शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
3
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
4
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
5
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
6
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
7
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
8
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
9
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
10
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
11
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
12
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
13
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
14
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
15
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
16
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
17
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
18
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
19
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
20
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष

सहा कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर ४७ गावांची धुरा

By admin | Updated: March 27, 2017 00:56 IST

विज वितरण कंपनीच्या नवेगावबांध उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या सुमारे ४७ गावाच्या कामकाजाच्या डोलारा अवघ्या सहा कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे.

नवेगावबांध : विज वितरण कंपनीच्या नवेगावबांध उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या सुमारे ४७ गावाच्या कामकाजाच्या डोलारा अवघ्या सहा कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांची दमछाक होते. हे काम करताना त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. नवेगावबांध उपकेंद्रांतर्गत विविध फिडरच्या माध्यमातून परिसरातील ४७ गावांंना विज पुरवठा केला जातो. दैनंदिन काम, देखभाल दुरूस्ती, नविन जोडणी लावणे, तक्रारीचे निवारण करणे, थकीत देयके वसूल करणे इत्यादी कामे कंपनी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या भरवश्यावरच करून घेते. परंतु नवेगावबांध उपकेंद्रात एकूण १२ कर्मचाऱ्यांऐवजी ६ कर्मचारी नियुक्त आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण पूर्णपणे होत नाही. यामुळे नियुक्त कर्मचाऱ्यांची दमछाक होते तरीही ग्राहकांना देखील समाधान मिळत नाही. विज वितरण कंपनी मात्र आपले कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च होणारे पैसे वाचवित आहे. आता उन्हाळा सुरू झाला. त्यामुळे आता विजेची सर्वांनाच गरज आहे. उद्योगपती, शेतकरी, व्यावसायीक, शासकीय कार्यालये, लग्न समारंभ आदी ठिकाणी विजपुरवठा सुरळीत सुरू असणे आवश्यक आहे. विज वितरण कंपनीने पुरेसा कर्मचारी वर्ग नियुक्त करून ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाला तर वेळेवर पूरवठा करण्यात येत नाही. त्यात विद्युत ग्राहकांच्या अनेक समस्या असतात. त्या संदर्भात तक्रार केली तरी त्याकडे लक्ष द्यायला कुणी नाही. (वार्ताहर)