शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

९९ हजार बालकांना देणार झिंक टॅबलेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 22:31 IST

नवजात व बाल मृत्यूदरात घट आणण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान सुरू ठेवण्यात आले. देशात ५ वर्षापर्यंतच्या बालकांचा मृत्यूचे मुख्य कारण डायरिया आहे. १० टक्के बालके डायरियाने दगावतात. मृत्यूचे प्रमाण उन्हाळ्यात व पावसाळ्यात अधिक होते.

ठळक मुद्देडायरिया पंधरवडा आजपासून : टॉस्कफोर्स समितीची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नवजात व बाल मृत्यूदरात घट आणण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान सुरू ठेवण्यात आले. देशात ५ वर्षापर्यंतच्या बालकांचा मृत्यूचे मुख्य कारण डायरिया आहे. १० टक्के बालके डायरियाने दगावतात. मृत्यूचे प्रमाण उन्हाळ्यात व पावसाळ्यात अधिक होते. डायरियावर नियंत्रण आणण्यासाठी राज्यात २८ मे ते ९ जूनपर्यंत विशेष अतिसार (डायरिया) नियंत्रण पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले. या पंधरवाड्यात जिल्ह्यातील ५ वर्षापर्यंतच्या ९९ हजार ३९२ बालकांना ओआरएस व झिंक टॅबलेट दिली जाणार आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर मातांना ओआरएस तयार करण्याचे प्रात्यक्षिक दिले जाणार आहे. ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत निवड करण्यात आलेल्या कुंभारटोली, घोगरा, येरंडी गावात अतिविशेष मिशन इंद्रधनूष अभियान आयोजित करण्यात आले आहे. अपूर्ण टिकाकरण व टिकाकरण न झालेल्या बालकांचा व गर्भवती मातांचे सर्वेक्षण करून संपूर्ण टिकाकरण करण्याचे निर्देश जिल्हा टास्क फोर्स समितीच्या बैठकीत दिले.या बैठकीत मुकाअ डॉ. राजा दयानिधि, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एस.डी. निमगडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, समाज कल्याण अधिकारी एम.आर.रामटेके, सहायक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विजय तितिरमारे, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे, साथरोग अधिकारी डॉ. बी. आर.पटले, तालुका आरोग्य अधिकरी डॉ. सी. आर. वंजारे, डॉ.गगन गुप्ता, डॉ.शीतल मोहबे, डॉ. ललित कुकडे, डॉ.दिनेश ब्राह्मणकर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे, जिल्हास्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक उपस्थित होते.डॉ.दयानिधी म्हणाले, नियमित टिकाकरण कार्यक्रमात प्रत्येक गावात टिकाकरण सत्राचे आयोजन करून सर्व गर्भवती माता व बालकांना सर्व पध्दतीने सुरक्षित केले जाईल. उर्वरीत गावांत अपूर्ण व टिकाकरण न झालेल्या बालक व गर्भवती मातांचे सर्वेक्षण करून टिकाकरण केले जाणार आहे.६७ हजार बालकांचा समावेशजिल्ह्यातील एकूण लोकसंख्या १३ लाख ३६ हजार २२१ आहे. यातील ९५ हजार ९२७ कुटुंबातील ५ वर्षातील ९९ हजार ३९३ बालकांना ओआरएस व जिंक टॅबलेट दिली जाणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील १८४६ आंगणवाडी व ११४० जिल्हा परिषद शाळांचा समावेश आहे.

टॅग्स :medicineऔषधं