शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी महिलांचे संसार फुलू लागले

By admin | Updated: July 22, 2015 02:09 IST

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील आदिवासीबहुल वारव्ही, परसटोला, अरततोंडी, धमदीटोला, खडकी, उमरपायली, जांभळी या गावात प्रामुख्याने धानपीक घेतले जात होते.

आर्थिक टंचाईवर मार्ग : कोसा शेतीमधून हेक्टरी पाच ते सात हजार कोस निर्मितीकेशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील आदिवासीबहुल वारव्ही, परसटोला, अरततोंडी, धमदीटोला, खडकी, उमरपायली, जांभळी या गावात प्रामुख्याने धानपीक घेतले जात होते. या परिसरात सिंचनाची व्यवस्था पुरेशी नसल्याने दरवर्षी या आदिवासी कुटुंबांना दुष्काळाशी सामना करावा लागत असे. पर्यायाने त्यांच्यासमोर अनेक आर्थिक अडचणी निर्माण होत होत्या. मात्र आता रेशीम (कोसा) उत्पादनातून त्यांचे संसार फुलू लागल्याचे दिसून येत आहे.परिसरातील आदिवासी कुटुंबे दुष्काळामुळे नेहमीच आर्थिक संकटात सापडत होते. एवढ्यातच गेल्या वर्षापासून बायफ डेव्हलपमेंट रिसर्च आणि बायफ मित्र संस्थेच्या संयुक्त विद्यमाने केंद्र शासनाच्या मदतीने महिला किसान सशक्तीकरण परियोजनेंतर्गत या भागातील आदिवासीबहुल खेड्यांची निवड करण्यात आली. आदिवासी भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी व त्यांच्या उत्थानासाठी महिलांकरिता टसर रेशीम शेती प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले.कोसा शेतीमधून हेक्टरी पाच ते सात हजार कोस निर्मिती केली जात असून यासाठी शासनाकडून पीक विमा योजनासुध्दा कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रकल्पाला अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या असून प्रकल्प योग्यरित्या कार्यान्वित असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. यामध्ये बऱ्यापैकी उत्पन्न मिळू लागल्याने आदिवासी महिला रेशीम उत्पादन शेतीकडे वळल्या व आता कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांचा हातभार लागत आहे. आदिवासी महिलांना कोसा प्रकल्प म्हणजे एक प्रकारची नवसंजीवनी मिळून त्यांचे संसार फुलू लागल्याने निदर्शनास येऊ लागले आहे. या उद्योगामधून आदिवासी महिलांना बळ मिळाले असून महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यास सदर संस्थेला फार मोठे यश आले आहे. या भागातील गरीब व आदिवासी शेतकरी कुटुंबांनी धान शेतीवर अधिक भर देण्यापेक्षा कोसा (रेशीम) शेतीकडे अधिक भर दिल्यास आदिवासींचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या करण्यावर नियंत्रण निश्चितच येवू शकते. त्यासाठी कोसा उत्पादन शेतीकडे शेतकऱ्यांनी वळण्याची गरज आहे. (वार्ताहर)वर्षातून तीनदा घेतले जाते उत्पादनपरियोजना क्रियान्वयन संस्था (बायफ) आणि परियोजना कार्यान्वयन मित्र संस्थेचे नोडल अधिकारी निलेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षापासून या आदिवासीबहुल भागात गरीब व आदिवासी कुटुंबातील महिलांसाठी टसर कोसा उत्पादन शेती प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले.आदिवासी कुटुंबांना रेशीम उद्योगापासून रोजगार मिळावा, त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी या उद्देशाने सदर रेशीम उद्योग प्रकल्पांतर्गत मोफत कोसा अंडी पुरविण्यात येतात. येथील कोसा उत्पादकांना आपल्या जवळची कोणत्याही प्रकारची लागत न लावता वर्षातून तीनदा कोसा (टसर) उत्पादन घेतले जाते. या कोसा प्रकल्पात टसर अळीची अंडी उबवणे, अंडीतून जन्माला येणाऱ्या अळींची राख करून आंजन किंवा ऐन या वृक्षावर जोपासना करण्यात येऊन कोसा (रेशीम) तयार करण्याची कामे केली जातात.