शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

अधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावर करते भरारी पथक काम

By admin | Updated: November 24, 2014 23:00 IST

वीज चोरी पकडताना ग्राहकांवर मोठ्या प्रमाणात वीज आकारणी केली जाते. वीज चोरी पकडणारे भरारी पथक विद्युत वितरण कंपनीच्या काही अधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावर काम करून आकसपूर्ण व्यवहार करते,

काचेवानी : वीज चोरी पकडताना ग्राहकांवर मोठ्या प्रमाणात वीज आकारणी केली जाते. वीज चोरी पकडणारे भरारी पथक विद्युत वितरण कंपनीच्या काही अधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावर काम करून आकसपूर्ण व्यवहार करते, असा आरोप नागरिकांनी केला आहे.ग्रामीण व शहरी भागात सर्वाधिक वीज चोरी होते. दिवसासह रात्रीलासुद्धा वीज चोरी करण्यामध्ये बड्या लोकांचा अधिक वाटा आहे. गरीब आकडे लावून वीज चोरी करतात. वीज चोरी करणाऱ्यांची नावे त्या परिसरातील लाईनमन व कनिष्ठ अभियंत्यांना माहीत असते. मात्र चोरी करणाऱ्यांकडून महिनावारी रक्कम वसूल करून ते शांत राहतात. मात्र ज्यांच्याकडून वसुली होत नाही, त्यांना उपकार्यकारी अधिकारी किंवा भरारी पथकाच्या माध्यमाने फसविले जाते. शिवाय मोठ्या प्रमाणात बिलाची आकारणी करून धमक्या देवून पैसे उकळले जातात, असा नागरिकांचा आरोप आहे. २९ आॅक्टोबर रोजी गोंदियाचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी यांच्या निर्देशनात व गंगाझरी शाखेंतर्गत येणाऱ्या काचेवानी येथे धाड घालण्यात आली. बरबसपुरा येथे माने परिवारावरही धाड घालण्यात आली. यावेळी लाईनमन व कनिष्ठ अभियंता यांनी केलेल्या चुकीची किंवा गुन्ह्याची नोंद तपासात घेतली नाही. कारवाईप्रसंगी बेरडीपारचे माजी सरपंच गणेश कोल्हटकर व अ‍ॅड. लंकेश चौरे माने कुटुंबीयांच्या घरी होते. मात्र भरारी पथकाने त्यांची साक्ष घेतली नाही. त्यामुळे भरारी पथकाने केलेला तपास योग्य नसून वीज कर्मचारी किंवा अधिकाऱ्याच्या इशारावर करण्यात आल्याचा माने कुटुंबीयांचा आरोप आहे. माने कुटुंबीयांनी सांगितल्यानुसार बरबरपुरा येथे गंगाझरी शाखेचे कनिष्ठ अभियंता अमित चवरे व कंत्राटी कर्मचारी यांनी गावातीलच धर्मराज चौधरी या युवकाला विद्युत खांबावर चढविले. यावेळी तो खांबावरून खाली आदळला. यावेळी कनिष्ठ अभियंता नसला तरी कंत्राटी कर्मचारी पाठविण्याची नैतिक जबाबदारी अभियंत्याची होती. याची पोलिसात तक्रार देण्यात आली नसून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु या प्रकरणाची तक्रार होणार या भीतीने भरारी पथकाची धाड माने कुटुंबीयांवर घालण्यात आली. माने कुटुंबीयांनी जून २०१४ मध्ये नवीन घराची पूजा केली. त्यावेळी जीर्ण असलेल्या जुन्या घरातील मीटर नवीन घरी हलविण्याचे आदेश कनिष्ठ अभियंता अमित चवरे यांनी लाईनमन बिसेनला दिले होते. लाईनमनने मीटर हलविले, मात्र खांबावरून सर्विस वायर काढला नाही. आपण पुन्हा येवून खांबावरून विद्युत प्रवाह बंद करून देवू, असे बोलून गेले. यावेळी पाहुणे मंडळी व बरबसपुरा येथील माजी ग्रा.पं. सदस्य माणिक कटरे उपस्थित होते. यानंतर झाडे कापण्याबद्दल व वीज प्रवाह बंद करण्याबद्दल कनिष्ठ अभियंता व लाईनमनला जून महिन्यापासून चार-पाच वेळा सांगण्यात आले. मात्र टलवाटलवी करून दुर्लक्षच करण्यात आले. विद्युत प्रवाह सुरू असलेला सर्व्हिस वायर कार्यरत कर्मचारी, लाईनमन, कंत्राटी कर्मचारी व कनिष्ठ अभियंत्याने तपासून का घेतले नाही? हे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी समजून घ्यावे, असे माने कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. (वार्ताहर)