शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
6
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
7
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
8
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
9
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
10
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
11
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
12
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
13
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
14
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
15
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
17
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

उपचारादरम्यान १० महिन्याच्या बालकाचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आरोप : गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पावित्रा

By admin | Updated: December 3, 2015 00:35 IST

जळगाव : दिवाळीसाठी मामाच्या घरी आलेल्या विवाहितेच्या १० महिन्यांच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना बुधवारी अग्रवाल हॉस्पिटलमध्ये घडली. डॉक्टारांच्या हलगर्जीपणामुळेच बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून डॉक्टरांनी मात्र इन्कार केला आहे. श्वास गुदमरल्यामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. दरम्यान, या प्रकरणी जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पावित्रा नातेवाईकांनी घेतल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

जळगाव : दिवाळीसाठी मामाच्या घरी आलेल्या विवाहितेच्या १० महिन्यांच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना बुधवारी अग्रवाल हॉस्पिटलमध्ये घडली. डॉक्टारांच्या हलगर्जीपणामुळेच बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून डॉक्टरांनी मात्र इन्कार केला आहे. श्वास गुदमरल्यामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. दरम्यान, या प्रकरणी जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पावित्रा नातेवाईकांनी घेतल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी मगन गोमाभाऊ भोई, रा. जिजाऊनगर यांनी आपली भाची मंगला अशोक भोई (रा. विटा, जि. पुणे) हिला दिवाळीसाठी आपल्या घरी आणले होते. तिचा मुलगा प्रवीण (१० महिने) या बालकास सर्दी झाल्याने त्याला बुधवारी दुपारी १२ वाजता डॉ. विश्वेश अग्रवाल यांच्या अग्रवाल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर उपचार सुरू असताना दुपारी दोन वाजता या बालकाचा मृत्यू झाला.
हलगर्जीपणाचा आरोप
मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांना धक्का बसला असून याबाबत त्यांनी सांगितले की, मुलाला केवळ सर्दी असल्याने त्याला उपचारासाठी येथे आणले होते. डॉक्टरांनी मात्र त्याला दाखल करावे लागेल असे सांगून दोन हजार रुपये आगाऊ (ॲडव्हान्स) घेऊन बालकाला दाखल करून घेतले. उपचारादरम्यान बालकाला औषध दिले व त्याला उलटी होऊन त्यातच त्याचा मृत्यू झाला. हे उपचार करताना डॉक्टरांनी हलगर्जीपणा करीत चुकीचे उपचार केल्याने तसेच येथील नर्सेस स्टाफच्याही दुर्लक्षामुळे या बालकाचा मृत्यू झाला, असा आरोप मगन भोई यांनी केला आहे.
गुन्हा दाखल करा, मगच मृतदेह ताब्यात घेऊ
या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पावित्रा नातेवाईकांनी घेतला होता. त्यामुळे रुग्णालयात काहीसे तणावाचे वातावरण होते.
पोलिसांकडून चौकशी
रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर रामानंद नगर पोलिसांनी रुग्णालयात येऊन डॉक्टरांची चौकशी केली.
शवविच्छेदनानंतर होणार कारण स्पष्ट
या बालकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होईल, असे डॉक्टरांचे म्हणणे असून त्यासाठी शवविच्छेदन आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे होते.