शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

धान वाचविण्यासाठी जि.प. पदाधिकारी सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2016 00:12 IST

पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी असलेले धानपिक करपण्याच्या मार्गावर आहे. अनेक ठिकाणी रोवणी खोळंबली असून पाण्याची नितांत गरज आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : सिंचन प्रकल्पाचे पाणी सोडाभंडारा : पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी असलेले धानपिक करपण्याच्या मार्गावर आहे. अनेक ठिकाणी रोवणी खोळंबली असून पाण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे टेकेपार व करचखेडा उपसा सिंचन योजनेतील पाणी सोडून धानपिक वाचवावे, अशी आर्त जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी केली आहे. याबबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्याना निवेदन दिले आहे.भंडारा जिल्हा तसेच करचखेडा व टेकेपार उपसा सिंचन योजनेतील लाभ क्षेत्रातील मागील काही दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिली आहे. निसर्गराजा कोपल्याने शेतकऱ्यांचे शेतातील धानपिके हातून जाण्याच्या मार्गावर आहे. या पिकांना पाण्याची गरज आहे. पाण्याअभावी शेतातील उभी पिके करपू लागली असून अनेक ठिकाणची रोवणी अडकलेली आहे. पावसाअभावी धान लागवड यावर्षी शक्य वाटत नसल्याने शेतकरी पुन्हा एकदा कर्जाच्या बोझ्याखाली दबण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दुष्काळामुळे शेतकरी नैराश्येत जावून विपरीत कृती करण्याची भिती व्यक्त होत आहे. करीता जिल्ह्यातील बंद असलेल्या टेकेपार व करचखेडा उपसा सिंचन योजना तात्काळ सुरू करून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदनातून केली आहे. यावेळी सुनिल पडोळे उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य उत्तम कळपाते, ज्योती खवास, ईश्वर कळंबे, नरेश येवले, मनिषा वाघमारे, नाना बडगे, ताराचंद भुरे, सखाराम कारेमोरे, गजानन कळंबे, संजय अहिरकर आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)