शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बंदोबस्ताला आलेले जवान उपाशीच परतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 06:09 IST

१५ गोंदिया कॅम्प नागपूर येथील ई कंपनीच्या जवांनाना सुरक्षेसाठी देवरी तालुक्यातील चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत बंदोबस्तासाठी नेमण्यात आले होते.

गोंदिया : भंडारा-गोंदिया व गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत बंदोबस्तासाठी एसआरपीएफच्या गट १५ गोंदिया कॅम्प नागपूर येथील ई कंपनीच्या जवांनाना सुरक्षेसाठी देवरी तालुक्यातील चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत बंदोबस्तासाठी नेमण्यात आले होते. परंतु मतदान झाल्यानंतर त्यांना जेवणही न देता त्यांना उपाशीपोटी लगेच परत पाठविण्यात आल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त असल्याने जवांनानी मतदानाच्यावेळी चोख बंदोबस्त ठेवत कुठलीही चुक होऊ नये, याकरीता सतर्कतेने काम केले. त्यानंतर ११ एप्रिलला मतदान संपल्यानंतर लगेच ६ वाजताच पुणे येथे बंदोबस्तासाठी एसआरपीएफच्या जवानांना रवाना करण्यात आले. बोरगाव कँप येथे ५ मिनिटांचीही विश्रांतीही घेऊ दिली नाही. तातडीने पुणे ग्रामीण बंदोबस्तासाठी निघण्याचे आदेश देण्यात आले. परिणामी जवांनाना रात्रभर उपाशी प्रवास करण्याची वेळ आली. कारंजा लाड येथे पहाटे ४ वाजेच्या सुमारास पोहचताच थोडा वेळ जवांनानी तेथील एका पेट्रोलपंपावर विश्रांती घेण्याचा प्रयत्न केला. सकाळच्या सुमारास प्रात:विधी करण्यास अधिकाऱ्यांनी वेळ न देताच ६ वाजेच्या सुमारास पुण्याकडे पोलीस वाहन निघाले. ११ एप्रिलला सायकांळी ६ वाजता निघालेल्या जवांनाना १३ एप्रिलला दुपारी १ वाजेपर्यंत नाष्टा किंवा जेवण उपलब्ध करून दिले गेले नाही. ३ दिवस झोप न झाल्याने आमची प्रकृती बिघडली असल्याची जवानांची भावना असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.>सर्व जवांनाना आम्ही फूड पॅकेट दिले होते. जेवण दिले नाही, अशी कुणाचीही तक्रार माझ्याकडे आलेली नाही. परंतु सोशल मीडियावरून चाललेल्या प्रकारावरून त्या कंपनीचे कमांडंट जावेद अन्वर यांच्याशी चर्चा केल्यावर अशा प्रकारची कसलीही तक्रार नसून त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.- विनीता शाहू, पोलीस अधीक्षक, गोंदिया>मी घाबरत नाहीसोशल मीडियाद्वारे जवानांनी गोंदियाच्या पोलीस अधीक्षकांना माहिती देण्याचा प्रयत्न केला. जवांनाच्या राहण्याची जेवणाची व्यवस्था न करताच नायक पोलीस उपनिरिक्षक विश्वास हे रजेवर निघून गेले. परिस्थितीची जाणीव करु न दिल्यानंतरही त्यांनी मी कुणाला घाबरत नाही, असे म्हटल्याचे व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये नमूद केलेले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019bhandara-gondiya-pcभंडारा-गोंदिया