शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

युवक व महिलांनी क्रीडा क्षेत्रात पुढे यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:32 IST

अर्जुनी मोरगाव : आदिवासी ग्रामीण भागातील नवयुवक व महिलांमध्ये मैदानी खेळाच्या बाबतीत मोठे टॅलेंट आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत ग्रामीण भागातले ...

अर्जुनी मोरगाव : आदिवासी ग्रामीण भागातील नवयुवक व महिलांमध्ये मैदानी खेळाच्या बाबतीत मोठे टॅलेंट आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत ग्रामीण भागातले नैपुण्य सिद्ध झाले आहे. आदिवासी ग्रामीण भागातील युवक, युवतींनी क्रीडा क्षेत्रात मेहनत करून नैपुण्य प्राप्त करावे व देशाचा नावलौकिक करावा, असे प्रतिपादन गोंदिया जिल्हा भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष किरण कांबळे यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त यश बहुद्देशीय शिक्षण संस्थेद्वारा शुक्रवारी (दि. १७) पवनी धाबे येथे युवक व महिलांसाठी आयोजित धाव स्पर्धा व विविध कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी कान्होलीचे सरपंच संजय खरवडे, पवनी धाबेच्या सरपंच पपिता नंदेश्वर, रामपुरीच्या सरपंच सुषमा बुडगेवार, कोहलगावच्या सरपंच माधुरी चांदेवार, आनंदराव डोंगरवार, पराग कापगते, नरेश आदमने, नरेश बुडगेवार, प्रल्हाद गहाणे, मोहित मसराम, डोकू दररो उपस्थित होते.

कांबळे यांनी सांगितले, ग्रामीण आदिवासी भागात प्रचंड टॅलेंट आहे. युवक व युवतींना त्यांच्यात असलेले क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होत नाही. अशा भागात क्रीडा प्रशिक्षक नेमल्यास भविष्यात ऑलिम्पिक स्पर्धेसाठी खेळाडूंची उपलब्धता होऊ शकते. शासन व लोकप्रतिनिधींनी यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

या स्पर्धेत अनेक धावपटू युवक व महिलांनी सहभाग घेतला होता. यात गोठणगावच्या मिलिंद कोवे याने ५००१ रुपयांचे प्रथम तर श्रीकांत किरसान याने ३००१ रुपयांचे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. त्यांना किरण कांबळे यांच्या हस्ते बक्षीस वितरित करण्यात आले.