शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

घरकुलामुळे मिळाला मजुरांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:00 IST

कमी पाऊस आणि कीडरोगांमुळे खरीप आणि रब्बी हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेला. त्यामुळे शेतकरी व शेतमजुरांच्या हाताला काम नाही. परिणामी रोजगाराच्या शोधात मजुरांची भटकंती सुरू आहे.

ठळक मुद्दे३२४ घरकूल बांधकामावर १४८२ मजूर : कामांची संख्या वाढविण्याची गरज

ऑनलाईन लोकमतगोंदिया : कमी पाऊस आणि कीडरोगांमुळे खरीप आणि रब्बी हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेला. त्यामुळे शेतकरी व शेतमजुरांच्या हाताला काम नाही. परिणामी रोजगाराच्या शोधात मजुरांची भटकंती सुरू आहे. मात्र महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अतंर्गत घरकूल व ग्रामपंचायतची कामे केली जात आहे. त्यामुळे मजुरांना घरकुलाचा आधार होत असल्याचे चित्र आहे.केंद्र शासनाची महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही महत्त्वाकांक्षी योजना म्हणून ओळखली जाते. या योजनेच्या माध्यमातून मजुरांच्या काम दिले जाते. यंदाची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावरील ५० टक्के कामे सुरु करण्यात आली आहे. यामध्ये सदर योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात ३२४ घरकुलांची कामे सुरू असून त्यावर १४८२ मजूर कामावर आहेत.दुष्काळी परिस्थितीत मजुरांच्या हाताला काम मिळावे या उद्देशाने केंद्र शासनाच्या वतीने राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या वतीने पांदण व सिमेंट रस्ता, तलाव खोलीकरण, भातखाचर विहीर, नाला सरळीकरण, वृक्ष लागवड, शेळी व गायीचा गोठा बांधकाम, घरकुल व शौचालयांची कामे केली जातात. गोंदिया जिल्हा परिषदेतर्फे ग्रामपंचायत स्तरावरील ५० टक्के कामे सुरु केली असून यावर्षी जिल्ह्यात घरकुलांचे सर्वाधिक कामे घेण्यात आली आहेत. प्रत्येक तालुक्यात सदर योजनेंतर्गत घरकुलांचे काम सुरु आहे. १४ मार्चपर्यंत जिल्ह्यात एकूण ३२४ घरकुलांची कामे सुरु आहेत. यामध्ये गोंदिया तालुक्यात ६२ कामे सुरू असून त्यावर ४९२ मजुरांची उपस्थिती आहे. तिरोडा तालुक्यात १४ कामांवर ६८ मजूर, सालेकसा ९८ कामांवर ३०४ मजूर, देवरी ७२ कामांवर २६८ मजूर, गोरेगाव २ कामावर ८ मजूर, सडक अर्जुनी १७ कामांवर ६८ मजूर तर अर्जुनी मोरगाव तालुक्यात ३० कामांवर १५९ मजूर कामावर आहेत. या कामांमुळे जिल्ह्यातील मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे काम प्रशासनाकडून केले जात आहे.गोरेगाव तालुका माघारलामहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून ओळखली जाते. या योजनेच्या माध्यमातून विविध प्रकारची कामे केली जातात. सध्या स्थितीत ग्रामपंचायत स्तरावरुन जिल्ह्यात घरकुलांची ३२४ कामे सुरु आहे. गोरेगाव तालुक्यात सदर योजनेंतर्गत फक्त दोनच कामे सुरु असून घरकुल बांधकामात गोरेगाव तालुका पिछाडीवर असल्याचे चित्र आहे