शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

११२८ विहिरींचे काम अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 21:25 IST

दुष्काळावर मात करण्यासाठी व शेतकऱ्यांना सिंचनाची सोय करता यावी यासाठी ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना सुरू करण्यात आली. तरीही भूगर्भातील पाणी वाढत नसल्याचे पाहून सिंचनासाठी सिंचन विहीर देण्याची योजना सुरू केली. दोन वर्षाच्या काळात फक्त ८७२ विहिरींचे काम पूर्ण झाले आहेत. तर १ हजार १२८ विहिरींचे काम अपूर्ण आहे.

ठळक मुद्देफक्त ८७२ विहिरींचे काम पूर्ण : जिल्ह्यातील ४२ विहिरी कोरड्या

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दुष्काळावर मात करण्यासाठी व शेतकऱ्यांना सिंचनाची सोय करता यावी यासाठी ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना सुरू करण्यात आली. तरीही भूगर्भातील पाणी वाढत नसल्याचे पाहून सिंचनासाठी सिंचन विहीर देण्याची योजना सुरू केली. दोन वर्षाच्या काळात फक्त ८७२ विहिरींचे काम पूर्ण झाले आहेत. तर १ हजार १२८ विहिरींचे काम अपूर्ण आहे.राज्य सरकार द्वारे सिंचनविहीर शेतकऱ्यांसाठी वरदान असल्याचे समजले जाते. यामुळे सन २०१६-१७ मध्ये विदर्भातील ११ हजार शेतकऱ्यांना सिंचनविहीर देण्याचे उद्दीष्टे ठेवले होते. यात गोंदिया जिल्ह्यासाठी २ हजार विहिरींचे उद्दीष्ट ठेवून कामांना मंजूरी व कार्यारंभ आदेशही देण्यात आले. परंतु मागील दोन वर्षात खूप कमी विहिरींचे बांधकाम पूर्ण करण्यात आले.सन २०१६-१७ ते २०१८-१९ या तीन वर्षात २ हजार विहिरींचे काम पूर्ण करायचे होते. मात्र आतापर्यंत फक्त ८७२ विहीरींचे (४३.६ टक्के) काम पूर्ण करण्यात आले असून १ हजार १२८ विहिरींचे (५६.४ टक्के) काम अपूर्ण असल्याने शेतकºयांचे सिंचन यंदाही फसणार आहे.निसर्गाच्या क्रौर्यामुळे दरवर्षी अत्यल्प पावसाचा बळी शेतकरीच ठरत आहे. शासनाने शेतकºयांना सिंचनाची सोय म्हणून विहीर बांधून देण्याचा मानस बांधला. परंतु कॅबिनेट मंत्री असलेल्या राजकुमार बडोले यांच्या जिल्ह्यात शासनाच्या विहिरींची अशी दुरवस्था आहे.जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागातील अधिकाºयांच्या उदासिनतेमुळे आतापर्यंत शेतकºयांना त्यांच्या हक्काच्या विहिरी उपलब्ध होऊ शकल्या नाही.विहिरींमध्ये केले बोअरवेलविहिरींमध्ये बोअरवेल करण्यात आलेल्या विहिरींची संख्याही बरीच आहे. गोरेगाव ६०, गोंदिया ७४, तिरोडा १५, आमगाव २०, सडक-अर्जुनी २४, देवरी १८, अर्जुनी-मोरगाव ४६ व सालेकसात ५२ सिंचन विहिरींवर बोअरवेल करण्यात आले. अर्जुनी-मोरगावच्या ३ विहिरींचे काम अयशस्वी झाले आहे.कोट्यवधी रुपये पाण्यातशेतकऱ्यांच्या शेतीला सिंचन व्हावे यासाठी विहिरींची योजना पुढे आणली. परंतु पाणी कोणत्या ठिकाणी आहे हे न तपासता सरळ कुठेही विहीर खोदल्यामुळे जिल्ह्यातील ४२ विहिरींना पाणी लागले नाही. शासनाचे कोट्यवधी रूपये पाण्यात गेले आहे. ५७२ विहिरींचे काम ७५ टक्यापेक्षा अधिक झाले आहे. १५४ विहिरींचे काम ५० ते ७५ टक्के दरम्यान झाले आहे. २१५ विहिरींचे काम २५ ते ५० टक्के दरम्यान झाले आहे तर १८७ विहिरींचे काम २५ टक्यावर झाले आहे.मिळाले २२ कोटीसिंचन विहिरींसाठी राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला २२ कोटी ५० लाख रूपये दिले आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला विहिरींच्या संख्येच्या आधारावर पैसे देण्यात आले आहे. शेतकºयांना सिंचनाची सोय व्हावी म्हणून या विहिरींसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला परंतु काम संथ गतीने होत आहे.