शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

गोंदियात साकारणार महिला प्रशिक्षण केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 22:31 IST

काँग्रेस पक्षाने गोंदिया जिल्हा परिषदेसारख्या महत्वपूर्ण स्वराज्य संस्थेत रजनी नागपुरे, उषा मेंढे व आता सीमा मडावी यांच्या रूपाने महिला नेतृत्वाला समोर आणण्याचे काम केले आहे.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : जिल्हास्तरीय महिला मेळावा

आॅनलाईन लोकमतगोंदिया : काँग्रेस पक्षाने गोंदिया जिल्हा परिषदेसारख्या महत्वपूर्ण स्वराज्य संस्थेत रजनी नागपुरे, उषा मेंढे व आता सीमा मडावी यांच्या रूपाने महिला नेतृत्वाला समोर आणण्याचे काम केले आहे. यातून काँग्रेस पक्ष महिला सशक्तीकरणासाठी किती गंभीर आहे, याची प्रचिती येते. जिल्ह्यात महिलांशी संबंधित महिला आर्थिक विकास महामंडळासाठी भव्य प्रशिक्षण केंद्राचे बांधकाम जयस्तंभ चौकातील वन विभागाच्या कार्यालयाच्या ठिकाणी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी येथे सांगितले.जि.प. महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय महिला मेळावा घेण्यात आला. मेळाव्याच्या उद्घाटकीय भाषणातून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी पालकमंत्री राजकुमार बडोले होते. अतिथी म्हणून जि.प. अध्यक्ष सीमा मडावी, माजी जि.प. अध्यक्ष उषा मेंढे, महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे, पं.स. सभापती माधुरी हरिणखेडे, जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. राजा दयानिधी उपस्थित होते.आ. अग्रवाल म्हणाले, भारताच्या इतिहासात अनेक महिलांनी देशाचे नाव मोठे केले. स्वतंत्र भारतात काँग्रेस सरकारने महिलांच्या उत्थानासाठी निरंतर नवनवीन योजनांना लागू केले. त्यामुळे महिलांनी घराबाहेर निघून शासकीय व राजकीय क्षेत्रात आपली पकड मजबूत करणे सुरू केले. जुन्या संस्कृतीमुळे महिला घराबाहेर निघू शकत नव्हत्या. मात्र काँग्रेस सरकारच्या धोरणांमुळे आज राष्टÑपती पदापर्यंत महिला पोहोचली. देशाची प्रथम महिला पंतप्रधान सुध्दा काँग्रेस सरकारनेच दिले. भारतरत्न इंदिरा गांधी सारख्या लोहमहिलेचे नेतृत्व भारताला लाभले. चारवेळा भारत देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान पदाला नवीन ओळख दिली. आज सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक व क्रीडा यासारख्या क्षेत्रात महिलांचा वर्चस्व वाढला आहे, यामागे मागील ७० वर्षात काँग्रेस सरकारच्या धोरणांचे मोठे योगदान आहे, असे ते म्हणाले.आपल्या मार्गदर्शनात पालकमंत्री बडोले म्हणाले, महाराष्टÑ शासन संपूर्ण राज्यात महिलांच्या उत्थानासाठी कार्य करीत आहे. गोंदिया जिल्ह्यात आमदार अग्रवाल यांचा सतत पाठपुरावा व तीव्र ईच्छाशक्तीमुळे असे रचनात्मक आयोजन सुगमतेने होत आहेत, असे सांगितले.जि.प. अध्यक्ष सीमा मडावी यांनी महिला सक्षमीकरण व महिला उत्थान यावर मार्गदर्शन केले. महिला व बाल कल्याण सभापती लता दोनोडे यांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून आत्मनिर्भर होत असल्याचे सांगितले. तसेच पं.स. सभापती माधुरी हरिणखेडे यांनी, महिलांना स्वयंरोजगार देवून आत्मनिर्भर बनविण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक शिबिरांचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले.कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.