शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्यांनो, निवडणुकीसाठी सज्ज व्हा

By admin | Updated: June 29, 2016 01:48 IST

शासनाच्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवून त्यांना लाभ देण्यासाठी कार्यकर्त्यांना कार्य करायचे आहे.

बडोले यांचा सत्कार : भाजपची जिल्हा बैठक, अनेकांचा भाजप प्रवेशगोंदिया : शासनाच्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवून त्यांना लाभ देण्यासाठी कार्यकर्त्यांना कार्य करायचे आहे. भाजप कार्यकर्त्यांचा पक्ष असून लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते यांच्यात नेहमी समन्वय राहणे गरजेचे आहे. मागील निवडणुकीत पक्षाच्या मतदानाची टक्केवारी वाढली आहे. आता काही दिवसांत जिल्ह्यात नगर परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. संपूर्ण ताकदीने लढून भाजपची सत्ता स्थापित करून शहरांचा विकास साधायचा आहे. यासाठी प्रत्येक बुथ मजबूत करून कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी सज्ज राहावे, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी केले.अर्जुनी-मोरगाव येथे भाजपच्या जिल्हा बैठकीत कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करीत होते.याप्रसंगी प्रामुख्याने पालकमंत्री राजकुमार बडोले, खा. नाना पटोले, खा. अशोक नेते, डॉ. उपेंद्र कोठेकर, आ. विजय रहांगडाले, आ. संजय पुराम, सुभाष पारधी, माजी आ. केशव मानकर, दयाराम कापगते, भेरसिंह नागपुरे, भजनदास वैद्य, विनोद अग्रवाल, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, जि.प. सभापती देवराम वडगाये, छाया दसरे, झामसिंग येरणे, राधेशाम अग्रवाल, महिला मोर्चा प्रदेश सचिव सीता रहांगडाले, दिनेश दादरीवाल, पं.स. सभापती अरविंद शिवणकर, कविता रंगारी, दिलीप चौधरी, देवकी मरई, विरेंद्र अंजनकर, भाऊराव उके, रविकांत बोपचे, लायकराम भेंडारकर, संतोष चव्हाण, संजय कुलकर्णी, भाजयुमो जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडाले, भावना कदम, रघुनाथ लांजेवार, हनुवत वट्टी, अलताफ हमीद, अमित बुद्धे, किशोर हालानी, नामदेव कापगते, लक्ष्मीकांत धनगाये, रेखलाल टेंभरे आदी उपस्थित होते. खा. पटोले यांनी केंद्र सरकारच्या योजनांसाठी नरेंद्र मोदी अ‍ॅप सुरू केला असल्याचे सांगून तो स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड करून प्रत्येक योजना माहिती करून घेता येणार असल्याचे सांगितले. भाजप शासन सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठिशी असून धानावर बोनस देवून त्याचा मोबदलाही त्वरित देण्यात येत आहे. येणाऱ्या नगर परिषद निवडणूक स्व बळावर लढून सत्ता स्थापित करणार. तसेह सहकार क्षेत्रात पुढे जाण्याचेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. डॉ. उपेंद्र कोठेकर म्हणाले, प्रधानमंत्री मोदी यांनी दोन वर्षाच्या काळात जनकल्याण व देश विकासाच्या ५४ महत्त्वांच्या घोषणा व योजना आणल्या. या योजना कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करावे, असे आवाहन केले. यानंतर नगर परिषद निवडणुकांसंदर्भात आ.विजय रहांगडाले व माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी मार्गदर्शन करून नवीन मतदारांची नोंदणी करण्यास सांगितले. खा. अशोक नेते यांनी केंद्र शासनाच्या योजनांची माहिती दिली. आ. संजय पुराम यांनी वचनपूर्ती व विकासपर्व याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी प्रदेशच्या बैठकीत खा. नाना पटोले यांच्या शेतीविषयक ठरावाबाबत माजी आ. केशवराव मानकर यांनी माहिती देवून तो ठराव बैठकीत ठेवला. यात शेतीला १०० टक्के सिंचनासाठी प्रयत्न, राज्यातील सर्व नद्या जोडण्याचा प्रस्ताव, जलयुक्त शिवार योजना, शेतीपीक विमा योजना याबद्दल प्रस्ताव ठेवून मंजुरीसाठी केंद्राकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले.माजी आ. कापगते यांनी, ही योजना महाराष्ट्राचा कायापालट करणारी असल्याचे सांगितले. माजी आ. भेरसिंह नागपुरे यांनी खा. पटोले यांच्या ठरावावर धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळणार असल्याचे सांगितले. रचना गहाणे यांनी जिल्हा परिषदेच्या योजना व केलेल्या विकासात्मक कामांची माहिती दिली. या वेळी ना. राजकुमार बडोले यांनी २६ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या धर्मांतरित नवबौद्धांचा प्रश्न निकाली लावल्याने केंद्र सरकारद्वारे कोट्यवधी बौद्ध बांधवांना आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक सोयीसुविधा व लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. या मोठ्या कार्याबद्दल ना. बडोले यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. यात लॉर्ड बुद्धा मैत्री संघाचे रतन वासनिक, काँग्रेसचे श्याम चौरे, कुंदा भास्कर, सुधा बनाफर इतर अनेकांचा समावेश आहे. संचालन विरेंद्र अंजनकर यांनी केले. याप्रसंगी मंडळ अध्यक्ष उमाकांत ढेंगे, प्रमोद संगीडवार, छत्रपाल तुरकर, सुनील केलनका, विजय बिसेन, लक्ष्मण भगत, भाऊराव कठाणे, सलाम शेख, अ‍ॅड. येशुलाल उपराडे, पप्पू अटरे, परसराम फडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)