शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
2
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलदाबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
3
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
4
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
5
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
6
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
7
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
8
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
9
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
10
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
11
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
12
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
13
मनसे नेते प्रकाश महाजनांना अमित ठाकरे, बाळा नांदगावकरांचा फोन; नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
14
नशिबाचा खेळ! ३३ वर्षांपूर्वी मुलासाठी ढाबा बांधत होते, तिथेच मुलाचा मृत्यू झालेला, त्याच ढाब्यासमोर फौजा सिंग यांना कारने उडवले
15
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च
16
Mumbai: सोसायटीच्या दहाव्या मजल्यावरून पडून अभियंत्याचा मृत्यू, मालाड पश्चिम येथील घटना
17
अपडेट झालं नाही तर बंद होईल मुलांचं आधार कार्ड; UIDAI नं नियमांमध्ये केला मोठा बदल
18
Vastu Tips: श्रीमंतांचं घर जणू आरसेमहल; कारण आरसे योग्य दिशेला लावण्याने वाढते संपत्ती!
19
अशोक मामांना भेटली छोटी रमा! "त्यांनी भेट झाल्या झाल्या...", तेजश्री वालावलकरची पोस्ट
20
बायकोने रचला हत्येचा कट, मित्र अन् बॉयफ्रेंडने दिली साथ! नवऱ्याच्या कार अपघातामागचं सत्य ऐकून बसेल धक्का

कामगारांनी अधिकारांची जाणीव ठेवावी!

By admin | Updated: March 10, 2017 00:44 IST

देशातील ९३ टक्के कामगार हे असंघटीत क्षेत्रात काम करीत आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकारी, सर्वोच्च न्यायालय

आणेकर : कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमगोंदिया : देशातील ९३ टक्के कामगार हे असंघटीत क्षेत्रात काम करीत आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकारी, सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी अशा क्षेत्रातील कामगारांचे हित रक्षणासाठी तसेच त्यांच्या कल्याणासाठी व त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी विधी सहाय्य योजना २०१५ कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत अशा कामगारांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचविण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया हे कार्यालय सदैव तत्पर आहे. त्यामुळे जिल्ह्यातील घरगुती धुणी-भांडी- स्वयंपाकाची कामे करणाऱ्या महिला, इमारत बांधकामावरील कामगार, दुकानात काम करणारे, शेतात काम करणारे कामगार यांनी आपल्या अधिकारांची जाणीव ठेवावी व शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कामगार न्यायालयाच्या न्या.एन.एस. आणेकर यांनी केले.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, कामगार न्यायालय, सहायक कामगार आयुक्त कार्यालय, वकील संघ कामगार न्यायालय गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाद्वारे असंघटीत क्षेत्रातील कामागारांना विधी सहाय्य योजना २०१५ या योजनेच्या जनजागृतीसाठी गोंदिया येथील घरगुती काम करणाऱ्या महिला, इमारत बांधकामावरील कामगार व इतर क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांकरिता कायदेविषयक जनजागृती कार्यकम कामगार न्यायालयात घेण्यात आले. त्यावेळी उदघाटक म्हणून न्या. आणेकर बोलत होत्या.यावेळी सरकारी कामगार अधिकारी जीवन बोरकर, दुकाने निरीक्षक मंजुषा पौनीकर, अ‍ॅड. राजकुमार बोंबार्डे, अ‍ॅड.सी.के. बढे यांची प्रमुख वक्ते म्हणून उपस्थिती होती. यामध्ये सरकारी कामगार अधिकारी जीवन बोरकर यांनी त्यांच्या विभागांतर्गत राबविण्यात येणारी इमारत बांधकाम कामगारांसाठी कल्याणाची योजना, याबाबत माहिती दिली. या योजनेंतर्गत ज्या कंत्राटदारांकडे कामगार कामे करतात त्या कंत्राटदाराचे प्रमाणपत्र घेवून कामगारांनी आवश्यक कागदपत्रे घेवून त्यांनी सहायक कामगार आयुक्त कार्यालयात नोंद करावी व मिळणाऱ्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. दुकाने निरीक्षक मंजुषा पौनीकर यांनी घरगुती कामे करणाऱ्या महिलांनी त्यांची नोंदणी सहायक कामगार आयुक्त कार्यालयात करून योजनेंतर्गत लाभ घ्यावा, असे सांगितले. वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. राजकुमार बोंबार्डे यांनी कामगार अपघात नुकसान भरपाई कायदा, याबाबत मार्गदर्शन केले. कामगारांनी आपले हक्क मिळविण्यासाठी न्यायालयात दाद मागावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. वकील संघाचे सचिव अ‍ॅड.सी.के. बढे यांनी कामगारांच्या योजना प्रभावीपणे राबविण्यास सांगितले. यावेळी असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या कल्याणाच्या योजना व विविध कायद्यांची माहिती उपस्थित कामगारांना देण्यात आली.संचालन जी.पी. नखाते यांनी केले. आभार एस.यु. थोरात यांनी मानले. कार्यक्रमासाठी पी.डी. देशपांडे, प्रमोदिनी तेलंग, धुर्वे तसेच कामगार न्यायालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)