शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
4
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
5
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
6
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
7
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
8
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
9
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
10
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
11
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
12
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
13
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
14
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
15
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
16
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
17
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
18
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
19
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
20
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...

हृदयविकाराचं आणखी एक नवं कारण आलंय समोर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 15:19 IST

काय आहे हे कारण? सांभाळा स्वत:ला आणि वागा त्याप्रमाणे..

ठळक मुद्देआपल्या रक्तातील फॉस्फेटचं प्रमाण जर प्रमाणापेक्षा कमी असेल, तरीही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.फॉस्फेट म्हणजेच एक प्रकारचं खनीज. आपल्या शरीरात खनिजं आवश्यकच असतात आणि त्यांच्या कमतरतेमुळे विविध प्रकारचे आजारही आपल्याला होऊ शकतात.शास्त्रज्ञांचा दावा आहे की अशा प्रकारची ही जगातली पहिलीच चाचणी आहे.

- मयूर पठाडेनेमका कशामुळे येतो हार्ट अ‍ॅटॅक? हृदयविकाराची कारणं काय? आतापर्यंत यासंदर्भात अनेक कारणं सांगितली गेली, ती आपल्याला माहीतही आहेत. अर्थातच त्यात चुकीचं काहीच नाही. ही सर्व कारणं बरोबरच आहेत. टेन्शन, धुम्रपानापासून तर आपल्या अयोग्य जीवनशैलीपर्यंत अनेक कारणं हृदयविकाराला कारण ठरू शकतं.पण आता आणखी एक नवं कारण समोर आलं आहे. आपल्या रक्तातील फॉस्फेटचं प्रमाण जर प्रमाणापेक्षा कमी असेल, तरीही तुम्हाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.फॉस्फेट म्हणजेच एक प्रकारचं खनीज. आपल्या शरीरात खनिजं आवश्यकच असतात आणि त्यांच्या कमतरतेमुळे विविध प्रकारचे आजारही आपल्याला होऊ शकतात, त्यातलाच आणखी एक आजार म्हणजे हृदयविकार.यापूर्वीही शास्त्रज्ञांनी एक चाचणी घेतली होती. ती होती खनिजांचं प्रमाण आपल्या शरीरात जास्त असलं तर काय होतं? अर्थातच हे प्रमाण जास्त असलं तरीही आपल्याला विविध विकारांना सामोरं जावं लागतं. आत्ता संशोधकांनी जी चाचणी घेतली, ती होती शरीरातील खनिजांचं, विशेषत: रक्तातील फॉस्फेटचं प्रमाण कमी झालं तर शरीरावर त्याचा काय दुष्परिणाम होतो याची. शास्त्रज्ञांचा दावा आहे की अशा प्रकारची ही जगातली पहिलीच चाचणी आहे आणि त्यासाठी तब्बल एक लाख पेशंट्सचा पाच ते नऊ वर्षांपर्यंत अभ्यात करण्यात आला.त्यातून हे निरीक्षण समोर आलं आहे. त्यामुळे शास्त्रज्ञांचा प्रत्येकाला सल्ला आहे की आपल्या शरीरातील खनिजांचं प्रमाण प्रत्येकानं योग्य तेवढंच; म्हणजे कमीही नाही आणि जास्तही नाही.. असंच राखलं पाहिजे.