शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

सर्वांच्या समन्वयातून चांगले काम करणार

By admin | Updated: September 20, 2015 02:15 IST

जिल्हा परिषदेत सर्वच विभागात अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत विविध पदे रिक्त आहेत. त्यामुळे कामे तत्परतेने करताना थोडी अडचण निश्चित होत आहे.

मनोज ताजने गोंदियाजिल्हा परिषदेत सर्वच विभागात अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत विविध पदे रिक्त आहेत. त्यामुळे कामे तत्परतेने करताना थोडी अडचण निश्चित होत आहे. पण तरीही सर्वांच्या समन्वयातून जिल्हा परिषदेच्या योजनांची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. सर्वसामान्यांची कामे झाली पाहीजे यावर आपण भर देत असून त्यासाठी सर्वांना घेऊन चालणार आहे, अशी भावना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषाताई मेंढे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केली.१५ सप्टेंबरला जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून दोन महिन्यांचा कार्यकाळ उषाताईंनी पूर्ण केला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेतील एकूण वातावरणाचा त्यांनी केलेला अभ्यास आणि जि.प.च्या आपल्या कार्यकाळात त्या कशा पद्धतीने कारभारावर आपली छाप पाडणार याबद्दल त्यांना बोलते केले. त्यावर त्यांनी मनमोकळेपणाने आपल्या भावना वक्त केल्या.उषाताई म्हणाल्या, यापूर्वी जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण समितीची सभापती म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे सत्तेत राहून काम करण्याचा त्यावेळचा अनुभव आता कामी येत आहे. दोन महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची खुर्ची मिळाल्यानंतर येथील कारभारात फारशा काही त्रुट्या आढळल्या नाहीत. सर्व विभाग आपापल्या जागी काम करीत आहेत. काही योजनांसाठी निधीची गरज आहे. त्यासाठी प्रयत्नशील आहे. सोबतच कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. रिक्त असलेली सर्व विभागांची पदे भरण्यासाठी आम्ही प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळेच काही महिन्यात रिक्त पदांचा अडसर दूर होईल.गेल्यावेळी जिल्हा परिषदेत पूर्णपणे भाजपची सत्ता होती. त्यावेळी अनेक कारणांनी जिल्हा परिषद गाजत होती. आता नवीन पदाधिकाऱ्यांच्या काळात कसे वातावरण राहणार, याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, जिल्हा परिषदेत आधीचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांमध्ये कोणती भांडणे होत होती, किंवा कोण कोणावर वरचढ होत होते यात मी पडणार नाही. पण माझ्या कार्यकाळात असे काही होणार नाही. जिल्हा परिषद म्हणजे माझे दुसरे घर आहे. इथे सर्वांना घेऊन चालावे लागणार आहे. कामात राजकारण करणार नाही. आता तर सर्व कामे ई-टेंडर पद्धतीने आणि नियमानुसार होतील. कामात पारदर्शकता ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. अधिकारी पदाधिकाऱ्यांवर वरचढ होणार नाही. लोकांची कामे करण्यासाठी आम्ही बसलो आहोत. अनेक ग्रामीण लोक माझ्याकडे येऊन समस्या मांडतात. त्यांचे समाधान झाले पाहीजे असा प्रयत्न सुरू असतो.भाजपसोबत जुळवून घेताना काही अडचणी येत नसल्याचे सांगत कामात पक्षीय मतभेद करणार नसल्याचे त्या म्हणाल्या. जिल्हा परिषदेच्या सर्व ५३ सदस्यांना न्याय देण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. संपूर्ण जिल्हा हे माझे कार्यक्षेत्र आहे. त्यामुळे एखाद्या सदस्याच्या क्षेत्रातील समस्या ही त्याची समस्या नसून ती माझी समस्या आहे असे समजून मी ती सोडविण्यासाठी प्राधान्य देणार आहे.‘‘जिल्हा परिषदेत आधीचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांमध्ये कोणती भांडणे होत होती, किंवा कोण कोणावर वरचढ होत होते, यात मी पडणार नाही. पण माझ्या कार्यकाळात असे काही होणार नाही. जिल्हा परिषद म्हणजे माझे दुसरे घर आहे. इथे सर्वांना घेऊन चालावे लागणार आहे. कामात राजकारण करणार नाही.’’प्रत्येक सभेनंतर देणार पत्रकारांना माहितीपत्रकारांचा मी खूप आदर करते. ते समाजाचा आरसा आहेत. त्यांना सर्वसाधारण सभेदरम्यान सभागृहात प्रवेश नसला तरी सभेनंतर प्रत्येक वेळी पत्रपरिषद घेऊन सभागृहात झालेल्या महत्वाच्या चर्चेची, निर्णयांची माहिती देणार असल्याचे उषाताईंनी सांगितले. महिला सरपंचांना देणार बळआता ५० टक्के ग्रामपंचायतींवर महिला सरपंच विराजमान झाल्या आहेत. त्यांना कामे करताना अनेक अडचणी येतात. माझ्याशी बोलताना त्या आपल्या अडचणी सांगतात. त्यामुळे त्या अडचणींवर मात करून कशा पद्धतीने ‘स्ट्राँग’ व्हायचे याचे प्रशिक्षण त्यांना दिले जाईल. त्या स्ट्राँग झाल्या तर त्यांचा कारभार स्ट्राँग होईल. त्यामुळे त्यांना बळ देणे गरजेचे असल्याचे उषाताई म्हणाल्या.