शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलामुळे मिळाला मजुरांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:00 IST

कमी पाऊस आणि कीडरोगांमुळे खरीप आणि रब्बी हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेला. त्यामुळे शेतकरी व शेतमजुरांच्या हाताला काम नाही. परिणामी रोजगाराच्या शोधात मजुरांची भटकंती सुरू आहे.

ठळक मुद्दे३२४ घरकूल बांधकामावर १४८२ मजूर : कामांची संख्या वाढविण्याची गरज

ऑनलाईन लोकमतगोंदिया : कमी पाऊस आणि कीडरोगांमुळे खरीप आणि रब्बी हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेला. त्यामुळे शेतकरी व शेतमजुरांच्या हाताला काम नाही. परिणामी रोजगाराच्या शोधात मजुरांची भटकंती सुरू आहे. मात्र महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अतंर्गत घरकूल व ग्रामपंचायतची कामे केली जात आहे. त्यामुळे मजुरांना घरकुलाचा आधार होत असल्याचे चित्र आहे.केंद्र शासनाची महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही महत्त्वाकांक्षी योजना म्हणून ओळखली जाते. या योजनेच्या माध्यमातून मजुरांच्या काम दिले जाते. यंदाची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावरील ५० टक्के कामे सुरु करण्यात आली आहे. यामध्ये सदर योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात ३२४ घरकुलांची कामे सुरू असून त्यावर १४८२ मजूर कामावर आहेत.दुष्काळी परिस्थितीत मजुरांच्या हाताला काम मिळावे या उद्देशाने केंद्र शासनाच्या वतीने राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या वतीने पांदण व सिमेंट रस्ता, तलाव खोलीकरण, भातखाचर विहीर, नाला सरळीकरण, वृक्ष लागवड, शेळी व गायीचा गोठा बांधकाम, घरकुल व शौचालयांची कामे केली जातात. गोंदिया जिल्हा परिषदेतर्फे ग्रामपंचायत स्तरावरील ५० टक्के कामे सुरु केली असून यावर्षी जिल्ह्यात घरकुलांचे सर्वाधिक कामे घेण्यात आली आहेत. प्रत्येक तालुक्यात सदर योजनेंतर्गत घरकुलांचे काम सुरु आहे. १४ मार्चपर्यंत जिल्ह्यात एकूण ३२४ घरकुलांची कामे सुरु आहेत. यामध्ये गोंदिया तालुक्यात ६२ कामे सुरू असून त्यावर ४९२ मजुरांची उपस्थिती आहे. तिरोडा तालुक्यात १४ कामांवर ६८ मजूर, सालेकसा ९८ कामांवर ३०४ मजूर, देवरी ७२ कामांवर २६८ मजूर, गोरेगाव २ कामावर ८ मजूर, सडक अर्जुनी १७ कामांवर ६८ मजूर तर अर्जुनी मोरगाव तालुक्यात ३० कामांवर १५९ मजूर कामावर आहेत. या कामांमुळे जिल्ह्यातील मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे काम प्रशासनाकडून केले जात आहे.गोरेगाव तालुका माघारलामहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून ओळखली जाते. या योजनेच्या माध्यमातून विविध प्रकारची कामे केली जातात. सध्या स्थितीत ग्रामपंचायत स्तरावरुन जिल्ह्यात घरकुलांची ३२४ कामे सुरु आहे. गोरेगाव तालुक्यात सदर योजनेंतर्गत फक्त दोनच कामे सुरु असून घरकुल बांधकामात गोरेगाव तालुका पिछाडीवर असल्याचे चित्र आहे