शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

११२८ विहिरींचे काम अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 21:25 IST

दुष्काळावर मात करण्यासाठी व शेतकऱ्यांना सिंचनाची सोय करता यावी यासाठी ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना सुरू करण्यात आली. तरीही भूगर्भातील पाणी वाढत नसल्याचे पाहून सिंचनासाठी सिंचन विहीर देण्याची योजना सुरू केली. दोन वर्षाच्या काळात फक्त ८७२ विहिरींचे काम पूर्ण झाले आहेत. तर १ हजार १२८ विहिरींचे काम अपूर्ण आहे.

ठळक मुद्देफक्त ८७२ विहिरींचे काम पूर्ण : जिल्ह्यातील ४२ विहिरी कोरड्या

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दुष्काळावर मात करण्यासाठी व शेतकऱ्यांना सिंचनाची सोय करता यावी यासाठी ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना सुरू करण्यात आली. तरीही भूगर्भातील पाणी वाढत नसल्याचे पाहून सिंचनासाठी सिंचन विहीर देण्याची योजना सुरू केली. दोन वर्षाच्या काळात फक्त ८७२ विहिरींचे काम पूर्ण झाले आहेत. तर १ हजार १२८ विहिरींचे काम अपूर्ण आहे.राज्य सरकार द्वारे सिंचनविहीर शेतकऱ्यांसाठी वरदान असल्याचे समजले जाते. यामुळे सन २०१६-१७ मध्ये विदर्भातील ११ हजार शेतकऱ्यांना सिंचनविहीर देण्याचे उद्दीष्टे ठेवले होते. यात गोंदिया जिल्ह्यासाठी २ हजार विहिरींचे उद्दीष्ट ठेवून कामांना मंजूरी व कार्यारंभ आदेशही देण्यात आले. परंतु मागील दोन वर्षात खूप कमी विहिरींचे बांधकाम पूर्ण करण्यात आले.सन २०१६-१७ ते २०१८-१९ या तीन वर्षात २ हजार विहिरींचे काम पूर्ण करायचे होते. मात्र आतापर्यंत फक्त ८७२ विहीरींचे (४३.६ टक्के) काम पूर्ण करण्यात आले असून १ हजार १२८ विहिरींचे (५६.४ टक्के) काम अपूर्ण असल्याने शेतकºयांचे सिंचन यंदाही फसणार आहे.निसर्गाच्या क्रौर्यामुळे दरवर्षी अत्यल्प पावसाचा बळी शेतकरीच ठरत आहे. शासनाने शेतकºयांना सिंचनाची सोय म्हणून विहीर बांधून देण्याचा मानस बांधला. परंतु कॅबिनेट मंत्री असलेल्या राजकुमार बडोले यांच्या जिल्ह्यात शासनाच्या विहिरींची अशी दुरवस्था आहे.जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागातील अधिकाºयांच्या उदासिनतेमुळे आतापर्यंत शेतकºयांना त्यांच्या हक्काच्या विहिरी उपलब्ध होऊ शकल्या नाही.विहिरींमध्ये केले बोअरवेलविहिरींमध्ये बोअरवेल करण्यात आलेल्या विहिरींची संख्याही बरीच आहे. गोरेगाव ६०, गोंदिया ७४, तिरोडा १५, आमगाव २०, सडक-अर्जुनी २४, देवरी १८, अर्जुनी-मोरगाव ४६ व सालेकसात ५२ सिंचन विहिरींवर बोअरवेल करण्यात आले. अर्जुनी-मोरगावच्या ३ विहिरींचे काम अयशस्वी झाले आहे.कोट्यवधी रुपये पाण्यातशेतकऱ्यांच्या शेतीला सिंचन व्हावे यासाठी विहिरींची योजना पुढे आणली. परंतु पाणी कोणत्या ठिकाणी आहे हे न तपासता सरळ कुठेही विहीर खोदल्यामुळे जिल्ह्यातील ४२ विहिरींना पाणी लागले नाही. शासनाचे कोट्यवधी रूपये पाण्यात गेले आहे. ५७२ विहिरींचे काम ७५ टक्यापेक्षा अधिक झाले आहे. १५४ विहिरींचे काम ५० ते ७५ टक्के दरम्यान झाले आहे. २१५ विहिरींचे काम २५ ते ५० टक्के दरम्यान झाले आहे तर १८७ विहिरींचे काम २५ टक्यावर झाले आहे.मिळाले २२ कोटीसिंचन विहिरींसाठी राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला २२ कोटी ५० लाख रूपये दिले आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला विहिरींच्या संख्येच्या आधारावर पैसे देण्यात आले आहे. शेतकºयांना सिंचनाची सोय व्हावी म्हणून या विहिरींसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला परंतु काम संथ गतीने होत आहे.