शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

उपचारादरम्यान १० महिन्याच्या बालकाचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आरोप : गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पावित्रा

By admin | Updated: December 3, 2015 00:35 IST

जळगाव : दिवाळीसाठी मामाच्या घरी आलेल्या विवाहितेच्या १० महिन्यांच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना बुधवारी अग्रवाल हॉस्पिटलमध्ये घडली. डॉक्टारांच्या हलगर्जीपणामुळेच बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून डॉक्टरांनी मात्र इन्कार केला आहे. श्वास गुदमरल्यामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. दरम्यान, या प्रकरणी जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पावित्रा नातेवाईकांनी घेतल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

जळगाव : दिवाळीसाठी मामाच्या घरी आलेल्या विवाहितेच्या १० महिन्यांच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना बुधवारी अग्रवाल हॉस्पिटलमध्ये घडली. डॉक्टारांच्या हलगर्जीपणामुळेच बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून डॉक्टरांनी मात्र इन्कार केला आहे. श्वास गुदमरल्यामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. दरम्यान, या प्रकरणी जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पावित्रा नातेवाईकांनी घेतल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी मगन गोमाभाऊ भोई, रा. जिजाऊनगर यांनी आपली भाची मंगला अशोक भोई (रा. विटा, जि. पुणे) हिला दिवाळीसाठी आपल्या घरी आणले होते. तिचा मुलगा प्रवीण (१० महिने) या बालकास सर्दी झाल्याने त्याला बुधवारी दुपारी १२ वाजता डॉ. विश्वेश अग्रवाल यांच्या अग्रवाल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर उपचार सुरू असताना दुपारी दोन वाजता या बालकाचा मृत्यू झाला.
हलगर्जीपणाचा आरोप
मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांना धक्का बसला असून याबाबत त्यांनी सांगितले की, मुलाला केवळ सर्दी असल्याने त्याला उपचारासाठी येथे आणले होते. डॉक्टरांनी मात्र त्याला दाखल करावे लागेल असे सांगून दोन हजार रुपये आगाऊ (ॲडव्हान्स) घेऊन बालकाला दाखल करून घेतले. उपचारादरम्यान बालकाला औषध दिले व त्याला उलटी होऊन त्यातच त्याचा मृत्यू झाला. हे उपचार करताना डॉक्टरांनी हलगर्जीपणा करीत चुकीचे उपचार केल्याने तसेच येथील नर्सेस स्टाफच्याही दुर्लक्षामुळे या बालकाचा मृत्यू झाला, असा आरोप मगन भोई यांनी केला आहे.
गुन्हा दाखल करा, मगच मृतदेह ताब्यात घेऊ
या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पावित्रा नातेवाईकांनी घेतला होता. त्यामुळे रुग्णालयात काहीसे तणावाचे वातावरण होते.
पोलिसांकडून चौकशी
रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर रामानंद नगर पोलिसांनी रुग्णालयात येऊन डॉक्टरांची चौकशी केली.
शवविच्छेदनानंतर होणार कारण स्पष्ट
या बालकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होईल, असे डॉक्टरांचे म्हणणे असून त्यासाठी शवविच्छेदन आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे होते.