शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

अपुऱ्या झोपेमुळे ८१ टक्के मुंबईकर निद्रानाशाने ग्रस्त: सर्व्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 21:01 IST

असंतुलित झोप यांसारख्या समस्यांमध्ये वाढ होत असल्याची धक्कादायक बाब देशातील झोपेसंबंधी माहिती गोळा करण्यासाठी केलेल्या ग्रेट इंडियन स्लीप स्कोअरकार्ड २०१९ मध्ये स्पष्ट झाली आहे.

मुंबई : मुंबईकरांना पुरेशी झोप मिळत नसून त्याचे परिवर्तन निद्रानाश, असंतुलित झोप यांसारख्या समस्यांमध्ये वाढ होत असल्याची धक्कादायक बाब देशातील झोपेसंबंधी माहिती गोळा करण्यासाठी केलेल्या ग्रेट इंडियन स्लीप स्कोअरकार्ड २०१९ मध्ये स्पष्ट झाली आहे. पुरेशी झोप मिळत नसल्याचा परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यासह कामावरदेखील होत आहे. ८१% मुंबईकर निद्रानाशाच्या विकाराने ग्रस्त असून अपु-या झोपेमुळे ७८ टक्के मुंबईकरांना आठवड्यातून १-३ वेळा कामावर झोप येत असल्याचे सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे.सातत्यपूर्ण अपुऱ्या झोपेचे आपले मन आणि शरीरावर परिणाम होतात. आपल्याला सतत थकल्यासारखे वाटते आणि त्याचा त्रास होतो. या सर्वेक्षणातून हीच बाब प्रकर्षाने जाणवते. अपुऱ्या झोपेमुळे ५२ टक्के लोकांना पाठदुखीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आपल्या शरीराच्या रचनेनुसार रात्री १०-१०.३० ही झोपण्याची नियमित वेळ असावी असा सल्ला दिला जातो. सर्वेक्षणातून असे दिसून आले की ३६ टक्के लोक ७ तासांपेक्षा ही कमी झोपतात. तर ९० टक्के लोकांना लोकांना रात्रीत १-२ वेळा जाग येते.मुंबईकरांना रात्रभर जागवणा-या गोष्टींमध्ये स्मार्टफोन्सपासून टीव्हीपर्यंत सातत्याने मनोरंजन करणारी व्यासपीठे जबाबदार आहेत. सुमारे ९० टक्के लोक झोपण्यापूर्वी आपला फोन वापरतात. २४ टक्के प्रतिसादकांनी सांगितले की लॅपटॉपवर किंवा स्मार्टफोनवर काही कार्यक्रम पाहत पाहिल्याने ते जागे राहतात. तर कामाबाबत किंवा पैशांची चिंता सतावत असल्याने झोप न येणा-यांची संख्या २३ टक्के इतकी आहे.सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित गर्ग म्हणाले, झोपेच्या कमतरतेमुळे उच्च रक्तदाबापासून ते चिंता वाढण्यापर्यंत अनेक प्रकारच्या आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. ग्रेट इंडियन स्लीप स्कोअरकार्ड २०१९ मधून आपल्याला याची कल्पना येते की भारतीय लोक कसे या समस्यांकडे अजून दुर्लक्ष करत आहेत. यापेक्षा जास्त चिंतेची बाब ही आहे की, त्यापैकी बहुतांशी लोक झोपेसंबंधीच्या विकारांना खरी समस्या मानतच नाहीत. आम्ही भारतीयांचे एकंदर निद्रा-स्वास्थ्य सुधारण्यासाठी निरंतर प्रयत्न करत आहोतच पण याबाबत मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे.