शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

पाणी पिताना चुकताय?-सांभाळा, पचनाचा आजार होइल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 15:53 IST

पाणी काय आपण नेहमीच पितो, पण पाणी पिण्याची योग्य रीत आपल्याला माहिती आहे का?

ठळक मुद्देपाणी जीवनावश्यक आहेच, पण चुकीच्या रीतीने प्यायल्यामुळे अपाय होऊ शकतो!

पाणी आपण पितोच. ते जीवनावश्यक. पण जेवायला जसं आपल्याला शिकवण्यात आलं तसं पाणी प्यायचं काही कुणी शिकवत नाही. तोंडाला भांडं लावून आपण घटाघटा पाणी पितोच. पण चुकीच्या रीतीनं पाणी प्यायल्यामुळे शरीराला अपाय होवू शकतो असं आता आरोग्य अभ्यासक म्हणत आहेत.साधारण पाणी पिताना काही चुका सर्रास केल्या जातात किंवा होतात. त्या टाळाव्यात असं सांगणारे काही अभ्यास अलिकडेच प्रसिद्ध झाले आहेत. त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट. जी आजवर आपल्या घरातली वडीलधारी माणसं सांगत होतीच. ते म्हणजे बाहेरुन आल्यावर, टळटळीत उन्हातून आल्यावर लगेच पाणी पिऊ नये.दुसरं म्हणजे उभं राहून, भांडय़ाला तोंड न लावता वरुन पाणी पिऊ नये.ूउभ्यानं पाणी प्यायल्यास अपचनाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे कायम बसूनच पाणी प्यावे. बसून पाणी प्याल्यानं मृतपिंडाचे कामही सुरळीत चालते असा अभ्यास म्हणतो.सगळ्यात महत्वाचं म्हणजे अलिकडचा अत्यंत महत्वाचा प्रश्न. पाणी किती प्यावं. सकाळी उठल्याउठल्या पाणी प्यावं का?तर त्याचं उत्तर म्हणजे तहान लागली तरच पाणी प्यावं. वाटलं म्हणून, प्यायचंच म्हणून पाणी पिऊ नये. पाणी पितानाही ते ही एकदम घटाघटा पाणी न पिता, थोडं थोडं पाणी हळू हळू प्यावं. खूप घटाघटा पाणी प्यायल्यानं मन भरत नाही. तहान भागल्यासारखं वाटत नाही. त्यामुळे आपण जास्त पाणी पितो. त्यानं पोटात डब्ब झाल्यासारखं वाटतं. म्हणून सावकाश बसून पाणी पिणं उत्तम.