शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

सहा कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर ४७ गावांची धुरा

By admin | Updated: March 27, 2017 00:56 IST

विज वितरण कंपनीच्या नवेगावबांध उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या सुमारे ४७ गावाच्या कामकाजाच्या डोलारा अवघ्या सहा कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे.

नवेगावबांध : विज वितरण कंपनीच्या नवेगावबांध उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या सुमारे ४७ गावाच्या कामकाजाच्या डोलारा अवघ्या सहा कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांची दमछाक होते. हे काम करताना त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. नवेगावबांध उपकेंद्रांतर्गत विविध फिडरच्या माध्यमातून परिसरातील ४७ गावांंना विज पुरवठा केला जातो. दैनंदिन काम, देखभाल दुरूस्ती, नविन जोडणी लावणे, तक्रारीचे निवारण करणे, थकीत देयके वसूल करणे इत्यादी कामे कंपनी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या भरवश्यावरच करून घेते. परंतु नवेगावबांध उपकेंद्रात एकूण १२ कर्मचाऱ्यांऐवजी ६ कर्मचारी नियुक्त आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण पूर्णपणे होत नाही. यामुळे नियुक्त कर्मचाऱ्यांची दमछाक होते तरीही ग्राहकांना देखील समाधान मिळत नाही. विज वितरण कंपनी मात्र आपले कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च होणारे पैसे वाचवित आहे. आता उन्हाळा सुरू झाला. त्यामुळे आता विजेची सर्वांनाच गरज आहे. उद्योगपती, शेतकरी, व्यावसायीक, शासकीय कार्यालये, लग्न समारंभ आदी ठिकाणी विजपुरवठा सुरळीत सुरू असणे आवश्यक आहे. विज वितरण कंपनीने पुरेसा कर्मचारी वर्ग नियुक्त करून ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाला तर वेळेवर पूरवठा करण्यात येत नाही. त्यात विद्युत ग्राहकांच्या अनेक समस्या असतात. त्या संदर्भात तक्रार केली तरी त्याकडे लक्ष द्यायला कुणी नाही. (वार्ताहर)