शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

मित्रांना जपा, नाहीतर वार्धक्यात विस्मृतीचा धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 17:04 IST

केवळ आताच नाही, भविष्यातही कामाला येतात ते केवळ दोस्तच..

ठळक मुद्देमित्रमंडळींपासून तुम्ही दूर गेला असाल, तर तुमच्यासाठी ती धोक्याची घंटा आहे.कामानिमित्त मित्रमंडळींत रमणं तुम्हाला भले शक्य होत नसेल, पण त्याचा दुष्परिणाम उतारवयात जाणवू शकतो.ज्या लोकांना कमी मित्र आहेत, त्यांना उतारवयात विस्मृतीचा त्रास तुलनेनं लवकर जडू शकतो. त्यांची आकलनक्षमताही हळूहळू कमी होत जाते.

- मयूर पठाडेतुम्हाला मित्रमंडळी किती आहेत? तुम्ही त्यांच्यात किती मिसळता? तुमचं सोशल नेटवर्किंग कसं आहे? अर्थातच हे सोशल नेटवर्किंग म्हणजे आॅनलाइन किंवा इंटरनेटवर, सोशल साईट्सवर तुम्ही किती सक्रीय आहात याविषयी नाही. तुमचे खरेखुरे मित्र किती आहेत? शाळा-कॉलेजांत असताना कदाचित असतीलही, पण आता तुम्ही त्यांच्या किती संपर्कात आहात? किती वेळा एकमेकांना भेटता, बोलता? आपल्या सुख-दु:खाच्या किती गोष्टी तुम्ही एकमेकांशी करता? त्यात सहभागी होता?..असं काही तुम्ही करीत असाल, तर ठीक आहे, चांगलंच आहे ते, पण तुम्ही जर आपल्या सोशल नेटवर्किंगमधून आणि मित्रमंडळींपासून दूर गेला असाल, तर तुमच्यासाठी ती धोक्याची घंटा आहे हे लक्षात घ्या.कामानिमित्त आणि रोजच्या जबाबदाºयांमुळे तुम्हाला भले ते शक्य होत नसेल, पण त्याचा दुष्परिणाम तुम्हाला तुमच्या उतारवयात जाणवू शकतो.‘प्लॉस वन’ या प्रतिष्ठित सायंटिफिक जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिदध झालं आहे. संशोधकांनी नुकतंच असं सिद्ध केलं आहे की, ज्या लोकांना कमी मित्र आहेत, जे त्यांच्यात कमी मिसळतात, त्यांना उतारवयात विस्मृतीचा त्रास तुलनेनं लवकर जडू शकतो. त्यांची आकलनक्षमताही हळूहळू कमी होत जाते, मेंदूच्या संदर्भातील विकारांनी ते त्रस्त होता. जसजसं तुमचं वय वाढत जातं, तसतसं हा त्रास वाढत जाऊ शकतो. वयाच्या ऐंशीनंतर तर तुमच्या स्मृती फारच कमजोर होतात, पण मित्रमंडळींच्या सोबतीत तुम्ही जगत असाल, तर तुम्ही आनंदी राहालच, पण वाढत्या वयाचा तुमच्या शरीरावर कमीत कमी परिणाम होईल.त्यामुळे लक्षात घ्या, आपल्या मित्रमंडळींपासून तुम्ही दूर गेला असाल, तर तातडीनं त्यांच्याशी पुन्हा आपलं मैत्र जुळवा आणि वार्धक्याच्या समस्येपासून स्वत:ला दूर ठेवा.