शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेळीपालनातून सावरला ‘माधुरी’चा संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 22:13 IST

आर्थिक उत्पन्नाचे कसलेही साधन नसलेल्या तिरोडा तालुक्याच्या सोनेखारी येथील माधुरी तेजराम धुर्वे यांनी राणी लक्ष्मीबाई स्वयंसहायता महिला बचत गटात प्रवेश केला. गटातून कर्ज घेवून शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केला व आपला संसार सावरला.

ठळक मुद्देराणी लक्ष्मीबाई स्वयंसहायता महिला बचत गट : सासूने दिली साथ, एकापासून १० शेळ्या

ऑनलाईन लोकमतगोंदिया : आर्थिक उत्पन्नाचे कसलेही साधन नसलेल्या तिरोडा तालुक्याच्या सोनेखारी येथील माधुरी तेजराम धुर्वे यांनी राणी लक्ष्मीबाई स्वयंसहायता महिला बचत गटात प्रवेश केला. गटातून कर्ज घेवून शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केला व आपला संसार सावरला.सोनेखारी येथे १६ डिसेंबर २०१३ रोजी सदर बचत गटाची स्थापना झाली. त्यात माधुरी सदस्य आहेत. उत्पन्नाचे साधन नसल्याने त्या जास्त बचत करू शकत नव्हत्या. त्यांची मासिक बचत ५० रूपये होती. गटात प्रवेश केल्यावर पाच हजार रूपयांचे अंतर्गत कर्ज घेवून त्यांनी एक शेळी खरेदी केली. तिचे चांगले पालन केल्यावर तिने दोन पिल्ले दिले. त्यांचेही चांगले पालन केले. ते मोठे झाल्यावर त्यांच्याकडे आता तीन शेळ्या झाल्या.त्यानंतर बचत गटाला १५ हजार रूपयांचा फिरता निधी (आरएफ) मिळाला. ते १५ हजार रूपयांची माधुरी यांनीच उचल केली व त्यातून तीन शेळ्या खरेदी केल्या. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात भर पडू लागली. वर्षभरानंतर बचत गटाची मासिक बचत १०० रूपये प्रत्येकी करण्यात आले.सासू घरी राहत असत. आता घरच्या सहा शेळा सासू चारायला नेवू लागल्या. इकडेतिकडे बसून राहण्यापेक्षा व दुसºयांच्या शेळ्या चारण्यापेक्षा घरच्याच शेळ्या चारायला नेण्यासाठी सासूने माधुरी यांना सहकार्य केले. त्यामुळे उत्पन्नात वाढ होवू लागली. आधी त्यांच्याकडे उत्पन्नाचे साधन नव्हते. पण गटात आल्यानंतर एका शेळीपासून आज त्यांच्याकडे १० शेळ्या झाल्या. ही वाढ म्हणजेच त्यांचे उत्पन्न आहे. मजुरी व शेळ्या विक्रीतून आता त्या अंतर्गत कर्ज व खेळत्या निधीची योग्यरित्या परतफेड करीत आहेत.गटात आल्यामुळेच त्यांच्या कुटुंबाला एक स्वयंरोजगार मिळाला आहे. त्यांच्या घरी सासू, पती, दोन मुले व त्या असा पाच जणांचा कुटुंब आहे. पती मजुरी करतात व सासू शेळ्या चारतात.मूल लहान असल्यामुळे माधुरी मजुरीला जात नाही. पण गटात समाविष्ट झाल्यामुळे त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व आर्थिक उत्पन्नात भर पडला.गटामुळे व्यवहार कौशल्याचे ज्ञानगटात येण्यापूर्वी माधुरी यांना गट म्हणजे काय, परिचय म्हणजे काय, हे कळत नव्हते. चार चौघांमध्ये बोलता येत नव्हते. मात्र गटात आल्यावर त्या बोलक्या झाल्या. स्वत:चा परिचय सांगू लागल्या. गटापासून त्यांना खूप काही शिकायला मिळाले. त्या घराबाहेर पडल्या. आजची महिला कशी असावी, याची जाण त्यांना झाली. बाहेरचे व्यवहार करायला शिकल्या. त्या बँक व्यवहारही करू लागल्या. त्यामुळे त्यांनी आपले गट व महिला आर्थिक विकास महामंडळाचे आभार मानले.