शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

मित्रांना जपा, नाहीतर वार्धक्यात विस्मृतीचा धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 17:04 IST

केवळ आताच नाही, भविष्यातही कामाला येतात ते केवळ दोस्तच..

ठळक मुद्देमित्रमंडळींपासून तुम्ही दूर गेला असाल, तर तुमच्यासाठी ती धोक्याची घंटा आहे.कामानिमित्त मित्रमंडळींत रमणं तुम्हाला भले शक्य होत नसेल, पण त्याचा दुष्परिणाम उतारवयात जाणवू शकतो.ज्या लोकांना कमी मित्र आहेत, त्यांना उतारवयात विस्मृतीचा त्रास तुलनेनं लवकर जडू शकतो. त्यांची आकलनक्षमताही हळूहळू कमी होत जाते.

- मयूर पठाडेतुम्हाला मित्रमंडळी किती आहेत? तुम्ही त्यांच्यात किती मिसळता? तुमचं सोशल नेटवर्किंग कसं आहे? अर्थातच हे सोशल नेटवर्किंग म्हणजे आॅनलाइन किंवा इंटरनेटवर, सोशल साईट्सवर तुम्ही किती सक्रीय आहात याविषयी नाही. तुमचे खरेखुरे मित्र किती आहेत? शाळा-कॉलेजांत असताना कदाचित असतीलही, पण आता तुम्ही त्यांच्या किती संपर्कात आहात? किती वेळा एकमेकांना भेटता, बोलता? आपल्या सुख-दु:खाच्या किती गोष्टी तुम्ही एकमेकांशी करता? त्यात सहभागी होता?..असं काही तुम्ही करीत असाल, तर ठीक आहे, चांगलंच आहे ते, पण तुम्ही जर आपल्या सोशल नेटवर्किंगमधून आणि मित्रमंडळींपासून दूर गेला असाल, तर तुमच्यासाठी ती धोक्याची घंटा आहे हे लक्षात घ्या.कामानिमित्त आणि रोजच्या जबाबदाºयांमुळे तुम्हाला भले ते शक्य होत नसेल, पण त्याचा दुष्परिणाम तुम्हाला तुमच्या उतारवयात जाणवू शकतो.‘प्लॉस वन’ या प्रतिष्ठित सायंटिफिक जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिदध झालं आहे. संशोधकांनी नुकतंच असं सिद्ध केलं आहे की, ज्या लोकांना कमी मित्र आहेत, जे त्यांच्यात कमी मिसळतात, त्यांना उतारवयात विस्मृतीचा त्रास तुलनेनं लवकर जडू शकतो. त्यांची आकलनक्षमताही हळूहळू कमी होत जाते, मेंदूच्या संदर्भातील विकारांनी ते त्रस्त होता. जसजसं तुमचं वय वाढत जातं, तसतसं हा त्रास वाढत जाऊ शकतो. वयाच्या ऐंशीनंतर तर तुमच्या स्मृती फारच कमजोर होतात, पण मित्रमंडळींच्या सोबतीत तुम्ही जगत असाल, तर तुम्ही आनंदी राहालच, पण वाढत्या वयाचा तुमच्या शरीरावर कमीत कमी परिणाम होईल.त्यामुळे लक्षात घ्या, आपल्या मित्रमंडळींपासून तुम्ही दूर गेला असाल, तर तातडीनं त्यांच्याशी पुन्हा आपलं मैत्र जुळवा आणि वार्धक्याच्या समस्येपासून स्वत:ला दूर ठेवा.