शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

घरकुलामुळे मिळाला मजुरांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:00 IST

कमी पाऊस आणि कीडरोगांमुळे खरीप आणि रब्बी हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेला. त्यामुळे शेतकरी व शेतमजुरांच्या हाताला काम नाही. परिणामी रोजगाराच्या शोधात मजुरांची भटकंती सुरू आहे.

ठळक मुद्दे३२४ घरकूल बांधकामावर १४८२ मजूर : कामांची संख्या वाढविण्याची गरज

ऑनलाईन लोकमतगोंदिया : कमी पाऊस आणि कीडरोगांमुळे खरीप आणि रब्बी हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेला. त्यामुळे शेतकरी व शेतमजुरांच्या हाताला काम नाही. परिणामी रोजगाराच्या शोधात मजुरांची भटकंती सुरू आहे. मात्र महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अतंर्गत घरकूल व ग्रामपंचायतची कामे केली जात आहे. त्यामुळे मजुरांना घरकुलाचा आधार होत असल्याचे चित्र आहे.केंद्र शासनाची महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही महत्त्वाकांक्षी योजना म्हणून ओळखली जाते. या योजनेच्या माध्यमातून मजुरांच्या काम दिले जाते. यंदाची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावरील ५० टक्के कामे सुरु करण्यात आली आहे. यामध्ये सदर योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात ३२४ घरकुलांची कामे सुरू असून त्यावर १४८२ मजूर कामावर आहेत.दुष्काळी परिस्थितीत मजुरांच्या हाताला काम मिळावे या उद्देशाने केंद्र शासनाच्या वतीने राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या वतीने पांदण व सिमेंट रस्ता, तलाव खोलीकरण, भातखाचर विहीर, नाला सरळीकरण, वृक्ष लागवड, शेळी व गायीचा गोठा बांधकाम, घरकुल व शौचालयांची कामे केली जातात. गोंदिया जिल्हा परिषदेतर्फे ग्रामपंचायत स्तरावरील ५० टक्के कामे सुरु केली असून यावर्षी जिल्ह्यात घरकुलांचे सर्वाधिक कामे घेण्यात आली आहेत. प्रत्येक तालुक्यात सदर योजनेंतर्गत घरकुलांचे काम सुरु आहे. १४ मार्चपर्यंत जिल्ह्यात एकूण ३२४ घरकुलांची कामे सुरु आहेत. यामध्ये गोंदिया तालुक्यात ६२ कामे सुरू असून त्यावर ४९२ मजुरांची उपस्थिती आहे. तिरोडा तालुक्यात १४ कामांवर ६८ मजूर, सालेकसा ९८ कामांवर ३०४ मजूर, देवरी ७२ कामांवर २६८ मजूर, गोरेगाव २ कामावर ८ मजूर, सडक अर्जुनी १७ कामांवर ६८ मजूर तर अर्जुनी मोरगाव तालुक्यात ३० कामांवर १५९ मजूर कामावर आहेत. या कामांमुळे जिल्ह्यातील मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे काम प्रशासनाकडून केले जात आहे.गोरेगाव तालुका माघारलामहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून ओळखली जाते. या योजनेच्या माध्यमातून विविध प्रकारची कामे केली जातात. सध्या स्थितीत ग्रामपंचायत स्तरावरुन जिल्ह्यात घरकुलांची ३२४ कामे सुरु आहे. गोरेगाव तालुक्यात सदर योजनेंतर्गत फक्त दोनच कामे सुरु असून घरकुल बांधकामात गोरेगाव तालुका पिछाडीवर असल्याचे चित्र आहे