शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

अपुऱ्या झोपेमुळे ८१ टक्के मुंबईकर निद्रानाशाने ग्रस्त: सर्व्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 21:01 IST

असंतुलित झोप यांसारख्या समस्यांमध्ये वाढ होत असल्याची धक्कादायक बाब देशातील झोपेसंबंधी माहिती गोळा करण्यासाठी केलेल्या ग्रेट इंडियन स्लीप स्कोअरकार्ड २०१९ मध्ये स्पष्ट झाली आहे.

मुंबई : मुंबईकरांना पुरेशी झोप मिळत नसून त्याचे परिवर्तन निद्रानाश, असंतुलित झोप यांसारख्या समस्यांमध्ये वाढ होत असल्याची धक्कादायक बाब देशातील झोपेसंबंधी माहिती गोळा करण्यासाठी केलेल्या ग्रेट इंडियन स्लीप स्कोअरकार्ड २०१९ मध्ये स्पष्ट झाली आहे. पुरेशी झोप मिळत नसल्याचा परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यासह कामावरदेखील होत आहे. ८१% मुंबईकर निद्रानाशाच्या विकाराने ग्रस्त असून अपु-या झोपेमुळे ७८ टक्के मुंबईकरांना आठवड्यातून १-३ वेळा कामावर झोप येत असल्याचे सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे.सातत्यपूर्ण अपुऱ्या झोपेचे आपले मन आणि शरीरावर परिणाम होतात. आपल्याला सतत थकल्यासारखे वाटते आणि त्याचा त्रास होतो. या सर्वेक्षणातून हीच बाब प्रकर्षाने जाणवते. अपुऱ्या झोपेमुळे ५२ टक्के लोकांना पाठदुखीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आपल्या शरीराच्या रचनेनुसार रात्री १०-१०.३० ही झोपण्याची नियमित वेळ असावी असा सल्ला दिला जातो. सर्वेक्षणातून असे दिसून आले की ३६ टक्के लोक ७ तासांपेक्षा ही कमी झोपतात. तर ९० टक्के लोकांना लोकांना रात्रीत १-२ वेळा जाग येते.मुंबईकरांना रात्रभर जागवणा-या गोष्टींमध्ये स्मार्टफोन्सपासून टीव्हीपर्यंत सातत्याने मनोरंजन करणारी व्यासपीठे जबाबदार आहेत. सुमारे ९० टक्के लोक झोपण्यापूर्वी आपला फोन वापरतात. २४ टक्के प्रतिसादकांनी सांगितले की लॅपटॉपवर किंवा स्मार्टफोनवर काही कार्यक्रम पाहत पाहिल्याने ते जागे राहतात. तर कामाबाबत किंवा पैशांची चिंता सतावत असल्याने झोप न येणा-यांची संख्या २३ टक्के इतकी आहे.सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित गर्ग म्हणाले, झोपेच्या कमतरतेमुळे उच्च रक्तदाबापासून ते चिंता वाढण्यापर्यंत अनेक प्रकारच्या आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. ग्रेट इंडियन स्लीप स्कोअरकार्ड २०१९ मधून आपल्याला याची कल्पना येते की भारतीय लोक कसे या समस्यांकडे अजून दुर्लक्ष करत आहेत. यापेक्षा जास्त चिंतेची बाब ही आहे की, त्यापैकी बहुतांशी लोक झोपेसंबंधीच्या विकारांना खरी समस्या मानतच नाहीत. आम्ही भारतीयांचे एकंदर निद्रा-स्वास्थ्य सुधारण्यासाठी निरंतर प्रयत्न करत आहोतच पण याबाबत मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे.