शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

चाळीशीतील ब्लड प्रेशरमुळे नंतर होऊ शकतो स्मृतिभ्रंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 16:02 IST

पुरुषांच्या तुलनेत महिलांना मोठा धोका

ठळक मुद्देज्या महिलांना चाळीशीच्या दरम्यान हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांनी त्याकडे वेळीच लक्ष दिलं नाही, तर नंतरच्या आयुष्यात त्यांना विस्मृतीचा आजार होऊ शकतो.अशा महिलांना डिमेन्शियाचा धोका तब्बल ७५ टक्क्यांनी वाढतो.शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार कोणताही आजार आपल्याला त्याची पूर्वसूचना देत असतो. त्याकडे अतिशय गांभीर्यानं बघण्याची गरज आहे.

- मयूर पठाडेकोणत्याही गोष्टीचं तरुणपणांत काहीच वाटत नाही. हिंमत असते, रिस्क घेण्याची तयारी असते, कोणत्याही गोष्टीला हिंमतीनं सामोरं जाण्याची जिद्द असते.. पण ही हिंमत आणि जिद्द नको तिथे दाखवली तर नंतरच्या काळात त्याचे दुष्परिणाम भोगावेच लागतात.कॅलिफोर्निया येथील शास्त्रज्ञांनी नुकतंच एक संशोधन केलं. हे संशोधन खूपच महत्त्वाचं मानलं जातं. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांच्यासाठी आणि विशेषत: महिलांसाठी हे संशोधन खूपच उपयोगी आहे.शास्त्रज्ञांनी मध्यम वयातील म्हणजे तिशीच्या पुढील जवळपास साडेसात हजार स्त्री पुरुषांचा अभ्यास केला. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं, ज्या महिलांना चाळीशीच्या दरम्यान हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांनी त्याकडे वेळीच लक्ष दिलं नाही, तर नंतरच्या आयुष्यात त्यांना विस्मृतीचा म्हणजेच डिमेन्शियाचा आजार होऊ शकतो.चाळीशीतील ज्या महिलांना हा त्रास नाही किंवा ज्या नॉर्मल आहेत, त्यांच्यापेक्षा हाय ब्लड प्रेशर असलेल्या महिलांना डिमेन्शियाचा धोका तब्बल ७५ टक्क्यांनी वाढतो असं शास्त्रज्ञांचं निरीक्षण आहे.शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार कोणताही आजार आपल्याला त्याची पूर्वसूचना देत असतो. त्याकडे अतिशय गांभीर्यानं बघण्याची गरज आहे. एवढ्याशा गोष्टीनं काय होतं किंवा होईल बरं आपोआप.. असा जर आपला दृष्टिकोन असला तर मात्र नंतर मात्र त्या गोष्टींवर उपचार करणं तर कठीण होतंच, पण बºयाचदा काही गोष्टी हाताबाहेर जातात.त्यामुळे शास्त्रज्ञांचा सर्व पुरुष आणि महिलांना सल्ला आहे, तरुण वयातच, खरं तर लहान वयापासूनच आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ज्यांना चाळीशीत ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांनी वेळीच त्याकडे लक्ष देऊन उपचार घ्या.. नाहीतर नंतर तुम्हाला काहीच आठवणार नाही..