शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
3
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
4
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
5
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
6
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
7
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
8
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
9
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
10
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
11
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
12
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
13
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
14
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
15
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
16
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
17
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
18
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
19
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
20
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी

दातांवरून कळणार जन्मतारीख? डेंटिस्टचा दावा : तुर्भेतील १०१ मुलांना जन्मतारखेचे प्रमाणपत्र

By admin | Updated: August 19, 2015 22:27 IST

नवी मुंबई : आपला जन्म नेमका कधी झाला हे ज्यांना माहीत नसते, अशांची जन्मतारीख दातांवरून शोधणे शक्य असल्याचा दावा, डॉ. जयकुमार जयरामन यांनी केला आहे. आपल्या या संशोधनाला मान्यता मिळावी यासाठीचा प्रस्ताव त्यांनी राज्य सरकारकडे पाठवला आहे. जन्माची कसलीही नोंद नसलेल्या १०१ मुलांच्या दातांवर संशोधन करून त्यांनी त्यांच्या जन्मतारखा शोधून काढल्या आहेत.

नवी मुंबई : आपला जन्म नेमका कधी झाला हे ज्यांना माहीत नसते, अशांची जन्मतारीख दातांवरून शोधणे शक्य असल्याचा दावा, डॉ. जयकुमार जयरामन यांनी केला आहे. आपल्या या संशोधनाला मान्यता मिळावी यासाठीचा प्रस्ताव त्यांनी राज्य सरकारकडे पाठवला आहे. जन्माची कसलीही नोंद नसलेल्या १०१ मुलांच्या दातांवर संशोधन करून त्यांनी त्यांच्या जन्मतारखा शोधून काढल्या आहेत.
अनेक अनाथ आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटांतील मुलांना आपला वाढदिवस कधी असतो, हेच माहीत नसते. त्यामुळे इतरांप्रमाणे वाढदिवस साजरा करण्याची संधीच त्यांना मिळत नाही. जन्मतारखेची नोंद कुठेच नसल्याने त्यांच्या आयुष्यातही अनेक अडचणी येतात. सरकारी कामे अडून राहतात, परंतु जन्माच्या काही वर्षांनंतरही जन्मतारीख शोधता येऊ शकते, असा दावा डॉ. जयकुमार जयरामन यांनी केला आहे. त्याकरिता दंतचिकित्सेत संशोधनातून त्यांनी विशेष पद्धत अवगत केली आहे. आंध्रप्रदेश सरकारने या संशोधनाला मान्यता दिलेली असून महाराष्ट्र सरकारकडेही त्यांनी मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवला आहे. या संशोधनाची माहिती दंत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना देण्याकरिता नेरुळच्या तेरणा डेंटल कॉलेजमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. जयरामन यांच्या संशोधनातून जन्मतारीख मिळालेल्या १०१ मुलांना जन्मतारखेचे प्रमाणपत्र देण्यात आले. तेरणाचे अध्यक्ष व माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या, डॉ. फरिन कटागिया, डॉ. शिशिर सिंग यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
या संशोधनाकरिता जन्मतारीखच माहीत नसलेल्या तुर्भे एमआयडीसी व इतर झोपडप˜ी परिसरातील मुले शोधण्यात आली होती. त्यांच्या दातांचे एक्स-रे काढून त्यावर केलेल्या संशोधनातून त्यांना जन्मतारीख देण्यात आली. त्यामुळे कधी न साजरा झालेला जन्मदिवस भविष्यात निश्चित तारखेला साजरा होणार असल्याचा उत्साह या गरीब कुटुंबातील मुलांच्या चेहर्‍यावर दिसत होता. महाराष्ट्र राज्य शासनाने या संशोधनाला मान्यता देऊन त्याद्वारे अनेकांच्या जन्मतारखेचा प्रश्न सोडवण्याची गरज डॉ. जयरामन यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)