शहरं
Join us  
Trending Stories
1
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
2
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
3
जीजू अन् मेहुणीचा सुरू होता बेडरूम रोमान्स, इतक्यात पती आला; पुढे जे घडलं त्यानं अख्खं गाव सुन्न झालं!
4
ज्येष्ठांसाठी जॅकपॉट आहे Post Officeची ही स्कीम; फक्त एकदा गुंतवा पैसे, दर महिन्याला ₹२०,५०० चं इन्कम फिक्स
5
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
6
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
7
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
8
राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले...
9
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
10
फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले
11
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
12
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
13
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
14
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
15
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
16
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
17
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
18
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
19
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
20
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती

प्रफुल्ल पटेलांनी पाळला दिलेला शब्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:28 IST

गोंदिया : गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांतील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. परिणामी या दोन्ही जिल्ह्यांत रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा ...

गोंदिया : गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांतील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. परिणामी या दोन्ही जिल्ह्यांत रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. हीच बाब लक्षात घेत खा. प्रफुल्ल पटेल यांनी त्वरित कॅडिला कंपनीच्या व्यवस्थापकांशी चर्चा करून रेमडेसिविर इंजेक्शनचा स्टॉक उपलब्ध करून देण्यास सांगितले. त्यानंतर दोन्ही जिल्ह्यांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन शनिवारी उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार असून खा. प्रफुल्ल पटेल यांनी दिलेला शब्द पाळला.

संपूर्ण राज्यात सध्या कोरोनाचा उद्रेक झाल्याने बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यातच गंभीर रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने त्यांच्यावर उपचारासाठी रेमडेसिविर इंजेक्शनची गरज आहे. एकाच वेळी या इंजेक्शनची मागणी वाढल्याने सर्वत्र तुटवडा निर्माण झाला आहे. गोंदिया आणि भंडार जिल्ह्यातसुद्धा रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला असून त्याची अतिरिक्त दराने विक्री केली जात असल्याची चर्चा आहे. परिणामी गोरगरीब आणि सामान्य रुग्णांची परवड होत आहे. हीच बाब लक्षात घेत खा. प्रफुल्ल पटेल यांनी कॅडिला कंपनीच्या व्यवस्थापकांशी चर्चा करून रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यास सांगितले. त्यानंतर या कंपनीने दोन्ही जिल्ह्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून दिले आहे. विशेष म्हणजे माजी आ. राजेंद्र जैन यांनीसुद्धा जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला असल्याची बाब खा. प्रफुल्ल पटेल यांच्या लक्षात आणून दिली होती. तसेच या इंजेक्शनचा साठा उपलब्ध व्हावा यासाठी ते माजी आ. राजेंद्र जैन हेसुद्धा सातत्याने प्रयत्नरत होते. दोन शुक्रवारी (दि.१६) पालकमंत्री नवाब मलिक हे जिल्ह्याचे दौऱ्यावर आले असता खा. प्रफुल्ल पटेल यांनी गोंदिया आणि भंडारा या दोन्ही जिल्ह्यांसाठी २ हजार रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला होता. तो शब्द पाळत दोन्ही जिल्ह्यांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून दिले आहे. यापैकी १ हजार इंजेक्शन गोंदिया व १ हजार इंजेक्शन भंडारा जिल्ह्यासाठी देण्यात येणार आहेत.

........

निर्धारित दरानेच होणार पुरवठा

गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील सर्व मेडिकलमध्ये रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आले असून त्याची शासनाने निर्धारित केलेल्या दरानेच ग्राहकांना विक्री करण्यात येणार आहे. त्यासाठी ग्राहकांनासुद्धा अतिरिक्त पैसे मोजावे लागणार नसल्याचे माजी आ. राजेंद्र जैन यांनी सांगितले.