शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

जि.प. समाजकल्याण अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 20:48 IST

‘माहितीचा अधिकार’ कायद्यान्वये अर्जदाराला माहिती उपलब्ध करून न देणे तसेच महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाच्या खंडपीठ नागपूर येथे सुनावणीस उपस्थित न राहणे या बाबी माहितीच्या कायद्याच्या उद्दिष्टास मारक ठरणाऱ्या आहेत.

ठळक मुद्दे१० हजार रूपयांचा दंड : राज्य माहिती आयोग खंडपीठ नागपूरचा निर्णय

आॅनलाईन लोकमतगोंदिया : ‘माहितीचा अधिकार’ कायद्यान्वये अर्जदाराला माहिती उपलब्ध करून न देणे तसेच महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाच्या खंडपीठ नागपूर येथे सुनावणीस उपस्थित न राहणे या बाबी माहितीच्या कायद्याच्या उद्दिष्टास मारक ठरणाऱ्या आहेत. त्यामुळे राज्य माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठाने एका सुनावणीत, प्रथम अपिलिय अधिकारी तथा जिल्हा समाजकल्याण कार्यालय, जि.प. गोंदिया यांना १० हजारांचा दंड आणि शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस केली आहे.तिरोडा तालुक्याच्या पांजरा येथील महेंद्र नंदागवळी हे जनसेवा जयलक्ष भ्रष्टाचार निराकरण समितीचे संघटक आहेत. त्यांच्या अर्जावर संबंधित जनमाहिती अधिकाऱ्याने कसलीही कार्यवाही केली नाही. त्यांनी तक्रार केली. याची सुनावणी ४ आॅक्टोबर २०१६ रोजी सुनावणी झाली. त्यात दिलेल्या आदेशानुसार संबंधित जनमाहिती अधिकाऱ्याने कार्यवाही न केल्याने नंदागवळी यांनी आयोगाकडे पुन्हा तक्रार केली. याची सुनावणी १२ जुलै २०१७ रोजी झाली. त्यावेळी तक्रारकर्ते नंदागवळी हजर होते. मात्र जनमाहिती अधिकारी तसेच प्रथम अपिलिय अधिकारी हे काहीही न कळविता गैरहजर होते. त्यामुळे उपलब्ध कागदपत्रे व झालेल्या युक्तिवादावरून माहिती आयोगाने निर्णय दिला. त्यात जनमाहिती अधिकाºयाने अद्यापही माहिती उपलब्ध करून दिली नाही. आयोगाने आदेश देवूनही सदर अधिकाºयाने आदेशाचे पालन केले नाही. जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलिय अधिकारी हे द्वितीय अपिल सुनावणीस व नंतरच्या सुनावणीस गैरहजर असल्याने त्यांनी आयोगाच्या आदेशाची दखल घेतली नसल्याचे स्पष्ट होते. शिवाय या प्रकरणात त्यांनी दुर्लक्ष करित बेजबाबदारपणा दाखविला आहे. त्यामुळे अर्जदाराला माहिती मिळविण्यासाठी वारंवार हेलपाट्या घालाव्या लागल्या. त्यामुळे तक्रारकर्ता नुकसान भरपाईस पात्र ठरतो. त्यामुळे समाजकल्याण कार्यालय जि.प.गोंदिया यांनी कलम १९ (८) (ख) अन्वये ५ हजार रूपये नुकसानभरपाई तक्रारकर्त्यास धनादेशाद्वारे देवून त्याची पोच अविलंब आयोगास पाठवावी, असे आदेश दिले. तसेच सदर प्रकरणात जनमाहिती अधिकारी यांनी विहीत मुदतीत माहिती न दिल्याने व प्रथम अपिलिय अधिकारी यांनी सुनावणी न घेतल्यामुळे त्यांच्याकडून कलम ७ (१) व कलम १९ (६) चा भंग झाला आहे. त्याबाबत त्यांना खुलासा मागविण्यात आला होता. परंतु त्यांनी खुलासा दिला नाही. सदर प्रकरणात कोणतीही कार्यवाही केली नाही व सुनावणीदरम्यानही अनुपस्थित राहिले. त्यामुळे अपिलकर्त्याने माहिती मिळविण्यासाठी केलेली विनंती त्यांनी हेतुपुरस्पर नाकारल्याचे सिद्ध होते. त्यामुळे सदर अधिनियमाच्या कलम १९ (६) चा भंग झाला आहे. त्यामुळे कलम २० (२) व कलम १९ (८) नुसार शिस्तभंगाची शिफारस व माहिती आयोगाच्या आदेशाची अवहेलना झाल्यामुळे माहिती अधिकार अधिनियम २००५ मधील कलम २० (१) व कलम १९ (८) (ग) अन्वये संबंधित जि.प. समाजकल्याण अधिकाऱ्यांवर १० हजार रूपयांचा दंड आकारला. दंडाची रक्कम त्यांच्या वेतनातून सोयीनुसार हप्ते पाडून रक्कम जमा करावी व वसूल केलेल्या रकमेच्या चालानाच्या प्रती आयोगास सादर करावे, असे आदेश जिल्हा समाज कल्याण कार्यालय, जि.प. गोंदियाला दिले आहे.