शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

कामगारांनी अधिकारांची जाणीव ठेवावी!

By admin | Updated: March 10, 2017 00:44 IST

देशातील ९३ टक्के कामगार हे असंघटीत क्षेत्रात काम करीत आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकारी, सर्वोच्च न्यायालय

आणेकर : कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमगोंदिया : देशातील ९३ टक्के कामगार हे असंघटीत क्षेत्रात काम करीत आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकारी, सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी अशा क्षेत्रातील कामगारांचे हित रक्षणासाठी तसेच त्यांच्या कल्याणासाठी व त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी विधी सहाय्य योजना २०१५ कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत अशा कामगारांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचविण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया हे कार्यालय सदैव तत्पर आहे. त्यामुळे जिल्ह्यातील घरगुती धुणी-भांडी- स्वयंपाकाची कामे करणाऱ्या महिला, इमारत बांधकामावरील कामगार, दुकानात काम करणारे, शेतात काम करणारे कामगार यांनी आपल्या अधिकारांची जाणीव ठेवावी व शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कामगार न्यायालयाच्या न्या.एन.एस. आणेकर यांनी केले.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, कामगार न्यायालय, सहायक कामगार आयुक्त कार्यालय, वकील संघ कामगार न्यायालय गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाद्वारे असंघटीत क्षेत्रातील कामागारांना विधी सहाय्य योजना २०१५ या योजनेच्या जनजागृतीसाठी गोंदिया येथील घरगुती काम करणाऱ्या महिला, इमारत बांधकामावरील कामगार व इतर क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांकरिता कायदेविषयक जनजागृती कार्यकम कामगार न्यायालयात घेण्यात आले. त्यावेळी उदघाटक म्हणून न्या. आणेकर बोलत होत्या.यावेळी सरकारी कामगार अधिकारी जीवन बोरकर, दुकाने निरीक्षक मंजुषा पौनीकर, अ‍ॅड. राजकुमार बोंबार्डे, अ‍ॅड.सी.के. बढे यांची प्रमुख वक्ते म्हणून उपस्थिती होती. यामध्ये सरकारी कामगार अधिकारी जीवन बोरकर यांनी त्यांच्या विभागांतर्गत राबविण्यात येणारी इमारत बांधकाम कामगारांसाठी कल्याणाची योजना, याबाबत माहिती दिली. या योजनेंतर्गत ज्या कंत्राटदारांकडे कामगार कामे करतात त्या कंत्राटदाराचे प्रमाणपत्र घेवून कामगारांनी आवश्यक कागदपत्रे घेवून त्यांनी सहायक कामगार आयुक्त कार्यालयात नोंद करावी व मिळणाऱ्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. दुकाने निरीक्षक मंजुषा पौनीकर यांनी घरगुती कामे करणाऱ्या महिलांनी त्यांची नोंदणी सहायक कामगार आयुक्त कार्यालयात करून योजनेंतर्गत लाभ घ्यावा, असे सांगितले. वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. राजकुमार बोंबार्डे यांनी कामगार अपघात नुकसान भरपाई कायदा, याबाबत मार्गदर्शन केले. कामगारांनी आपले हक्क मिळविण्यासाठी न्यायालयात दाद मागावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. वकील संघाचे सचिव अ‍ॅड.सी.के. बढे यांनी कामगारांच्या योजना प्रभावीपणे राबविण्यास सांगितले. यावेळी असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या कल्याणाच्या योजना व विविध कायद्यांची माहिती उपस्थित कामगारांना देण्यात आली.संचालन जी.पी. नखाते यांनी केले. आभार एस.यु. थोरात यांनी मानले. कार्यक्रमासाठी पी.डी. देशपांडे, प्रमोदिनी तेलंग, धुर्वे तसेच कामगार न्यायालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)