शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

९९ हजार बालकांना देणार झिंक टॅबलेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 22:31 IST

नवजात व बाल मृत्यूदरात घट आणण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान सुरू ठेवण्यात आले. देशात ५ वर्षापर्यंतच्या बालकांचा मृत्यूचे मुख्य कारण डायरिया आहे. १० टक्के बालके डायरियाने दगावतात. मृत्यूचे प्रमाण उन्हाळ्यात व पावसाळ्यात अधिक होते.

ठळक मुद्देडायरिया पंधरवडा आजपासून : टॉस्कफोर्स समितीची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नवजात व बाल मृत्यूदरात घट आणण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान सुरू ठेवण्यात आले. देशात ५ वर्षापर्यंतच्या बालकांचा मृत्यूचे मुख्य कारण डायरिया आहे. १० टक्के बालके डायरियाने दगावतात. मृत्यूचे प्रमाण उन्हाळ्यात व पावसाळ्यात अधिक होते. डायरियावर नियंत्रण आणण्यासाठी राज्यात २८ मे ते ९ जूनपर्यंत विशेष अतिसार (डायरिया) नियंत्रण पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले. या पंधरवाड्यात जिल्ह्यातील ५ वर्षापर्यंतच्या ९९ हजार ३९२ बालकांना ओआरएस व झिंक टॅबलेट दिली जाणार आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर मातांना ओआरएस तयार करण्याचे प्रात्यक्षिक दिले जाणार आहे. ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत निवड करण्यात आलेल्या कुंभारटोली, घोगरा, येरंडी गावात अतिविशेष मिशन इंद्रधनूष अभियान आयोजित करण्यात आले आहे. अपूर्ण टिकाकरण व टिकाकरण न झालेल्या बालकांचा व गर्भवती मातांचे सर्वेक्षण करून संपूर्ण टिकाकरण करण्याचे निर्देश जिल्हा टास्क फोर्स समितीच्या बैठकीत दिले.या बैठकीत मुकाअ डॉ. राजा दयानिधि, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एस.डी. निमगडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, समाज कल्याण अधिकारी एम.आर.रामटेके, सहायक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विजय तितिरमारे, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे, साथरोग अधिकारी डॉ. बी. आर.पटले, तालुका आरोग्य अधिकरी डॉ. सी. आर. वंजारे, डॉ.गगन गुप्ता, डॉ.शीतल मोहबे, डॉ. ललित कुकडे, डॉ.दिनेश ब्राह्मणकर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे, जिल्हास्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक उपस्थित होते.डॉ.दयानिधी म्हणाले, नियमित टिकाकरण कार्यक्रमात प्रत्येक गावात टिकाकरण सत्राचे आयोजन करून सर्व गर्भवती माता व बालकांना सर्व पध्दतीने सुरक्षित केले जाईल. उर्वरीत गावांत अपूर्ण व टिकाकरण न झालेल्या बालक व गर्भवती मातांचे सर्वेक्षण करून टिकाकरण केले जाणार आहे.६७ हजार बालकांचा समावेशजिल्ह्यातील एकूण लोकसंख्या १३ लाख ३६ हजार २२१ आहे. यातील ९५ हजार ९२७ कुटुंबातील ५ वर्षातील ९९ हजार ३९३ बालकांना ओआरएस व जिंक टॅबलेट दिली जाणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील १८४६ आंगणवाडी व ११४० जिल्हा परिषद शाळांचा समावेश आहे.

टॅग्स :medicineऔषधं