शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्यांनो, निवडणुकीसाठी सज्ज व्हा

By admin | Updated: June 29, 2016 01:48 IST

शासनाच्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवून त्यांना लाभ देण्यासाठी कार्यकर्त्यांना कार्य करायचे आहे.

बडोले यांचा सत्कार : भाजपची जिल्हा बैठक, अनेकांचा भाजप प्रवेशगोंदिया : शासनाच्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवून त्यांना लाभ देण्यासाठी कार्यकर्त्यांना कार्य करायचे आहे. भाजप कार्यकर्त्यांचा पक्ष असून लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते यांच्यात नेहमी समन्वय राहणे गरजेचे आहे. मागील निवडणुकीत पक्षाच्या मतदानाची टक्केवारी वाढली आहे. आता काही दिवसांत जिल्ह्यात नगर परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. संपूर्ण ताकदीने लढून भाजपची सत्ता स्थापित करून शहरांचा विकास साधायचा आहे. यासाठी प्रत्येक बुथ मजबूत करून कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी सज्ज राहावे, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी केले.अर्जुनी-मोरगाव येथे भाजपच्या जिल्हा बैठकीत कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करीत होते.याप्रसंगी प्रामुख्याने पालकमंत्री राजकुमार बडोले, खा. नाना पटोले, खा. अशोक नेते, डॉ. उपेंद्र कोठेकर, आ. विजय रहांगडाले, आ. संजय पुराम, सुभाष पारधी, माजी आ. केशव मानकर, दयाराम कापगते, भेरसिंह नागपुरे, भजनदास वैद्य, विनोद अग्रवाल, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, जि.प. सभापती देवराम वडगाये, छाया दसरे, झामसिंग येरणे, राधेशाम अग्रवाल, महिला मोर्चा प्रदेश सचिव सीता रहांगडाले, दिनेश दादरीवाल, पं.स. सभापती अरविंद शिवणकर, कविता रंगारी, दिलीप चौधरी, देवकी मरई, विरेंद्र अंजनकर, भाऊराव उके, रविकांत बोपचे, लायकराम भेंडारकर, संतोष चव्हाण, संजय कुलकर्णी, भाजयुमो जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडाले, भावना कदम, रघुनाथ लांजेवार, हनुवत वट्टी, अलताफ हमीद, अमित बुद्धे, किशोर हालानी, नामदेव कापगते, लक्ष्मीकांत धनगाये, रेखलाल टेंभरे आदी उपस्थित होते. खा. पटोले यांनी केंद्र सरकारच्या योजनांसाठी नरेंद्र मोदी अ‍ॅप सुरू केला असल्याचे सांगून तो स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड करून प्रत्येक योजना माहिती करून घेता येणार असल्याचे सांगितले. भाजप शासन सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठिशी असून धानावर बोनस देवून त्याचा मोबदलाही त्वरित देण्यात येत आहे. येणाऱ्या नगर परिषद निवडणूक स्व बळावर लढून सत्ता स्थापित करणार. तसेह सहकार क्षेत्रात पुढे जाण्याचेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. डॉ. उपेंद्र कोठेकर म्हणाले, प्रधानमंत्री मोदी यांनी दोन वर्षाच्या काळात जनकल्याण व देश विकासाच्या ५४ महत्त्वांच्या घोषणा व योजना आणल्या. या योजना कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करावे, असे आवाहन केले. यानंतर नगर परिषद निवडणुकांसंदर्भात आ.विजय रहांगडाले व माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी मार्गदर्शन करून नवीन मतदारांची नोंदणी करण्यास सांगितले. खा. अशोक नेते यांनी केंद्र शासनाच्या योजनांची माहिती दिली. आ. संजय पुराम यांनी वचनपूर्ती व विकासपर्व याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी प्रदेशच्या बैठकीत खा. नाना पटोले यांच्या शेतीविषयक ठरावाबाबत माजी आ. केशवराव मानकर यांनी माहिती देवून तो ठराव बैठकीत ठेवला. यात शेतीला १०० टक्के सिंचनासाठी प्रयत्न, राज्यातील सर्व नद्या जोडण्याचा प्रस्ताव, जलयुक्त शिवार योजना, शेतीपीक विमा योजना याबद्दल प्रस्ताव ठेवून मंजुरीसाठी केंद्राकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले.माजी आ. कापगते यांनी, ही योजना महाराष्ट्राचा कायापालट करणारी असल्याचे सांगितले. माजी आ. भेरसिंह नागपुरे यांनी खा. पटोले यांच्या ठरावावर धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळणार असल्याचे सांगितले. रचना गहाणे यांनी जिल्हा परिषदेच्या योजना व केलेल्या विकासात्मक कामांची माहिती दिली. या वेळी ना. राजकुमार बडोले यांनी २६ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या धर्मांतरित नवबौद्धांचा प्रश्न निकाली लावल्याने केंद्र सरकारद्वारे कोट्यवधी बौद्ध बांधवांना आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक सोयीसुविधा व लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. या मोठ्या कार्याबद्दल ना. बडोले यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. यात लॉर्ड बुद्धा मैत्री संघाचे रतन वासनिक, काँग्रेसचे श्याम चौरे, कुंदा भास्कर, सुधा बनाफर इतर अनेकांचा समावेश आहे. संचालन विरेंद्र अंजनकर यांनी केले. याप्रसंगी मंडळ अध्यक्ष उमाकांत ढेंगे, प्रमोद संगीडवार, छत्रपाल तुरकर, सुनील केलनका, विजय बिसेन, लक्ष्मण भगत, भाऊराव कठाणे, सलाम शेख, अ‍ॅड. येशुलाल उपराडे, पप्पू अटरे, परसराम फडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)