शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

दातांवरून कळणार जन्मतारीख? डेंटिस्टचा दावा : तुर्भेतील १०१ मुलांना जन्मतारखेचे प्रमाणपत्र

By admin | Updated: August 19, 2015 22:27 IST

नवी मुंबई : आपला जन्म नेमका कधी झाला हे ज्यांना माहीत नसते, अशांची जन्मतारीख दातांवरून शोधणे शक्य असल्याचा दावा, डॉ. जयकुमार जयरामन यांनी केला आहे. आपल्या या संशोधनाला मान्यता मिळावी यासाठीचा प्रस्ताव त्यांनी राज्य सरकारकडे पाठवला आहे. जन्माची कसलीही नोंद नसलेल्या १०१ मुलांच्या दातांवर संशोधन करून त्यांनी त्यांच्या जन्मतारखा शोधून काढल्या आहेत.

नवी मुंबई : आपला जन्म नेमका कधी झाला हे ज्यांना माहीत नसते, अशांची जन्मतारीख दातांवरून शोधणे शक्य असल्याचा दावा, डॉ. जयकुमार जयरामन यांनी केला आहे. आपल्या या संशोधनाला मान्यता मिळावी यासाठीचा प्रस्ताव त्यांनी राज्य सरकारकडे पाठवला आहे. जन्माची कसलीही नोंद नसलेल्या १०१ मुलांच्या दातांवर संशोधन करून त्यांनी त्यांच्या जन्मतारखा शोधून काढल्या आहेत.
अनेक अनाथ आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटांतील मुलांना आपला वाढदिवस कधी असतो, हेच माहीत नसते. त्यामुळे इतरांप्रमाणे वाढदिवस साजरा करण्याची संधीच त्यांना मिळत नाही. जन्मतारखेची नोंद कुठेच नसल्याने त्यांच्या आयुष्यातही अनेक अडचणी येतात. सरकारी कामे अडून राहतात, परंतु जन्माच्या काही वर्षांनंतरही जन्मतारीख शोधता येऊ शकते, असा दावा डॉ. जयकुमार जयरामन यांनी केला आहे. त्याकरिता दंतचिकित्सेत संशोधनातून त्यांनी विशेष पद्धत अवगत केली आहे. आंध्रप्रदेश सरकारने या संशोधनाला मान्यता दिलेली असून महाराष्ट्र सरकारकडेही त्यांनी मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवला आहे. या संशोधनाची माहिती दंत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना देण्याकरिता नेरुळच्या तेरणा डेंटल कॉलेजमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. जयरामन यांच्या संशोधनातून जन्मतारीख मिळालेल्या १०१ मुलांना जन्मतारखेचे प्रमाणपत्र देण्यात आले. तेरणाचे अध्यक्ष व माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या, डॉ. फरिन कटागिया, डॉ. शिशिर सिंग यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
या संशोधनाकरिता जन्मतारीखच माहीत नसलेल्या तुर्भे एमआयडीसी व इतर झोपडप˜ी परिसरातील मुले शोधण्यात आली होती. त्यांच्या दातांचे एक्स-रे काढून त्यावर केलेल्या संशोधनातून त्यांना जन्मतारीख देण्यात आली. त्यामुळे कधी न साजरा झालेला जन्मदिवस भविष्यात निश्चित तारखेला साजरा होणार असल्याचा उत्साह या गरीब कुटुंबातील मुलांच्या चेहर्‍यावर दिसत होता. महाराष्ट्र राज्य शासनाने या संशोधनाला मान्यता देऊन त्याद्वारे अनेकांच्या जन्मतारखेचा प्रश्न सोडवण्याची गरज डॉ. जयरामन यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)