शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

तोंडातून शब्द निघत नाही; निघतात फक्त अश्रू()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:32 IST

नरेश रहिले तिरोडा : घरात पाच सदस्य परंतु पाचपैकी चौघांची निर्घृण हत्या झाली. त्याच घरात एका खोलीत बंद दाराच्या ...

नरेश रहिले

तिरोडा : घरात पाच सदस्य परंतु पाचपैकी चौघांची निर्घृण हत्या झाली. त्याच घरात एका खोलीत बंद दाराच्या आत पक्षाघाताच्या आजाराने खाटेवर पडून असलेल्या ९० वर्षांच्या केमनबाई डोंगरू बिसेन यांना या घटनेची माहिती झालीच नाही. घटनेमुळे घरात आरडाओरड झाली असेल तर तेसुद्धा त्या वृद्धेला सांगताच येत नाही. मागील अनेक वर्षांपासून आजारी असलेल्या केमनबाई बिसेन यांना स्वबळावर उठता येत नाही शिवाय बोलताही येत नाही.

ज्या मुलाला जन्म दिला तो मुलगा, सून व ज्या नातवंडांना हातावर खेळविले त्यांनाही क्षणार्धात काळाने घाला घातला. पहाटेपासून मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असताना केमनबाई नेहमीसारख्याच आपल्या खाटेवर झोपूनच होत्या. वाहनचालक प्रताप रहांगडाले हा नेहमीप्रमाणे वाहनाची किल्ली घेण्यासाठी मृत रेवचंद डोंगरु बिसेन (५१) यांच्या दारात आला तेव्हा त्याला या घरातील मृतदेह जागोजागी पडलेले दिसले. त्याने आरडाओरड केल्यावर घराजवळील लोक गोळा झाले. चुरडी येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक रेवचंद डोंगरु बिसेन (५१) हे गळफास घेतलेल्या अवस्थेत तर पत्नी मालता रेवचंद्र बिसेन (४५), मुलगी पौर्णिमा रेवचंद बिसेन (२०) व मुलगा तेजस रेवचंद बिसेन (१७) यांच्या डोक्यावर ट्रॅक्टरच्या स्पेंडलने वार करून खून करण्यात आला होता. घरभर रक्ताचा सडा पडलेला होता. लोकांनी गर्दी केल्यावर केमनबाई घरात जीवंत असल्याचे लोकांच्या लक्षात आले. त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला असला तरी पक्षाघातामुळे त्यांना उठता येत नाही व बोलताही येत नाही. घरात झालेल्या घटनेमुळे फक्त ९० वर्षांची आजी अश्रू ढाळत आहेत.

.................

तीन गोष्टींमुळे रेवचंद यांचीही हत्याच

रेवचंद बिसेन यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेला आढळला. आरोपींनी या घटनेला चुकीच्या पद्धतीने वळविण्यासाठी जणू रेवचंदनेच खून करून आत्महत्या केल्याचे दर्शविण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपींनी शेवटी काही पुरावे सोडलेच. रेवचंद यांचा मृतदेह लटकविण्यात आला त्या दोराला घरातून खिडकीपर्यंत नेऊन बांधण्यात आले. तिघांचा ज्या पेंडलने मारून खून करण्यात आला तो पेंडल घटनास्थळपासून १५ फूट अंतरावर वऱ्हांड्यात आढळला. रेवचंद यांनी हे कृत्य केले असते तर ९० वर्षांच्या म्हाताऱ्या आईला एकाकी सोडून हे कृत्य केले नसते. तिला भावांकडे सोडून दिले असते. गावातच चार भावंडे असताना त्यांच्याकडे तिला सोपविला असते. परंतु रेवचंदच्या घरात वाद नाही काहीच नाही अशातच रात्री जेवणकरून शांततेने झोपी गेलेले बिसेन कुटुंबीय सकाळचा दिवस पाहूच शकले नाही. या प्रकरणातील आरोपींपर्यंत पोलीस कधी पोहचतील याची उत्सुकता लोकांना लागली आहे.