शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ ३१ शाळांना यंदा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 22:26 IST

ज्या जिल्हा परिषद शाळेत चांगले शिक्षण दिले जात आहे. तेथील विद्यार्थी संख्या वाढत आहे. परंतु ज्या शाळेत चांगले शिक्षण दिले जात नाही त्या शाळेतील पटसंख्या घटत असल्याचा शासनाचा समज आहे.

ठळक मुद्देशिक्षण समितीचा निर्णय : पुढच्या वर्षी पटसंख्या वाढविण्यावर भर

आॅनलाईन लोकमतगोंदिया : ज्या जिल्हा परिषद शाळेत चांगले शिक्षण दिले जात आहे. तेथील विद्यार्थी संख्या वाढत आहे. परंतु ज्या शाळेत चांगले शिक्षण दिले जात नाही त्या शाळेतील पटसंख्या घटत असल्याचा शासनाचा समज आहे. शासनाने ० ते १० पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील ३१ शाळा बंद होण्याच्या मार्गावर होत्या. परंतु जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने यंदा ह्या ३१ शाळा बंद न करण्याचा ठराव घेतला आहे.सामाजिक कारणांमुळे राज्यातील काही शाळांची पटसंख्या अत्यंत कमी झाली आहे. ज्या शाळांतील पटसंख्या कमी आहे, त्या शाळांतील विद्यार्थ्यांचे सामाजिकरण करण्यास अडचण येत आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार २००९ व महाराष्टÑ बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २०११ च्या तरतूदीचे उल्लंघन होऊ नये म्हणून या शाळांतील विद्यार्थ्यांना जवळच्या गुणवत्तेच्या शाळेत समायोजित करण्याचे शासनाने ठरविले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ३२ शाळा ह्या १० पटसंख्या पेक्षा कमी असल्याने त्या बंद करण्यात येणार होत्या.आमगाव तालुक्यातील ६, सालेकसा तालुक्यातील ५, देवरी तालुक्यातील ४, सडक-अर्जुनी तालुक्यातील ७, गोरेगाव तालुक्यातील २ व तिरोडा तालुक्यातील एक शाळा बंद करण्यात येणार होती. परंतु यंदाचे सत्र संपायला केवळ ४ महिन्याच्या कालावधी असल्याने विद्यार्थ्यांना, पालकांना व शिक्षकांनाही त्रास होऊ नये,यासाठी यंदाचे चार महिने त्या ३१ शाळा त्याच ठिकाणी सुरू ठेवण्याचा ठराव शिक्षण समितीने घेतला आहे.सभापती पी. जी. कटरे, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, जि. प. सदस्य लता दोनोडे, माधुरी पाथोडे, सिमा मडावी, रजनी गौतम, प्रिती रामटेके, गिरीश पालीवाल, राजेश भक्तवर्ती व सर्व तालुक्यातील सगळे गटशिक्षणाधीकारी उपस्थित होते.दोन शाळांचे अंतर तीन किमी१० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना बंद करून त्या शाळेतील विद्यार्थी दुसºया शाळेत समायोजित करण्याचे शासनाने ठरविले. परंतु बंद शाळातील विद्यार्थी ज्या शाळेत समायोजित करीत असतील त्या शाळेचे अंतर बंद होणाºया शाळेतपासून एक किमी असावे असे ठरविण्यात आले. परंतु जिल्ह्यातील बंद होणाºया शाळांपैकी जरूघाटा या शाळेतील विद्यार्थी प्रतापगड शाळेला जोडल्यास हे अंतर ३ किमी तर खोळदा शाळा वडेगाव रेल्वेला जोडण्यात आली असून हे अंतर ३ किमी आहे. त्यामुळे हा विद्यार्थ्यांवर अन्याय आहे.या शाळांना दिलासाजि.प. प्राथ. शाळा जुनेवानी, डोंगरगाव सि., जरूघाटा, सुरगाव, शिकारीटोला, ढिवरटोला, नवाटोला, वाघाटोला, चिंताटोला, भोयरटोला, मूरपारटोला, गुरूटोला, चुडुरका, हौसीटोली, गराडा, आदिवासीटोली, खोलडा, सलंगटोला, टेमणी, हेटीटोला रामाटोला, हलबीटोला, गोंडीटोला, खामतलाव, सरेगाव, दसरूटोला, देवरी तालुक्याचा नवाटोला, सोनोली, पांढरवानी, सितेपार, मरामजोब, डव्वा व जांभळी पोरका या शाळांना चार महिन्यासाठी दिलासा मिळाला आहे.डोंगर-दरी, वाड्या-पाड्यावरील शाळांतील विद्यार्थ्यांना दुसºया शाळेत पाठविण्यासाठी पालकांना त्रास सहन करावा लागणार होता. जिल्ह्यातील बंद झालेल्या शाळांतील विद्यार्थ्यांना दुसºया शाळेत समायोजित केल्यास चिमुकल्यांना तीन-तीन किमी अंतरावर जावे लागेल. यासाठी शाळा बंद करू नये असा ठराव शिक्षण समितीच्या सभेत घेण्यात आला.-पी.जी.कटरेशिक्षण सभापती जि.प. गोंदिया.