शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

अधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावर करते भरारी पथक काम

By admin | Updated: November 24, 2014 23:00 IST

वीज चोरी पकडताना ग्राहकांवर मोठ्या प्रमाणात वीज आकारणी केली जाते. वीज चोरी पकडणारे भरारी पथक विद्युत वितरण कंपनीच्या काही अधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावर काम करून आकसपूर्ण व्यवहार करते,

काचेवानी : वीज चोरी पकडताना ग्राहकांवर मोठ्या प्रमाणात वीज आकारणी केली जाते. वीज चोरी पकडणारे भरारी पथक विद्युत वितरण कंपनीच्या काही अधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावर काम करून आकसपूर्ण व्यवहार करते, असा आरोप नागरिकांनी केला आहे.ग्रामीण व शहरी भागात सर्वाधिक वीज चोरी होते. दिवसासह रात्रीलासुद्धा वीज चोरी करण्यामध्ये बड्या लोकांचा अधिक वाटा आहे. गरीब आकडे लावून वीज चोरी करतात. वीज चोरी करणाऱ्यांची नावे त्या परिसरातील लाईनमन व कनिष्ठ अभियंत्यांना माहीत असते. मात्र चोरी करणाऱ्यांकडून महिनावारी रक्कम वसूल करून ते शांत राहतात. मात्र ज्यांच्याकडून वसुली होत नाही, त्यांना उपकार्यकारी अधिकारी किंवा भरारी पथकाच्या माध्यमाने फसविले जाते. शिवाय मोठ्या प्रमाणात बिलाची आकारणी करून धमक्या देवून पैसे उकळले जातात, असा नागरिकांचा आरोप आहे. २९ आॅक्टोबर रोजी गोंदियाचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी यांच्या निर्देशनात व गंगाझरी शाखेंतर्गत येणाऱ्या काचेवानी येथे धाड घालण्यात आली. बरबसपुरा येथे माने परिवारावरही धाड घालण्यात आली. यावेळी लाईनमन व कनिष्ठ अभियंता यांनी केलेल्या चुकीची किंवा गुन्ह्याची नोंद तपासात घेतली नाही. कारवाईप्रसंगी बेरडीपारचे माजी सरपंच गणेश कोल्हटकर व अ‍ॅड. लंकेश चौरे माने कुटुंबीयांच्या घरी होते. मात्र भरारी पथकाने त्यांची साक्ष घेतली नाही. त्यामुळे भरारी पथकाने केलेला तपास योग्य नसून वीज कर्मचारी किंवा अधिकाऱ्याच्या इशारावर करण्यात आल्याचा माने कुटुंबीयांचा आरोप आहे. माने कुटुंबीयांनी सांगितल्यानुसार बरबरपुरा येथे गंगाझरी शाखेचे कनिष्ठ अभियंता अमित चवरे व कंत्राटी कर्मचारी यांनी गावातीलच धर्मराज चौधरी या युवकाला विद्युत खांबावर चढविले. यावेळी तो खांबावरून खाली आदळला. यावेळी कनिष्ठ अभियंता नसला तरी कंत्राटी कर्मचारी पाठविण्याची नैतिक जबाबदारी अभियंत्याची होती. याची पोलिसात तक्रार देण्यात आली नसून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु या प्रकरणाची तक्रार होणार या भीतीने भरारी पथकाची धाड माने कुटुंबीयांवर घालण्यात आली. माने कुटुंबीयांनी जून २०१४ मध्ये नवीन घराची पूजा केली. त्यावेळी जीर्ण असलेल्या जुन्या घरातील मीटर नवीन घरी हलविण्याचे आदेश कनिष्ठ अभियंता अमित चवरे यांनी लाईनमन बिसेनला दिले होते. लाईनमनने मीटर हलविले, मात्र खांबावरून सर्विस वायर काढला नाही. आपण पुन्हा येवून खांबावरून विद्युत प्रवाह बंद करून देवू, असे बोलून गेले. यावेळी पाहुणे मंडळी व बरबसपुरा येथील माजी ग्रा.पं. सदस्य माणिक कटरे उपस्थित होते. यानंतर झाडे कापण्याबद्दल व वीज प्रवाह बंद करण्याबद्दल कनिष्ठ अभियंता व लाईनमनला जून महिन्यापासून चार-पाच वेळा सांगण्यात आले. मात्र टलवाटलवी करून दुर्लक्षच करण्यात आले. विद्युत प्रवाह सुरू असलेला सर्व्हिस वायर कार्यरत कर्मचारी, लाईनमन, कंत्राटी कर्मचारी व कनिष्ठ अभियंत्याने तपासून का घेतले नाही? हे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी समजून घ्यावे, असे माने कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. (वार्ताहर)