शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

मित्रांना जपा, नाहीतर वार्धक्यात विस्मृतीचा धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 17:04 IST

केवळ आताच नाही, भविष्यातही कामाला येतात ते केवळ दोस्तच..

ठळक मुद्देमित्रमंडळींपासून तुम्ही दूर गेला असाल, तर तुमच्यासाठी ती धोक्याची घंटा आहे.कामानिमित्त मित्रमंडळींत रमणं तुम्हाला भले शक्य होत नसेल, पण त्याचा दुष्परिणाम उतारवयात जाणवू शकतो.ज्या लोकांना कमी मित्र आहेत, त्यांना उतारवयात विस्मृतीचा त्रास तुलनेनं लवकर जडू शकतो. त्यांची आकलनक्षमताही हळूहळू कमी होत जाते.

- मयूर पठाडेतुम्हाला मित्रमंडळी किती आहेत? तुम्ही त्यांच्यात किती मिसळता? तुमचं सोशल नेटवर्किंग कसं आहे? अर्थातच हे सोशल नेटवर्किंग म्हणजे आॅनलाइन किंवा इंटरनेटवर, सोशल साईट्सवर तुम्ही किती सक्रीय आहात याविषयी नाही. तुमचे खरेखुरे मित्र किती आहेत? शाळा-कॉलेजांत असताना कदाचित असतीलही, पण आता तुम्ही त्यांच्या किती संपर्कात आहात? किती वेळा एकमेकांना भेटता, बोलता? आपल्या सुख-दु:खाच्या किती गोष्टी तुम्ही एकमेकांशी करता? त्यात सहभागी होता?..असं काही तुम्ही करीत असाल, तर ठीक आहे, चांगलंच आहे ते, पण तुम्ही जर आपल्या सोशल नेटवर्किंगमधून आणि मित्रमंडळींपासून दूर गेला असाल, तर तुमच्यासाठी ती धोक्याची घंटा आहे हे लक्षात घ्या.कामानिमित्त आणि रोजच्या जबाबदाºयांमुळे तुम्हाला भले ते शक्य होत नसेल, पण त्याचा दुष्परिणाम तुम्हाला तुमच्या उतारवयात जाणवू शकतो.‘प्लॉस वन’ या प्रतिष्ठित सायंटिफिक जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिदध झालं आहे. संशोधकांनी नुकतंच असं सिद्ध केलं आहे की, ज्या लोकांना कमी मित्र आहेत, जे त्यांच्यात कमी मिसळतात, त्यांना उतारवयात विस्मृतीचा त्रास तुलनेनं लवकर जडू शकतो. त्यांची आकलनक्षमताही हळूहळू कमी होत जाते, मेंदूच्या संदर्भातील विकारांनी ते त्रस्त होता. जसजसं तुमचं वय वाढत जातं, तसतसं हा त्रास वाढत जाऊ शकतो. वयाच्या ऐंशीनंतर तर तुमच्या स्मृती फारच कमजोर होतात, पण मित्रमंडळींच्या सोबतीत तुम्ही जगत असाल, तर तुम्ही आनंदी राहालच, पण वाढत्या वयाचा तुमच्या शरीरावर कमीत कमी परिणाम होईल.त्यामुळे लक्षात घ्या, आपल्या मित्रमंडळींपासून तुम्ही दूर गेला असाल, तर तातडीनं त्यांच्याशी पुन्हा आपलं मैत्र जुळवा आणि वार्धक्याच्या समस्येपासून स्वत:ला दूर ठेवा.