शहरं
Join us  
Trending Stories
1
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
2
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
3
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
4
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
5
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
6
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
7
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
8
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
9
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
10
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
11
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
12
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
14
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
15
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
16
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
17
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
18
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
19
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
20
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video

पाणी पिताना चुकताय?-सांभाळा, पचनाचा आजार होइल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 15:53 IST

पाणी काय आपण नेहमीच पितो, पण पाणी पिण्याची योग्य रीत आपल्याला माहिती आहे का?

ठळक मुद्देपाणी जीवनावश्यक आहेच, पण चुकीच्या रीतीने प्यायल्यामुळे अपाय होऊ शकतो!

पाणी आपण पितोच. ते जीवनावश्यक. पण जेवायला जसं आपल्याला शिकवण्यात आलं तसं पाणी प्यायचं काही कुणी शिकवत नाही. तोंडाला भांडं लावून आपण घटाघटा पाणी पितोच. पण चुकीच्या रीतीनं पाणी प्यायल्यामुळे शरीराला अपाय होवू शकतो असं आता आरोग्य अभ्यासक म्हणत आहेत.साधारण पाणी पिताना काही चुका सर्रास केल्या जातात किंवा होतात. त्या टाळाव्यात असं सांगणारे काही अभ्यास अलिकडेच प्रसिद्ध झाले आहेत. त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट. जी आजवर आपल्या घरातली वडीलधारी माणसं सांगत होतीच. ते म्हणजे बाहेरुन आल्यावर, टळटळीत उन्हातून आल्यावर लगेच पाणी पिऊ नये.दुसरं म्हणजे उभं राहून, भांडय़ाला तोंड न लावता वरुन पाणी पिऊ नये.ूउभ्यानं पाणी प्यायल्यास अपचनाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे कायम बसूनच पाणी प्यावे. बसून पाणी प्याल्यानं मृतपिंडाचे कामही सुरळीत चालते असा अभ्यास म्हणतो.सगळ्यात महत्वाचं म्हणजे अलिकडचा अत्यंत महत्वाचा प्रश्न. पाणी किती प्यावं. सकाळी उठल्याउठल्या पाणी प्यावं का?तर त्याचं उत्तर म्हणजे तहान लागली तरच पाणी प्यावं. वाटलं म्हणून, प्यायचंच म्हणून पाणी पिऊ नये. पाणी पितानाही ते ही एकदम घटाघटा पाणी न पिता, थोडं थोडं पाणी हळू हळू प्यावं. खूप घटाघटा पाणी प्यायल्यानं मन भरत नाही. तहान भागल्यासारखं वाटत नाही. त्यामुळे आपण जास्त पाणी पितो. त्यानं पोटात डब्ब झाल्यासारखं वाटतं. म्हणून सावकाश बसून पाणी पिणं उत्तम.