शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

‘महिलांची प्रगती, समाजाची उन्नती’

By admin | Updated: March 13, 2017 00:28 IST

ठिकठिकाणी महिला मेळावे घेतले जातात. या मेळाव्यात उपस्थित महिलांना आजही पाहिजे ते वैवाहिक, शैक्षणिक, आर्थिक व भावनिक

उषा शहारे : आरक्षणामुळे महिलांना राजकारणात महत्त्वाचे स्थान देवरी : ठिकठिकाणी महिला मेळावे घेतले जातात. या मेळाव्यात उपस्थित महिलांना आजही पाहिजे ते वैवाहिक, शैक्षणिक, आर्थिक व भावनिक स्वातंत्र्य प्राप्त झालेले नाही. शिक्षण घेवून प्रगती करणाऱ्या महिलांची संख्या कमी आहे. आज आपल्या देशात ५० टक्के महिलांना आरक्षणामुळे राजकारणात खूप महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. महिलांचे संख्याबळ वाढून काही महिला राजकारणामुळे मोठमोठ्या पदावर आरुढ झाल्या आहेत. या अधिकाराची जाण ठेवून त्यांनी आपल्या गावाचा, क्षेत्राचा व जिल्ह्याचा विकास करावा. महिलांच्या प्रगतीमुळे समाजाची उन्नती होत असते, असे प्रतिपादन गोंदिया जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष तथा जि.प. सदस्य उषा शहारे यांनी केले. देवरी तालुका महिला काँग्रेसच्या वतीने चिचगड येथे बिरसा भवनात गुरूवार (दि.९) घेण्यात आलेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून त्या महिलांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. उद्घाटन जि.प.सदस्य माधुरी कुंभरे यांच्या हस्ते, जि.प. सदस्य उषा शहारे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. दीप प्रज्वलन माजी जि.प. सदस्य मीना राऊत यांनी केले. याप्रसंगी प्रामुख्याने पं.स. सदस्य लखनी सलामे, तालुका महिला काँग्रेस उपाध्यक्ष तुकाय ताराम, सामाजिक कार्यकर्ता उषा भैसारे, निलजच्या रेखा घरत, पिपरखारीच्या सरपंच जसवंता भारद्वाज, मोहाडीच्या मोनाली राऊत, तिरुवंता राऊत, बचत गटाच्या अध्यक्ष धनश्री गंगासागर, वनहक्क समितीच्या अध्यक्ष किरण कोवे, डोंगरगाव बचत गटच्या अध्यक्ष भोयर, पिपरखारीच्या अंबादे, कोटजांभोराच्या राऊत, भागी येथील कोरोडे, आलेवाडाचे ग्रा.पं. सदस्य शांता कोराम, शीला चंदनमलागर, माजी सरपंच पायताजन शाहू यांच्यासह तालुक्यातील महिला काँग्रेसच्या पदाधिकाारी व कार्यकर्त्या बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. आपल्या मार्गदर्शनात जि.प. सदस्य उषा शहारे पुढे म्हणाल्या, आज महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक व व्यावसायिक सबळता येत आहे, ही फार आनंदाची गोष्ट आहे. भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम पोषण आहार योजना आणि शासकीय विविध योजनांच्या माध्यमातून महिला व बालकांचे आरोग्य जपण्याचे व सबलीकरणाचे काम सुरू आहे. या योजनांचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. अंधश्रद्धेबाबत त्या म्हणाल्या, महिलांच्या बाबतीत बऱ्याचदा असे दिसून येते की महिलांच्या मानगुटीवर अंधश्रध्देचे भूत बसलेले आहे. या अंधश्रध्देतून बाहेर पडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्याप्रमाणे, जर समाजाची व देशाची प्रगती करायची असेल तर आधी महिलांची प्रगती होणे गरजेचे आहे. त्यांना सक्षम करणे आवश्यक आहे, असेही उषा शहारे यांनी सांगितले. प्रास्ताविक व संचालन तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुषमा घरतकर यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रगती कोल्हारे यांनी मानले. (प्रतिनिधी)