्ट दररोजच्या आहारात किती महत्वाचा आहे, हे लक्षात येते.