शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांच्या समन्वयातून चांगले काम करणार

By admin | Updated: September 20, 2015 02:15 IST

जिल्हा परिषदेत सर्वच विभागात अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत विविध पदे रिक्त आहेत. त्यामुळे कामे तत्परतेने करताना थोडी अडचण निश्चित होत आहे.

मनोज ताजने गोंदियाजिल्हा परिषदेत सर्वच विभागात अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत विविध पदे रिक्त आहेत. त्यामुळे कामे तत्परतेने करताना थोडी अडचण निश्चित होत आहे. पण तरीही सर्वांच्या समन्वयातून जिल्हा परिषदेच्या योजनांची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. सर्वसामान्यांची कामे झाली पाहीजे यावर आपण भर देत असून त्यासाठी सर्वांना घेऊन चालणार आहे, अशी भावना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषाताई मेंढे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केली.१५ सप्टेंबरला जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून दोन महिन्यांचा कार्यकाळ उषाताईंनी पूर्ण केला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेतील एकूण वातावरणाचा त्यांनी केलेला अभ्यास आणि जि.प.च्या आपल्या कार्यकाळात त्या कशा पद्धतीने कारभारावर आपली छाप पाडणार याबद्दल त्यांना बोलते केले. त्यावर त्यांनी मनमोकळेपणाने आपल्या भावना वक्त केल्या.उषाताई म्हणाल्या, यापूर्वी जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण समितीची सभापती म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे सत्तेत राहून काम करण्याचा त्यावेळचा अनुभव आता कामी येत आहे. दोन महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची खुर्ची मिळाल्यानंतर येथील कारभारात फारशा काही त्रुट्या आढळल्या नाहीत. सर्व विभाग आपापल्या जागी काम करीत आहेत. काही योजनांसाठी निधीची गरज आहे. त्यासाठी प्रयत्नशील आहे. सोबतच कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. रिक्त असलेली सर्व विभागांची पदे भरण्यासाठी आम्ही प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळेच काही महिन्यात रिक्त पदांचा अडसर दूर होईल.गेल्यावेळी जिल्हा परिषदेत पूर्णपणे भाजपची सत्ता होती. त्यावेळी अनेक कारणांनी जिल्हा परिषद गाजत होती. आता नवीन पदाधिकाऱ्यांच्या काळात कसे वातावरण राहणार, याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, जिल्हा परिषदेत आधीचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांमध्ये कोणती भांडणे होत होती, किंवा कोण कोणावर वरचढ होत होते यात मी पडणार नाही. पण माझ्या कार्यकाळात असे काही होणार नाही. जिल्हा परिषद म्हणजे माझे दुसरे घर आहे. इथे सर्वांना घेऊन चालावे लागणार आहे. कामात राजकारण करणार नाही. आता तर सर्व कामे ई-टेंडर पद्धतीने आणि नियमानुसार होतील. कामात पारदर्शकता ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. अधिकारी पदाधिकाऱ्यांवर वरचढ होणार नाही. लोकांची कामे करण्यासाठी आम्ही बसलो आहोत. अनेक ग्रामीण लोक माझ्याकडे येऊन समस्या मांडतात. त्यांचे समाधान झाले पाहीजे असा प्रयत्न सुरू असतो.भाजपसोबत जुळवून घेताना काही अडचणी येत नसल्याचे सांगत कामात पक्षीय मतभेद करणार नसल्याचे त्या म्हणाल्या. जिल्हा परिषदेच्या सर्व ५३ सदस्यांना न्याय देण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. संपूर्ण जिल्हा हे माझे कार्यक्षेत्र आहे. त्यामुळे एखाद्या सदस्याच्या क्षेत्रातील समस्या ही त्याची समस्या नसून ती माझी समस्या आहे असे समजून मी ती सोडविण्यासाठी प्राधान्य देणार आहे.‘‘जिल्हा परिषदेत आधीचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांमध्ये कोणती भांडणे होत होती, किंवा कोण कोणावर वरचढ होत होते, यात मी पडणार नाही. पण माझ्या कार्यकाळात असे काही होणार नाही. जिल्हा परिषद म्हणजे माझे दुसरे घर आहे. इथे सर्वांना घेऊन चालावे लागणार आहे. कामात राजकारण करणार नाही.’’प्रत्येक सभेनंतर देणार पत्रकारांना माहितीपत्रकारांचा मी खूप आदर करते. ते समाजाचा आरसा आहेत. त्यांना सर्वसाधारण सभेदरम्यान सभागृहात प्रवेश नसला तरी सभेनंतर प्रत्येक वेळी पत्रपरिषद घेऊन सभागृहात झालेल्या महत्वाच्या चर्चेची, निर्णयांची माहिती देणार असल्याचे उषाताईंनी सांगितले. महिला सरपंचांना देणार बळआता ५० टक्के ग्रामपंचायतींवर महिला सरपंच विराजमान झाल्या आहेत. त्यांना कामे करताना अनेक अडचणी येतात. माझ्याशी बोलताना त्या आपल्या अडचणी सांगतात. त्यामुळे त्या अडचणींवर मात करून कशा पद्धतीने ‘स्ट्राँग’ व्हायचे याचे प्रशिक्षण त्यांना दिले जाईल. त्या स्ट्राँग झाल्या तर त्यांचा कारभार स्ट्राँग होईल. त्यामुळे त्यांना बळ देणे गरजेचे असल्याचे उषाताई म्हणाल्या.