शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

रोहयोच्या २५ हजार मजुरांना मिळणार कामगारांचा दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 20:57 IST

बेरोजगारीवर मात करण्यासाठी यशस्वी ठरलेली महात्मा गांधी रोजगार हमी योजना देशातील मजूरांच्या हाताला काम देत आहे. सन २०१७-१८ या वर्षात गोंदिया जिल्ह्याने रोहयोमध्ये देशपातळीवर नाव लौकीक होईल असे काम केले.

ठळक मुद्देरोहयोवर २६८ कोटी खर्च : एक लाख मजुरांना २०३ कोटींची मजुरी

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बेरोजगारीवर मात करण्यासाठी यशस्वी ठरलेली महात्मा गांधी रोजगार हमी योजना देशातील मजूरांच्या हाताला काम देत आहे. सन २०१७-१८ या वर्षात गोंदिया जिल्ह्याने रोहयोमध्ये देशपातळीवर नाव लौकीक होईल असे काम केले. देशात पहिल्या क्रमांकावर येण्याच्या शर्यतीत गोंदिया जिल्हा आहे. गोंदिया जिल्ह्याने ९० व त्यापेक्षा अधिक दिवस काम देऊन गोंदिया जिल्ह्यातील २५ हजार मजुरांना कामगारांचा दर्जा देण्याचा संकल्प पूर्ण केला आहे.सन २०१७-१८ या वर्षात रोहयोच्या कामावर गोंदिया जिल्ह्यातील ६८ हजार ६५५ कुटुंबे होती. या कुटुंबातील १ लाख ९ हजार ३२३ मजूरांनी ७ लाख ९५ हजार १३५ मनुष्यदिवस काम केले. गोंदिया जिल्ह्यात या वर्षभरात झालेल्या रोहयोच्या कामावर २६८ कोटी ४७ लाख ५७ हजार रूपये खर्च करण्यात आले. त्यातील २०३ कोटी १५ लाख ७४ हजार रूपये मजूरीवर खर्च करण्यात आल्याने हे पैसे लोकांच्या खिशात गेले आहेत. सद्यस्थितीत जिकडे-तिकडे बेरोजगारी वाढली आहे. परंतु या बेरोजगारीवर मात करण्यासाठी थोड्याफार प्रमाणात रोहयो ही एक उपाय ठरली आहे.गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी या जिल्ह्यातील मजूरांना अधिक दिवस मजूरी मिळावी सोबतच त्या मजूरांना कामगारांचा दर्जा मिळाल्यास त्यांना शासनाच्या २८ योजनांचा लाभ सहजरित्या घेता येईल. यासाठी बहुतांश मजूर कामगारांच्या कक्षेत यावेत याकरिता प्रयत्न केलेत.सन २०१७-१८ या वर्षात ९० किंवा त्यापेक्षा अधिक दिवस रोहयोवर काम करणाऱ्यांची संख्या २५ हजार ६२८ आहे. त्यात आमगाव तालुक्यात २ हजार ७८४, अर्जुनी-मोरगाव १ हजार ३२३, देवरी ७ हजार ९८८, गोंदिया २ हजार १७५, गोरेगाव १ हजार ५८५, सडक-अर्जुनी ३२४, सालेकसा ५ हजार २३१, तिरोडा तालुक्यात ४ हजार २१८ मजूरांचा समावेश होता. रोहयोमधून वृक्षलागवड व रोपवाटीकेचे काम केले जाते. त्या कामाचे दिवस वगळून ९० दिवस काम करणाºया मजूरांना कामगारांचा दर्जा देण्यात येत आहे.कामगारांना मजुरीपेक्षा अधिक लाभरोहयोत काम करणाऱ्या मजुराला कामगाराचा दर्जा मिळाल्यास कामगार कार्यालयात मार्फत त्यांना मिळणारा लाभ हा मजुरीपेक्षा अधिक असल्याने गोंदिया जिल्ह्यातील मजूरांना अधिक संख्येत कामगारांचा दर्जा मिळावा यासाठी जिल्हाधिकारी काळे यांनी पुढाकार घेतला. कामगाराच्या दोन पाल्यांना १ ली ते ७ वी साठी दरवर्षी दोन हजार ५०० रूपये ८ वी ते १० वी साठी दरवर्षी ५ हजार, दोन पाल्यांना १० वी व १२ वी मध्ये ५० टक्के वा अधिक गुण प्राप्त झाल्यास प्रोत्साहनपर १० हजार रुपये, ११ वी व १२ वीच्या शिक्षणासाठी दरवर्षी १० हजार, दोन पाल्यास वा पत्नीस पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्रवेश पुस्तकासाठी दरवर्षी २० हजार, वैद्यकीय शिक्षणासाठी १ लाख रुपय, अभियांत्रिकी शिक्षणासाठी दरवर्षी ६० हजार, पदवी शिक्षणासाठी २० हजार व पदवयुत्तर शिक्षणासाठी दरवर्षी २५ हजार दोन पाल्यांना संगणकाचे शिक्षण (एमएसआयटी) मोफत दिले जाईल अथवा उत्तीर्ण असल्यास एमएससीआयटी प्रमाणपत्र सादर करुन शुल्क मिळविता येईल, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ कामगाराला अथवा त्यांच्या कुटुंबियांना गंभीर आजाराच्या उपचारासाठी १ लाख सहाय्य, कामगारास ७५ टक्के अपंगत्व किंवा कायमचे अपंगत्व आल्यास २ लाख अर्थसहाय्य, कामगाराच्या पत्नीस दोन जिवीत अपत्यांपर्यंत नैसर्गिक प्रसूतीसाठी १५ हजार ते २० हजार, एका मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावे १८ वर्षासाठी १ लाख मुदत बंद ठेव, व्यसनमुक्ती केंद्रांतर्गत उपचाराकरिता ६ हजार अर्थसहाय्य, कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास त्याच्या वारसास ५ लाख, नैसर्गिक मृत्यू झाल्यास कुटुंबाला २ लाख, घरखरेदी व घरबांधणीसाठी बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जावरील ६ लाख पर्यंत व्याजाची रक्कम अथवा २ लाख अर्थसहाय्य मंडळामार्फत मिळेल, आवास योजनेसाठी २ लाख, कामगाराचा मृत्यू झाल्यास वारसदारास १० हजार, कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीस अथवा पतीला सलग पाच वर्षे २४ हजार, कामगाराला स्वत:च्या पहिल्या विवाहासाठी ३० हजार, ३१ आॅगस्ट २०१४ रोजी नोंदणी जिवीत असलेल्या नोंदीत कामगाराला दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदीसाठी दर कामगार ३ हजार, कामगाराच्या पाल्यांना व्यक्तिमत्व विकास पुस्तक संच, कामगारांना बांधकामाची उपयुक्त/आवश्यक अवजारे खरेदीसाठी दर कुटूंब ५ हजार रूपये, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना लागू, कामगाराला सुरक्षा संच पुरविणे अशा योजनांचा लाभ मिळतो.