शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
4
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
5
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
6
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
7
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
8
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
9
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
10
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
11
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
12
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
13
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
14
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
15
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
16
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
17
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
18
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
19
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
20
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं

‘त्या’ ३१ शाळांना यंदा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 22:26 IST

ज्या जिल्हा परिषद शाळेत चांगले शिक्षण दिले जात आहे. तेथील विद्यार्थी संख्या वाढत आहे. परंतु ज्या शाळेत चांगले शिक्षण दिले जात नाही त्या शाळेतील पटसंख्या घटत असल्याचा शासनाचा समज आहे.

ठळक मुद्देशिक्षण समितीचा निर्णय : पुढच्या वर्षी पटसंख्या वाढविण्यावर भर

आॅनलाईन लोकमतगोंदिया : ज्या जिल्हा परिषद शाळेत चांगले शिक्षण दिले जात आहे. तेथील विद्यार्थी संख्या वाढत आहे. परंतु ज्या शाळेत चांगले शिक्षण दिले जात नाही त्या शाळेतील पटसंख्या घटत असल्याचा शासनाचा समज आहे. शासनाने ० ते १० पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील ३१ शाळा बंद होण्याच्या मार्गावर होत्या. परंतु जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने यंदा ह्या ३१ शाळा बंद न करण्याचा ठराव घेतला आहे.सामाजिक कारणांमुळे राज्यातील काही शाळांची पटसंख्या अत्यंत कमी झाली आहे. ज्या शाळांतील पटसंख्या कमी आहे, त्या शाळांतील विद्यार्थ्यांचे सामाजिकरण करण्यास अडचण येत आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार २००९ व महाराष्टÑ बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २०११ च्या तरतूदीचे उल्लंघन होऊ नये म्हणून या शाळांतील विद्यार्थ्यांना जवळच्या गुणवत्तेच्या शाळेत समायोजित करण्याचे शासनाने ठरविले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ३२ शाळा ह्या १० पटसंख्या पेक्षा कमी असल्याने त्या बंद करण्यात येणार होत्या.आमगाव तालुक्यातील ६, सालेकसा तालुक्यातील ५, देवरी तालुक्यातील ४, सडक-अर्जुनी तालुक्यातील ७, गोरेगाव तालुक्यातील २ व तिरोडा तालुक्यातील एक शाळा बंद करण्यात येणार होती. परंतु यंदाचे सत्र संपायला केवळ ४ महिन्याच्या कालावधी असल्याने विद्यार्थ्यांना, पालकांना व शिक्षकांनाही त्रास होऊ नये,यासाठी यंदाचे चार महिने त्या ३१ शाळा त्याच ठिकाणी सुरू ठेवण्याचा ठराव शिक्षण समितीने घेतला आहे.सभापती पी. जी. कटरे, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, जि. प. सदस्य लता दोनोडे, माधुरी पाथोडे, सिमा मडावी, रजनी गौतम, प्रिती रामटेके, गिरीश पालीवाल, राजेश भक्तवर्ती व सर्व तालुक्यातील सगळे गटशिक्षणाधीकारी उपस्थित होते.दोन शाळांचे अंतर तीन किमी१० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना बंद करून त्या शाळेतील विद्यार्थी दुसºया शाळेत समायोजित करण्याचे शासनाने ठरविले. परंतु बंद शाळातील विद्यार्थी ज्या शाळेत समायोजित करीत असतील त्या शाळेचे अंतर बंद होणाºया शाळेतपासून एक किमी असावे असे ठरविण्यात आले. परंतु जिल्ह्यातील बंद होणाºया शाळांपैकी जरूघाटा या शाळेतील विद्यार्थी प्रतापगड शाळेला जोडल्यास हे अंतर ३ किमी तर खोळदा शाळा वडेगाव रेल्वेला जोडण्यात आली असून हे अंतर ३ किमी आहे. त्यामुळे हा विद्यार्थ्यांवर अन्याय आहे.या शाळांना दिलासाजि.प. प्राथ. शाळा जुनेवानी, डोंगरगाव सि., जरूघाटा, सुरगाव, शिकारीटोला, ढिवरटोला, नवाटोला, वाघाटोला, चिंताटोला, भोयरटोला, मूरपारटोला, गुरूटोला, चुडुरका, हौसीटोली, गराडा, आदिवासीटोली, खोलडा, सलंगटोला, टेमणी, हेटीटोला रामाटोला, हलबीटोला, गोंडीटोला, खामतलाव, सरेगाव, दसरूटोला, देवरी तालुक्याचा नवाटोला, सोनोली, पांढरवानी, सितेपार, मरामजोब, डव्वा व जांभळी पोरका या शाळांना चार महिन्यासाठी दिलासा मिळाला आहे.डोंगर-दरी, वाड्या-पाड्यावरील शाळांतील विद्यार्थ्यांना दुसºया शाळेत पाठविण्यासाठी पालकांना त्रास सहन करावा लागणार होता. जिल्ह्यातील बंद झालेल्या शाळांतील विद्यार्थ्यांना दुसºया शाळेत समायोजित केल्यास चिमुकल्यांना तीन-तीन किमी अंतरावर जावे लागेल. यासाठी शाळा बंद करू नये असा ठराव शिक्षण समितीच्या सभेत घेण्यात आला.-पी.जी.कटरेशिक्षण सभापती जि.प. गोंदिया.