शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

शेळीपालनातून सावरला ‘माधुरी’चा संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 22:13 IST

आर्थिक उत्पन्नाचे कसलेही साधन नसलेल्या तिरोडा तालुक्याच्या सोनेखारी येथील माधुरी तेजराम धुर्वे यांनी राणी लक्ष्मीबाई स्वयंसहायता महिला बचत गटात प्रवेश केला. गटातून कर्ज घेवून शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केला व आपला संसार सावरला.

ठळक मुद्देराणी लक्ष्मीबाई स्वयंसहायता महिला बचत गट : सासूने दिली साथ, एकापासून १० शेळ्या

ऑनलाईन लोकमतगोंदिया : आर्थिक उत्पन्नाचे कसलेही साधन नसलेल्या तिरोडा तालुक्याच्या सोनेखारी येथील माधुरी तेजराम धुर्वे यांनी राणी लक्ष्मीबाई स्वयंसहायता महिला बचत गटात प्रवेश केला. गटातून कर्ज घेवून शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केला व आपला संसार सावरला.सोनेखारी येथे १६ डिसेंबर २०१३ रोजी सदर बचत गटाची स्थापना झाली. त्यात माधुरी सदस्य आहेत. उत्पन्नाचे साधन नसल्याने त्या जास्त बचत करू शकत नव्हत्या. त्यांची मासिक बचत ५० रूपये होती. गटात प्रवेश केल्यावर पाच हजार रूपयांचे अंतर्गत कर्ज घेवून त्यांनी एक शेळी खरेदी केली. तिचे चांगले पालन केल्यावर तिने दोन पिल्ले दिले. त्यांचेही चांगले पालन केले. ते मोठे झाल्यावर त्यांच्याकडे आता तीन शेळ्या झाल्या.त्यानंतर बचत गटाला १५ हजार रूपयांचा फिरता निधी (आरएफ) मिळाला. ते १५ हजार रूपयांची माधुरी यांनीच उचल केली व त्यातून तीन शेळ्या खरेदी केल्या. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात भर पडू लागली. वर्षभरानंतर बचत गटाची मासिक बचत १०० रूपये प्रत्येकी करण्यात आले.सासू घरी राहत असत. आता घरच्या सहा शेळा सासू चारायला नेवू लागल्या. इकडेतिकडे बसून राहण्यापेक्षा व दुसºयांच्या शेळ्या चारण्यापेक्षा घरच्याच शेळ्या चारायला नेण्यासाठी सासूने माधुरी यांना सहकार्य केले. त्यामुळे उत्पन्नात वाढ होवू लागली. आधी त्यांच्याकडे उत्पन्नाचे साधन नव्हते. पण गटात आल्यानंतर एका शेळीपासून आज त्यांच्याकडे १० शेळ्या झाल्या. ही वाढ म्हणजेच त्यांचे उत्पन्न आहे. मजुरी व शेळ्या विक्रीतून आता त्या अंतर्गत कर्ज व खेळत्या निधीची योग्यरित्या परतफेड करीत आहेत.गटात आल्यामुळेच त्यांच्या कुटुंबाला एक स्वयंरोजगार मिळाला आहे. त्यांच्या घरी सासू, पती, दोन मुले व त्या असा पाच जणांचा कुटुंब आहे. पती मजुरी करतात व सासू शेळ्या चारतात.मूल लहान असल्यामुळे माधुरी मजुरीला जात नाही. पण गटात समाविष्ट झाल्यामुळे त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व आर्थिक उत्पन्नात भर पडला.गटामुळे व्यवहार कौशल्याचे ज्ञानगटात येण्यापूर्वी माधुरी यांना गट म्हणजे काय, परिचय म्हणजे काय, हे कळत नव्हते. चार चौघांमध्ये बोलता येत नव्हते. मात्र गटात आल्यावर त्या बोलक्या झाल्या. स्वत:चा परिचय सांगू लागल्या. गटापासून त्यांना खूप काही शिकायला मिळाले. त्या घराबाहेर पडल्या. आजची महिला कशी असावी, याची जाण त्यांना झाली. बाहेरचे व्यवहार करायला शिकल्या. त्या बँक व्यवहारही करू लागल्या. त्यामुळे त्यांनी आपले गट व महिला आर्थिक विकास महामंडळाचे आभार मानले.