शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

यावर्षीही विद्यार्थ्यांशिवाय पार पडले ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:32 IST

केशोरी : दरवर्षी १५ ऑगस्ट (स्वातंत्र्यदिन) आणि २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) विद्यार्थ्यांसाठी मोठ्या उत्साहाचा समजला जातो. परंतु गेल्या ...

केशोरी : दरवर्षी १५ ऑगस्ट (स्वातंत्र्यदिन) आणि २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) विद्यार्थ्यांसाठी मोठ्या उत्साहाचा समजला जातो. परंतु गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोनाच्या महामारीने शाळा बंद असल्यामुळे या वर्षीही १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा विद्यार्थ्यांविनाच पार पाडावा लागला. त्यामुळे कोणत्याच शाळेत उत्साहाचे वातावरण दिसून आले नाही.

सध्या इयत्ता ८ ते १२ पर्यंतच्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. शासन आदेशानुसार विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित न ठेवता स्वातंत्र्यदिन सोहळा साजरा करावा असे आदेशात नमुद होते. अशात राष्ट्रीय कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होणाऱ्या देशाभिमानापासुन दूर ठेवण्याचा प्रयत्न शासनाकडून होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या प्रकारामुळे स्वातंत्र्यदिनी आनंदाचा जल्लोष दिसून आला नाही. यावर्षी कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी होताच १५ जुलै २०२१ पासून शासनाने ८ ते १२ पर्यंतच्या शाळा सुरु केल्या आहेत. अद्यापही पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरु करण्यात आल्या नाही. ज्या वर्गाचे विद्यार्थी शाळेत येणे सुरु आहे. त्या विद्यार्थ्यांना देखील राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होण्यापासून शासन वंचित ठेवत आहेत.

दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिवस आणि २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिवस विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शाळेतून गावागावात साजरा केला जातो. परंतु गेल्या वर्षीपासून कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांना वगळून साजरा करावा लागत आहे. जर शाळा सुरु नसत्या तर उपस्थितीचा प्रश्न निर्माण झाला नसता. परंतु शाळा सुरु होवूनही विद्यार्थ्यांना राष्ट्रीय कार्यक्रमापासून दूर ठेवणे हे विद्यार्थी हिताचे नाही. या प्रकारामुळे कोणत्याच गावात स्वातंत्र्याचा खरा जल्लोष दिसून आला नाही. गावातून निघणारी प्रभातफेरी, विद्यार्थ्यांच्या आवाजातून निर्माण होणारी ऊर्जा यातून देशाभिमान जागृत होतो. परंतु यावर्षी १५ ऑगस्टला विद्यार्थी नसल्यामुळे स्वातंत्र्याचा उत्साह पाहिजे तसा दिसून आला नाही. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून आली. शासन जिथे तिथे ऑनलाईन पद्धतीने सहभागी होण्यास सांगत असले तरीही खेड्यापाड्यात ऑनलाईन सपशेल फेल ठरली आहे.